शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

coronavirus; ट्रॅव्हल एजंटांचे दरमहा १०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:59 AM

कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले.

ठळक मुद्देउपराजधानीत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तिकीट विक्री थंडकॅन्सलेशन चार्जेसचाही फटका

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीने जनता प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे स्थानिक ट्रॅव्हल एजंटांना दरमहा १०० कोटीचे नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रॅव्हल एजंटस् असोशिएशन ऑफ इंडियाचे (टीएएआय-टाई) नागपूर अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सांगितले.देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तिकिटे विकली जात नाहीत शिवाय विमान, बस व रेल्वे तिकिटांचे कॅन्सलेशन चार्जेस कापून घेतले जात असल्याचे हे नुकसान होत आहे. विमान तिकिटांसाठी देशांतर्गत कॅन्सलेशन चार्ज २५०० ते ३००० आहे तर आंतरराष्ट्रीय तिकीटांसाठी ७००० ते ३०,००० आहे, असेही अग्रवाल म्हणाले.नागपूरात जवळपास ५०० ट्रॅव्हल एजंट्स काम करतात. त्यात बस, रेल्वे, विमानाची तिकिटे बुक करणे हॉटेल, वाहनांचे आरक्षण, यात्रा व देशी/विदेशी टूर आयोजित करणे, जंगल सफारी यांचा समावेश असतो. नागपुरातून दररोज ५००० प्रवासी विमानाने बाहेर जातात/येतात तर बस आणि रेल्वे प्रवाशांची संख्या जवळपास १.५० लाख आहे. सध्या विमान प्रवाशांची संख्या ५० टक्के घटली आहे तर बस व रेल्वे प्रवाशांची संख्या ५० टक्के घटली आहे तर बस व रेल्वे प्रवाशांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे, असे अनेक ट्रॅव्हल एजंटनी सांगितले.मध्य भारतातील सर्वात मोठी ट्रॅव्हल एजन्सी पवनसुत ट्रॅव्हल्स प्रा. लि. मधून रोज १४० ते १५० देशांतर्गत तिकिटे तर १५ ते २० आंतरराष्ट्रीय तिकिटे बुक होतात. सध्या फक्त ३० ते ३५ देशांतर्गत तिकिटे बुक होतात व एकही आंतरराष्ट्रीय तिकीट विकले जात नाही, असे सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जॅगसन्स ट्रॅव्हल्सचे प्रबंध संचालक हरमनदीपसिंग आनंद म्हणाले, व्यवसाय मंदावल्यामुळे आम्ही ४० पैकी ३५ कर्मचाऱ्यांना घरात बसून काम करायला सांगितले आहे.निखार ट्रॅव्हल्सचे सुधीर पारख म्हणाले की केरळ, गोवा, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश यांनी देशांतर्गत प्रवाशांना प्रवेश बंदी घातली आहे. त्यामुळे देशांतर्गत व्यवसाय ४० ते ५० टक्के घटला आहे. आंतरराष्ट्रीय बुकिंग ८० ते ९० टक्क्यांनी घटले आहे.डेस्टिनेशन ट्रॅव्हल्स व व्हॅकेशन प्लॅनर्सचे राज अकोलकर व अंकुश ट्रॅव्हल्सचे अंकुश देशमुख यांनी विमान तिकिटे रद्द झाली तर हॉटेल व वाहनांचे बुकिंगही रद्द करावे लागते, त्यामुळे तिहेरी नुकसान होते असे सांगितले.अद्वैत ट्रॅव्हल्सचे विजय कृपाल यांनी कोरोनाच्या भीतीने बस व रेल्वेने प्रवास करणे टाळत आहेत त्यामुळे व्यवसाय ५० टक्के घटला आहे, असे सांगितले.एप्रिल व मे हे दोन महिने देशांतर्गत व विदेशी टूरसाठी महत्त्वाचे असतात; पण यावर्षी दोन्ही महिन्यातील टूर रद्द झाले आहेत, हे मोठे नुकसान आहे. व्यवसाय किमान दोन ते तीन महिने पूर्वपदावर येणार नाही, असे सर्वच ट्रॅव्हल एजंटांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस