शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वर्धा-बल्लारशाह सेक्शनमध्ये आज रेल्वे धावणार १३० च्या स्पीडने

By नरेश डोंगरे | Updated: January 9, 2025 19:00 IST

ताडाली आणि माजरी थर्ड लाईन : सीआरएसकडून तपासली जाणार सुरक्षा

नरेश डोंगरे, नागपूर                                                                                              

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य रेल्वेच्या वर्धा-बल्लारशाह सेक्शनमध्ये ताडाली आणि माजरी दरम्यान नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या रेल्वेच्या थर्ड लाईनचे ऑडिट वजा निरीक्षण शुक्रवारी केले जाणार आहे. त्यासाठी या मार्गावर ताशी १३० च्या स्पीडने रेल्वे गाडी चालविली जाणार आहे. या हायस्पीडमध्ये या लाईनवरून ट्रेन कशी जाते, त्याची तपासणी कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) करणार आहेत.

रेल्वेच्या आधुनिकीकरण आणि विस्तारित नेटवर्क अंतर्गत शेकडो कोटी खर्चून थर्ड, फोर्थ लाईनचे काम केले जात आहे. अशाच प्रकारे ताडाली आणि माजरी दरम्यान मोठा खर्च करून थर्ड रेल्वे लाईन तयार करण्यात आली आहे. या लाईनवरून ट्रेन स्पीडमध्ये सुरक्षितपणे धावू शकेल का, त्याची तपासणी करण्यासाठी शुक्रवारी १० जानेवारीला ट्रायल रन पार पडणार आहे. रेल्वेच्या अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पीड ट्रायलचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी ५.३० ते ६.१५ या वेळेत होणार आहे. ताशी १३० वेगाने ट्रेन यावेळी धावेल आणि ट्रायल कॅरेज तसेच ऑब्झर्वेशन कार विंडो यावेळी मुंबईच्या दिशेने माजरीकडे राहणार आहे. सिक्युरिटी प्रोटोकॉलवर यावेळी मुख्यत्वे भर दिला जाणार आहे. सुरक्षेची उच्च मानके तपासल्यानंतर ट्रायल रन यशस्वी झाली तर रेल्वेच्या या मार्गावरील संचालनाला अधिक गती मिळेल. त्यामुळे रेल्वे गाड्या रेंगाळण्याच्या अथवा उशिरा धावण्याचे प्रमाण कमी होईल.

नागरिकांना आवाहन

या हाय स्पीड ट्रायलच्या वेळी रेल्वे लाईनच्या आजुबाजुला राहणाऱ्या आणि त्यावेळी ट्रॅक जवळ असणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रायलच्या वेळेत कुणीही ट्रॅकजवळ जाऊ नये किंवा ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.------------------

टॅग्स :nagpurनागपूर