शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तोतलाडोह, खेकरानाला, वडगाव धरणाचे दरवाजे उघडले

By आनंद डेकाटे | Updated: July 28, 2024 19:15 IST

नागपूर जिल्ह्यात पावसाची झड सुरूच, प्रशासन सतर्क . प्रशासन सतर्क असून  नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नागपूर: नागपूर जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासून पावसाची झड सुरू आहे. रविवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता. परिणामी  धरणातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तोतलाडोह, खेकरानाला व निम्म वेणा वडगाव धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. प्रशासन सतर्क असून  नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

रविवारी दिवसभर पावसाची झड सुरू होती. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास निम्म वेणा वडगाव धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आले. एकूण ८३४.३ दशलक्ष घनमीटर(दलघमी) इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्याचप्रमाणे दुपारी ४ वाजता रामटेक तालुक्यातील तोतलाडोह धरणाचे सर्व १४ दरवाजे उघडण्यात आले.

या धरणातून एकूण ४४३.५७६ दलघमी इतके पाणी सोडण्यात आले. सावनेर तालुक्यातील खेकरानाला धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले असून १४.०९८ दलघमी इतके पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पावसाची झड सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा वाढल्याने त्यातून पुन्हा पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस