शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपूर विभागात १३० किलोमीटर वेगाने धावणार रेल्वेगाड्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:00 IST

Trains run at a speed of 130 kmph, nagpur news नागपूर विभागात प्रति तास १३० किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी काही कामे करावयाची आहेत. विभागाला असलेल्या गरजांबाबत झोन मुख्यालयाला सूचना देण्यात आली आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ रिचा खरे यांनी केले.

ठळक मुद्दे‘डीआरएम’ रिचा खरे यांची अपेक्षा : सुरक्षेला प्राधान्य देण्याची घोषणा

 लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नागपूर विभागात प्रति तास १३० किलोमीटर वेगाने रेल्वेगाड्या चालविण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी काही कामे करावयाची आहेत. विभागाला असलेल्या गरजांबाबत झोन मुख्यालयाला सूचना देण्यात आली आहे, असे प्रतिपादन मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या ‘डीआरएम’ रिचा खरे यांनी केले. हे काम पूर्ण झाल्यानंतर आरडीएसओ प्रति तास १३० किलोमीटरच्या वेगाने ट्रायल घेणार असून काम पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘डीआरएम’ रिचा खरे म्हणाल्या, वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशनच्या प्रोजेक्टसाठी मध्य रेल्वे आणि आयआरएसडीसीकडून कराराची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वेगाड्यात बेड रोलचा पुरवठा बंद असल्यामुळे अजनीतील मॅकेनाईज्ड लॉंड्रीमध्ये काम सुरू झालेले नाही. या लॉंड्रीचा दुसऱ्या पद्धतीने वापर करण्याबाबत रेल्वे बोर्डाशी बोलणे सुरू आहे. बोर्डाने याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. निधीचा तुटवडा असल्यामुळे प्रवासी सुविधांशी संबंधित विकासकामे प्रभावित होत आहेत. परंतु रेल्वे परिचालनाच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षेशी संबंधित कामे थांबविण्यात आलेली नाहीत. गड्डीगोदाम रेल्वे पुलावर सुरू असलेले देखभालीचे काम मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत चालणार आहे. तर रेल्वे गार्डसह इतर रनिंग स्टाफला सॅनिटायझर किट देण्यात आली आहे. तसेच लॉबीतही सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. अशा स्थितीत ब्रेकव्हॅनमध्ये गार्डला कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका नाही. आपल्या कार्यकाळात रेल्वे सुरक्षा, डिजिटलायझेशन, प्रवासी सुविधा आणि उत्पन्न वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप कुमार सतपथी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, वरिष्ठ विभागीय अभियंता पवन पाटील, जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव उपस्थित होते.

रेल्वेने पाठविला ६ हजार टन संत्रा

‘डीआरएम’ खरे म्हणाल्या, कोरोनाच्या काळात विभागाने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधले. आता संत्रा, कापूस, फ्लायअ‍ॅश, ट्रॅक्टर्स रेल्वेने वाहतूक करण्यात येत आहे. आतापर्यंत विभागाने २३ मालगाड्यांच्या माध्यमातून ६ हजार टन संत्रा दिल्ली आणि शालीमारला पाठविला. डिसेंबर अखेरपर्यंत विभागाने २ हजार कोटी उत्पन्न मिळविले आहे. कोरोनामुळे हे उत्पन्न उद्देशापेक्षा ६०० कोटी रुपये कमी आहे. विभागाने १६ श्रमिक स्पेशल गाड्या चालवून ९ लाख प्रवाशांना पाठविले आहे. मालगाड्यांचा वेग २१ किलोमीटरवरून ४० किलोमीटर वाढविण्यात आला आहे.

अजनी वन वाचविणे महामेट्रो, एनएचएआयची जबाबदारी

‘डीआरएम’ रिचा खरे यांनी सांगितले की, अजनीत प्रस्तावित इंटरमॉडेल रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केवळ आपली जमीन दिली आहे. या प्रकल्पाला साकारताना अजनी रेल्वे परिसरातील वृक्षांना वाचविण्याची जबाबदारी महामेट्रो आणि एनएचएआयची आहे. त्यांच्यातच या प्रकल्पाबाबत करार झाला आहे. तेच याबाबत योग्य पाऊल उचलणार आहेत. मध्य रेल्वेने या प्रकल्पासाठी अजनीतील ४४ हेक्टर जमीन दिल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेMediaमाध्यमे