शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

रेल्वे प्रवाशांना मिळणार शुद्ध पाणी  : रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 21:42 IST

रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू झाला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय झाली दूर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यात सीलबंद पाण्याच्या बाटल्यांची मागणी वाढल्यामुळे किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याच्या बॉटलची विक्री होत होती. परंतु आता प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून त्यांना अधिक पैसे मोजण्याची गरज भासणार नाही. बुटीबोरीत आयआरसीटीसीचा रेल नीर बॉटलिंग प्लान्ट सुरू झाला आहे. या प्लान्टमधून दिवसाकाठी १४ हजारांपेक्षा अधिक बॉटल्स उपलब्ध होऊन त्यांचा पुरवठा करण्यात येत आहे.रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी बाटलीबंद पाण्याला प्राधान्य देतात. रेल्वे प्रशासनाने मोजक्या कंपन्यांनाच पाणी विक्रीची परवानगी दिलेली आहे. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत नसल्याने प्रवाशांना पाण्याच्या बाटलीसाठी अधिक पैसे मोजावे लागत होते. प्रवाशांना मुबलक प्रमाणात आणि योग्य किमतीत पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच बाटलीबंद पाण्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी २०१३-१४ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री पवन बंसल यांनी नागपूर विभागाअंतर्गत रेल नीर प्लान्टची घोषणा केली होती. ८ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या प्लान्टमधून दररोज ७२ हजार लिटर पाणी तयार करण्याची क्षमता आहे. आॅक्टोबर २०१७ या वर्षातच हा प्रकल्प तयार होणार होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे ते शक्य होऊ शकले नाही. नंतर आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्यातही उशीर झाला. अखेर २०१९ च्या शेवटी हा प्रकल्प पूर्ण करण्यात विभागाला यश मिळाले. सद्य:स्थितीत याच प्लान्टमधून नागपूर रेल्वेस्थानकावर बाटलीबंद पाणीपुरवठा केला जात आहे.नागपूरसाठी ७०० पेट्यानागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ३५ ते ४० हजार प्रवाशांची वर्दळ असते. दररोज ७०० पेटी पाण्याची गरज भासते. एका पेटीत एक लिटरच्या २४ बाटल्या असतात. उन्हाळ्यात पाण्याची मागणी दुपटीने वाढल्यास पाण्याचा काळाबाजार व्हायचा. आता रेल नीर प्लाँट सुरू झाल्याने यावर आळा बसणार आहे. भारतीय रेल्वेत रेल नीरचेच पाणी वापरावे, असे निर्देश आहेत. विशेष म्हणजे रेल नीरचा प्रकल्प बिलासपूरला आहे. तेथूनच नागपूरसाठी पाणी मागविल्या जायचे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यास मागणीच्या तुलनेत पाहिजे तसा पुरवठा होत नव्हता. आता नागपुरातच प्लान्ट सुरू झाल्याने बिलासपूरहून पाणी मागविण्याची गरज नाही.

टॅग्स :railwayरेल्वेWaterपाणी