शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

आपत्कालीन स्थितीत पहिल्यांदाच टावर शस्त्रक्रिया, वृद्धाला मिळाले जीवनदान

By सुमेध वाघमार | Updated: February 22, 2024 17:17 IST

लोकमत’शी बोलताना डॉ. अरनेजा म्हणाले, रुग्णाचे वय व त्यांची स्थिती पाहता ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करून हृदयाचे वॉल्व्ह बदलणे शक्य नव्हते.

नागपूर : ज्या वयोवृद्ध रुग्णांवर ‘ओपन हार्ट सर्जरी’ शक्य नाही त्यांच्यासाठी ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट’ (टावर) वरदान ठरत आहे. परंतु ही ‘अँजिओप्लास्टी’सारखी तातडीची प्रक्रिया नाही. किमान सात दिवसांचे नियोजन करावे लागते. परंतु एका वयोवृद्ध रुग्णाची गंभीर स्थिती पाहता आपत्कालीन स्थितीत ‘टावर’ करण्याची पहिलीच प्रक्रिया नागपुरात यशस्वी करण्यात आली.

मध्यप्रदेश येथील ७७ वर्षीय यादव त्या रुग्णाचे नाव. यादव यांच्या हृदयातील मुख्य झडप (एआॅर्टिक वॉल्व्ह) पुर्णत: खराब झाले होते. यामुळे हृदयातील रक्त फुफ्फुसात जमा होत होते. त्यांना श्वासही घेता येत नव्हता. अंत्यंत गंभीर स्थितीत त्यांना रात्री १० वाजता अरनेजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. जसपाल अरनेजा यांनी तपासल्यावर तातडीन वॉल्व्ह बदलण्याचा निर्णय घेतला.

परंतु त्यांना श्वास घेता येत नसल्याने व रक्तदाबही ८०/४० एमएम एचजीअसल्याने व्हेंटिलेटरवर घेतले. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. अरनेजा म्हणाले, रुग्णाचे वय व त्यांची स्थिती पाहता ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करून हृदयाचे वॉल्व्ह बदलणे शक्य नव्हते. त्यामुळे ‘टावर’ करण्याचा निर्णय घेतला. परंतु रुग्ण गंभीर असल्याने तातडीने ही प्रक्रिया करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. अनुभव व कौशल्याच बळावर २४ तासात ‘टावर’ प्रक्रिया यशस्वी केली. इतक्या कमी वेळात नागपुरात पहिल्यांदा ही प्रक्रिया करण्यात आली.

अँजिओप्लास्टी सारखी राबवली ‘टावर’ प्रक्रिया

डॉ. अरनेजा म्हणाले, ‘एआॅर्टिक वॉल्व्ह रिप्लेसमेंट’ करणाºया रुग्णाचा इको, सीटी एओर्टोग्राम सारखे चाचणी अहवाल तयार केल्यानंतर वॉल्व्हची आॅर्डर दिली जाते. त्यानंतर ‘टावर’ प्रक्रियेचे नियोजन के ले जाते. यात मांडीचा धमणीतून कॅथेटर टाकून ते हृदयापर्यंत नेऊन वॉल्व्ह रिप्लेसमेंट केले जाते. तातडीची ‘अँजिओप्लास्टी’ सारखी ही प्रक्रिया राबवली जात नाही. परंतु ७७वर्षीय रुग्णाची गरज लक्षात घेऊन २४ तासांच्या आत ‘वॉल्व्ह’ची आॅर्डर देण्यापासून ते रुग्णाच्या तपासण्या व टावर प्रक्रिया यशस्वी केली.

भविष्यात रुग्णांवर जटील शस्त्रक्रियेची गरज नाही

हृद्यरोग तज्ज्ञ डॉ. अमर आमले म्हणाले, मध्य भारतात पहिल्यांदा ‘टावर’ तंत्रज्ञान आम्ही आणले, आणि आता तातडीची टावर प्रक्रियाही यशस्वी केल्याने जीवाचा धोका असलेल्या रुग्णांसाठी ही प्रक्रिया वरदान ठरणार आहे. डॉ. विवेक मंडुरके म्हणाले, तंत्रज्ञान विकसीत होत असल्याने त्याचा फायदा रुग्णांना होत आहे. ‘टावर’ प्रक्रियेने केवळ ‘एआॅर्टिक वॉल्व्ह नव्हे तर इतर वॉल्व्ह दुरुस्ती विकसित झाली आहे. यामुळे भविष्यात रुग्णांवर फार जटील शस्त्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही.

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य