शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

आज 'महाराष्ट्र बंद' विविध संघटनांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:14 IST

देशात नुकताच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब ऊर्फ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला शुक्रवारच्या 'महाराष्ट्र बंद' नागपूरसह जिल्ह्यात शहरात यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देशांतता पाळण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात नुकताच पारित झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब ऊर्फ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला शुक्रवारच्या 'महाराष्ट्र बंद' नागपूरसह जिल्ह्यात शहरात यशस्वी करण्याचा निर्धार शहरातील विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे यांनी दिली.शहरातील विधानसभानिहाय व शहर कार्यकारिणीची संयुक्त बैठक गुरुवारी झाली. त्यात बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बंदला शहरातील राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. बंद दरम्यान शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा हुडदंग न करता, कोणत्याही प्रकारे सामान्य जनतेला, व्यापारी वर्ग, शासकीय अथवा खाजगी मालमत्ता याला नुकसान होणार नाही तसेच कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन हा बंद संवैधानिक मार्गाने यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.या बंदला एआयएमआयएम, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन ऑटो संघटना, नागपूर फेरीवाला दुकानदार संघ, भारतीय मुस्लिम परिषद, शिवशाही व्यापारी संघ आदी संघटनांचे समर्थन प्राप्त आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष रवी शेंडे, इंजि. राहुल वानखेडे, प्रा. रमेश पिसे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र बंदची हाक घटनाबाह्य : अ‍ॅड. मुकुंद खैरेवंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सीएए व एनआरसी विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. अ‍ॅड. आंबेडकर यांची बंद पाळण्याची ही भूमिका घटनाबाह्य असल्याची टीका बुद्धिस्ट कायद्यासाठी लढा देणारे अ‍ॅड. मुकुंद खैरे यांनी केली आहे. केंद्र शासनाने आणलेल्या सीएए व एनआरसीला आमचाही विरोध आहे. मात्र त्यासाठी बंद पाळणे, रस्ते अडविणे व जाळपोळ करण्याला आम्ही समर्थन करणार नाही, अशी भूमिका अ‍ॅड. खैरे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना सभेत केलेल्या ऐतिहासिक भाषणात बंद पाळणे, रस्ते अडविणे, जाळपोळ करणे अशाप्रकारची आंदोलने संविधानाला कमजोर करतात, असे संबोधले होते. त्यामुळे देशात अराजकता, बेबंदशाही निर्माण होते आणिसंविधानावरील लोकांचा विश्वास कमी होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. बाबासाहेबांच्या भूमिकेविरोधात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची भूमिका असल्याची टीका अ‍ॅड. खैरे यांनी केली. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. असे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी हा बंद पुकारलेला आहे, असाही आरोप अ‍ॅड. खैरे यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही तर संविधानाच्या विरोधात असून, हा कायदा भारतीय संविधानाचे ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘नागरिकत्व’ प्रकरण-२ चे उल्लंघन करतो. त्यामुळे हा संविधान विरोधी कायदा रद्द करण्यासाठी नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाला पोस्टकार्डद्वारे निवेदन पाठवावे, असेही आवाहन अ‍ॅड. खैरे यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेला प्रदीप फुलझेले, अजय डंबारे, चंद्रभागा पानतावणे उपस्थित होते.२६ ला सन्मान समारोहसंविधान संरक्षण मंचतर्फे येत्या २६ जानेवारीला संविधान सन्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता संविधान चौक येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. के.जे. रोही व भारतीय संविधानाचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद खैरे उपस्थित राहणार आहेत.

 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMaharashtraमहाराष्ट्रagitationआंदोलन