शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज : इ.मो. नारनवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:42 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ते पाक्षिक म्हणजे त्यावेळी समाजजागृतीच्या आंदोलनाचे सर्वात मोठे साधन ठरले होते. आजची परिस्थितीही भीषण असून त्या समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी कवी इ.मो. नारनवरे यांनी येथे केले.

ठळक मुद्दे मूकनायक शताब्दी वर्षसमारोहाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२० साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. ते पाक्षिक म्हणजे त्यावेळी समाजजागृतीच्या आंदोलनाचे सर्वात मोठे साधन ठरले होते. आजची परिस्थितीही भीषण असून त्या समाजजागृतीच्या आंदोलनाची आजही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी कवी इ.मो. नारनवरे यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या ‘मूकनायक’ या पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित झाला. या घटनेला पुढच्या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीर मुक्तिवाहिनी व रिपब्लिकन मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मूकनायक शताब्दी वर्ष समारोह आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.या समारोहाची सुरुवात गुरुवारी संविधान चौक येथून करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांनी मार्गदर्शन केले. मूकनायक या पाक्षिकाच्या पहिल्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचे सामूहिक वाचन करून त्यावर चिंतन करण्यात आले. डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अग्रलेखात सांगितलेल्या गोष्टी आणि दिलेला इशारा आजही तंतोतंत लागू होतो. तेव्हा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याचा अभ्यास करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करावी, असे आवाहन नारनवरे यांनी केले. यावेळी सुधीर भगत, भोजराज हाडके यांनीही मूकनायक पाक्षिकाच्या प्रासंगिकतेवर प्रकाश टाकला.संचालन का.रा. वालदेकर यांनी केले. नरेश वाहाणे यांनी आभार मानले.यावेळी विलास भोंगाडे, बबन चहांदे, आ. हेमंत नागदिवे, एन.एल. नाईक, प्रवीण कांबळे, सेवक लव्हात्रे, सुधीर ढोके, गोविंद वाघमारे, राजकुमार वंजारी, अनिल वासनिक, संजय गोडघाटे, नामदेवराव खोब्रागडे, शिवचरण थूल आदी उपस्थित होते.समाजाच्या पुनर्रचनेचा तो प्रारंभिक हस्तक्षेपयावेळी आर्किटेक्ट नरेंद्र शेलार म्हणाले, बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मूकनायक या पाक्षिकाच्या शंभराव्या वर्षसमारोहानिमित्त वर्षभर अभियान चालवण्याचे ठरवले आहे. मूकनायक सुरू करून बाबासाहेबांनी समाजरचनेच्या बदलाचे आव्हान केले होते. त्या माध्यमातून त्यांनी समाज पुनर्रचनेची विचारधारा या देशात रुजवण्याचे कार्य केले. सामाजिक पुनर्रचनेचाचा बाबासाहेबांनी केलेला तो प्रारंभिक हस्तक्षेप होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर