शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'वंदे भारत'कडून महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक; रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत गंगाजळी

By नरेश डोंगरे | Updated: January 21, 2023 05:25 IST

रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत अशी पावणेतीन कोटी रुपयांची गंगाजळीही ओतली आहे.

नागपूर : मध्य भारतातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनने अवघ्या महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली आहे. एवढेच नाही तर रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत अशी पावणेतीन कोटी रुपयांची गंगाजळीही ओतली आहे.

नागपूर ते बिलासपूर या मार्गावर ११ डिसेंबर २०२२ ला ही आलिशान रेल्वेगाडी सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवली होती. भारतील रेल्वे प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनमध्ये इतक्या सोयी-सुविधा अन् वैशिष्ट्ये आहेत की, तिच्यात प्रवास करणाऱ्यांना ती धक्का न लागू देता त्यांच्या इच्छित स्थानकावर सोडते. यापूर्वी नागपूर ते बिलासपूर हा रेल्वेमार्गाचा प्रवास १० ते ११ तासांचा होता. तो वंद भारत मुळे केवळ साडेपाच तासांचा झाला आहे. गाडीत अन्य सोयी सुविधांसह गरमागरम जेवण, शीतपेय, ऑन डिमांड वायफाय उपलब्ध आहे. त्यामुळे मध्य आणि उच्चवर्गिय प्रवासी तसेच व्यापारी बांधव या गाडीला पसंती दर्शवित आहेत.

मध्यभारतातील महत्वाचे प्रमुख शहर मानले जाणाऱ्या नागपुरात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील व्यापारी बांधवांची मोठ्या प्रमाणात रोजच ये-जा असते. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, ही गाडी बिलासपूरहून सकाळी ६.४५ वाजता सुटते आणि नागपुरात दुपारी १२.१५ वाजता पोहचते.त्याच प्रमाणे नागपूरहून ती रोज दुपारी २.०५ वाजता सुटते आणि रात्री ७.३५ वाजता बिलासपूरला पोहचते. मार्गातील रायपूर, दुर्ग, राजनांदगाव आणि गोंदिया या चार स्थानकांवर हिचे थांबे आहेत. अर्थात सकाळी व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने निघालेले व्यापारी रात्री आपल्या घरी पोहचतात. त्यामुळे या रेल्वेगाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

११ डिसेंबरला ही रेल्वेगाडी सुरू झाली तरी ती विशेष निमंत्रितांनाच येथून बिलासपूरला घेऊन गेली होती. त्यामुळे तिची व्यावसायिक प्रवासी सेवा खऱ्या अर्थाने १२ डिसेंबर २०२२ ला सुरू झाली. तेव्हापासून तो १३ जानेवारी २०२३ या महिनाभरात वंदे भारत मध्ये १७ हजार, ८२२ प्रवाशांनी नागपूर ते बिलासपूर प्रवास करून १ कोटी, ४५ लाख, ९४ हजार ६७८ रुपयांचा महसुल दिला. तर, याच महिनाभराच्या कालावधीत वंदे भारत मध्ये १८ हजार, ५२९ प्रवाशांनी बिलासपूर ते नागपूर प्रवास करून वंदे भारतला १ कोटी, ३९ लाख, १३ हजार, ४६७ रुपये दिले.

सुरक्षेवर विशेष भर !वंदे भारत मध्ये सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. प्रवाशांना आकस्मिक अडचण आल्यास ते आपत्कालीन परिस्थितीत थेट ट्रेनच्या चालकाशी आणि अन्य कर्मचाऱ्यांशी बोलू शकतात. सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही असून प्लॅटफॉर्म साइड कॅमेरेदेखील आहेत. डब्याच्या बाहेर रिअरव्ह्यू कॅमेऱ्यांचा समावेश आहे. सर्व डबे पूर्णपणे सीलबंद गँगवेद्वारे एकमेकांशी संलग्न आहेत.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसnagpurनागपूर