धान्य व्यापाऱ्याला ५५ लाखाने फसवले
By Admin | Updated: February 14, 2016 02:38 IST2016-02-14T02:38:40+5:302016-02-14T02:38:40+5:30
इतवारी धान्यबाजार येथील एका व्यापाऱ्याला चंदीगडच्या एका ब्रोकर कंपनीने ५५ लाखाने फसवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

धान्य व्यापाऱ्याला ५५ लाखाने फसवले
नागपूर : इतवारी धान्यबाजार येथील एका व्यापाऱ्याला चंदीगडच्या एका ब्रोकर कंपनीने ५५ लाखाने फसवल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भारती मनोहरलाल सच्चानी (५३) रा. चौधरी चौक जरीपटका असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारती यांचे इतवारी येथील अमरदीप चित्रपटगृहाजवळ भारती फूड नावाची कंपनी आहे. त्यांनी विजित क्रांती अरोरा (सेक्टर-२३ डी) चंदीगड येथील कंपनीच्या माध्यमातून रशियाच्या एन. ग्रुप कंपनीला ३८४ टन तांदूळ निर्यात करण्याचा करार केला होता. भारती फूडने १९ मे २०१४ ते १९ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १ लाख ६७ हजार ४४० डॉलर किमतीचे तांदूळ रशियाच्या कंपनीला पाठविले. यादरम्यान भारती फूड कंपनीच्या खात्यात ८४ हजार ४८० डॉलर जमा झाले. परंतु उर्वरित ८२ हजार ९६० डॉलरची रक्कम मिळाली नाही. काही दिवसानंतर रशियातील कंपनीशी संपर्क झाला असता उर्वरित ८२ हजार ९६० डॉलरची रक्कम चंदीगडच्या विजित अरोरा कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती मिळाली.