शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
4
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
5
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
6
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
7
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
8
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
9
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
10
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
11
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
12
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
13
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
14
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
15
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
16
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
17
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
18
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
19
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
20
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेन आता डिझेल इंजिन ऐवजी विजेवर धावणार ! वर्धा-देवळी-कळंब पॅसेंजर रेल्वेचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 14:53 IST

मध्य रेल्वेचा यशस्वी प्रयोग : विदर्भ-मराठवाड्यात विकासाचा नवा सेतू निर्माण करणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाचा एक टप्पा फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावर सुरू असलेली वर्धा-कळंब-वर्धा पॅसेंजर ट्रेन आता डिझेल इंजिन ऐवजी विजेवर (ईलेक्ट्रिक ट्रॅक्शन) धावणार आहे. आजपासून हा पर्यावरण पूरक बदल झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

विदर्भ-मराठवाड्यात विकासाचा नवा सेतू निर्माण करणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाचा एक टप्पा फेब्रुवारी २०२४ मध्ये पूर्ण झाला. अर्थात वर्धा-देवळी-कळंब या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर मात्र या प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. दरम्यान, सुरू झालेली वर्धा-देवळी-कळंब रेल्वे गाडी आतापर्यंत डिझेल इंजिनवर धावत होती. आता मात्र वर्धा-कळंब-वर्धा मार्गावरील प्रवासी गाडी क्रमांक ५१११९/५११२० चे डिझेल इंजिनवरून इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

आज रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी वर्धा येथून २९ ऑगस्ट २०२५ पासून धावायला सुरुवात झाली तर कळंब येथून ३० ऑगस्टपासून नव्या इलेक्ट्रिक इंजिनसह ती धावणार आहे. मध्य रेल्वेकडून गेल्या दोन वर्षापासून ऊर्जा कार्यक्षमता, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सातत्याने पावले उचलली जात आहेत. वर्धा-कळंब मार्गावरील ट्रॅक्शन बदलाची प्रक्रिया हे त्याचेच एक उदाहरण आहे. भविष्यात प्रवाशांना आधुनिक आणि जागतिक दर्जाची सेवा देण्याचे रेल्वेकडून कसोशिचे प्रयत्न सुरू असून, हा बदल त्याचेच प्रतिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

नागपूर विभागाने केलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे आता रेल्वेचा प्रवास पर्यावरण पूरक तसेच अधिक सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. विजेवर चालणाऱ्या या ट्रेनमुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होणार असून, कार्बन उत्सर्जनातही घट होणार आहे. त्यामुळे स्वच्छ व हरित पर्यावरणाला चालना मिळणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

खर्चातही होणार बचतरेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमुळे डिझेलवर होणारा रेल्वेचा लाखोंचा खर्च वाचणार आहे. शिवाय देखभाल खर्चातही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. शिवाय इंजिनमधील तांत्रिक बिधाडांचे प्रमाण कमी होऊन, प्रवाशांना अधिक विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे