शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी  : रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 21:42 IST

रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू झाला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय झाली दूर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू झाला आहे. या प्लान्टमधून दिवसाकाठी १४ हजारांपेक्षा अधिक बॉटल्स उपलब्ध होऊन त्यांचा पुरवठा करण्यात येत आहे.रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी बाटलीबंद पाण्याला प्राधान्य देतात. रेल्वे प्रशासनाने मोजक्या कंपन्यांनाच पाणी विक्रीची परवानगी दिलेली आहे. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत नसल्याने प्रवाशांना पाण्याच्या बाटलीसाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. प्रवाशांना मुबलक प्रमाणात आणि योग्य किमतीत पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच बाटलीबंद पाण्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी २०१३-१४ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पवन बंसल यांनी नागपूर विभागाअंतर्गत रेल नीर प्लान्टची घोषणा केली होती. ८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या प्लान्टमधून दररोज ७२ हजार लिटर पाणी तयार करण्याची क्षमता आहे. आॅक्टोबर २०१७ या वर्षातच हा प्रकल्प तयार होणार होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते शक्य होऊ शकले नाही. नंतर आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्यातही उशीर झाला. अखेर २०१९ च्या शेवटी हा प्रकल्प पूर्ण करण्यात विभागाला यश मिळाले. सद्य:स्थितीत याच प्लान्टमधून नागपूर रेल्वेस्थानकावर बाटलीबंद पाणीपुरवठा केला जात आहे.नागपूरसाठी ७०० पेट्यानागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ३५ ते ४० हजार प्रवाशांची वर्दळ असते. दररोज ७०० पेटी पाण्याची गरज भासते. एका पेटीत एक लिटरच्या २४ बाटल्या असतात. उन्हाळ्यात पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यास पाण्याचा काळाबाजार व्हायचा. आता रेल नीर प्लाँट सुरू झाल्याने यावर आळा बसणार आहे. भारतीय रेल्वेत रेल नीरचेच पाणी वापरावे, असे निर्देश आहेत. विशेष म्हणजे रेल नीरचा प्रकल्प बिलासपूरला आहे. तेथूनच नागपूरसाठी पाणी मागविल्या जायचे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यास मागणीच्या तुलनेत पाहिजे तसा पुरवठा होत नव्हता. आता नागपुरातच प्लान्ट सुरू झाल्याने बिलासपूरहून पाणी मागविण्याची गरज नाही.

टॅग्स :railwayरेल्वेWaterपाणी