शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

समृद्धीवरील टोल वाढणार! मुंबईला समृद्धीने जायचे की रेल्वेने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:30 IST

समृद्धीचा टोल १,४४५ रुपये : रेल्वे एसीचे तिकीट १,२०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० दिवसांनंतर समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये वाढ होणार आहे. परिणामी टोलची रक्कम आणि वाहनाच्या इंधनाच्या खर्चाचा हिशेब बघता खासगी वाहनांची संख्या 'समृद्धी'वरून कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

१ एप्रिल २०२५ पासून समृद्धी महामार्गावरील टोलदर वाढणार आहेत. टोलवाढीचा हा फटका जोरदारच आहे. केवळ टोल आणि तिकीट दरांची तुलना केली तरी शयनयान श्रेणीतील रेल्वेचा प्रवास अधिक फायद्याचा ठरणार आहे. कारण दरवाढीनंतर समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी खासगी वाहनधारकाला नागपूर ते मुंबई असा प्रवास करताना १,४४५ टोल द्यावा लागणार आहे. याशिवाय, इंधन खर्च आणि वाहनाच्या देखभालीचा खर्च वेगळा राहील अशा स्थितीत रेल्वेचा पर्याय अधिक वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशी आहे तफावतवातानुकूलित श्रेणीतील रेल्वे प्रवासाचा खर्च समृद्धी महामार्गाच्या टोलपेक्षा थोडा कमी-जास्त नागपूरवरून मुंबईला जाण्यासाठी वातानुकूलित श्रेणीतील तृतीय श्रेणी रेल्वेचे कमीत कमी भाडे हे ११२५ रुपये पासून सुरू होते. विदर्भ, ज्ञानेश्वरीसारख्या इतर एक्स्प्रेस १२१० तर दुरांतो एक्स्प्रेसचे भाडे हे १८९० आहे. तर, शयनयान श्रेणीतील तिकीट ६८५ रुपये आहे. वाहनाचे इंधन, देखभाल आणि इतर खर्च विचारात घेतल्यास, रेल्वे प्रवासच अधिक किफायतशीर ठरू शकतो. हा हिशेब अनेक खासगी वाहनधारकांना रेल्वे गाडीत बसण्यास बाध्य करणारा ठरू शकतो.

असे राहील नवीन टोल दर: कार आणि हलकी मोटार वाहने (एलएमव्ही) : प्रति किलोमीटर २.०६ रुपये

  • मिनी ट्रक आणि मिनी बस: प्रति किलोमीटर ३.३२ रुपये
  • चार किंवा सहा चाकांच्या बस आणि ट्रक प्रति किलोमीटर ६.९७ रुपये
  • जेसीबी, ट्रेलर आणि बांधकामासाठी वापरली जाणारी वाहने: प्रति किलोमीटर १०.९३ रुपये
  • सात किंवा त्याहून अधिक एक्सेल असलेली वाहने : प्रति किलोमीटर १३.३०
  • हे दर १ एप्रिल २०२५ पासून ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू राहतील.

प्रवाशांनाही बसणार फटका

  • संपूर्ण ७०१ किमी लांबीच्या महामार्गावर प्रवास करणाऱ्या मोटार वाहनांसाठी एकूण टोल साधारणतः १,४४५ रुपये राहील.
  • टोल दरवाढीची ही रक्कम व्यावसायिक वाहतूकदार स्वतःच्या खिशांतून भरणार नाही. ते तिकिटांची दरवाढ करतील.
  • अर्थात बस, ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांनाही या टोलवाढीचा फटका बसणार आहे.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गtollplazaटोलनाकाnagpurनागपूर