शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

नागपूरजवळील मोवाडचा आज काळा दिवस; २०४ लोकांना मिळाली होती जलसमाधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 17:53 IST

एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी मोवाडवासियांच्या अंगावर शहारे उभे राहतात. 

सुरभी शिरपूरकर

नागपूर : ३० जुलै १९९१ ची ती पहाट.... आजपासून ठीक ३१ वर्षांपूर्वीची गोष्ट...  नागपूर जिल्ह्याच्या मोवाड येथे ३१ वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात २०४ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली असली तरी जखमा मात्र आजही ताज्या आहेत. आजपर्यंत या गावाने असंख्य महापूर पाहले. परंतु १९९१ च्या महापुराने असंख्य वेदना आणि आठवणी आजही कायम आहे. नदीच्या काठावरील १२ गावांवर वर्धा नदी कोपली होती. या नदीत २०४ जणांना जलसमाधी मिळाली होती. मोवाडवासी आजचा दिवस  काळादिवस म्हणून पाळतात.

रात्रभर सलग झालेल्या तुफान मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. दिवस उजडण्या आधीच संपूर्ण मोवाड गाव जलमग्न झाले होते. कुणालाही सावरण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती. त्यादिवशी पाहिल्यांदा मोवाडवासीयांनी वर्धा नदीचे रोद्ररूप बघायला मिळाले होते. त्यानंतर या गावाने अनेक पूर अनुभवले आहेत. मात्र १९९१ च्या महापूराने दिलेल्या असंख्य वेदना आजही कायम आहेत. खवळलेल्या नदीने हजारोंच्या डोळ्यादेखत आपल्या स्नेही जणांना महापुराने कवेत घेत असल्याचे दृश्य आजही अनेकांच्या मनात ताजे आहे.

एकाच रात्री वर्धा नदीला आलेल्या महापुराने मोवाडला होत्याचे नव्हते केले होते. वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या १२ गावांवर वर्धा नदी कोपली होती. या घटनेत मोवाड येथील २०४ जणांना गिळंकृत केले होते. आज या घटनेला ३१ वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे उभे राहतात. 

मोवाड नगरपालिकेची स्थापना १७ मे १८६७ ला झाली. त्याला १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेशच्या सीमेवर मोवाड गाव नरखेड तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर आहे. येथील नगरपरिषद, स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास, चलेजाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडचा विणकरांची मोठी बाजारपेठ होती, सोबातचं इथली बैलबाजार देखील प्रसिद्ध आहे. येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे, मात्र महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे. 

महापूरामुळे जीवनाची घडी बिस्कटल्याची खंत लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येते. या विनाशाला तब्बल ३१ वर्षे पूर्ण होत असल्याने काळाने झडप मोवाडवासीयांवर घातली आणि निष्पाप २०४ लोकांना जलसमाधी मिळाली. म्हणून ३० जुलै रोज शनिवार काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो. ती काळरात्र वैऱ्याची ठरली. मृतदेहाचा सडा तीन - चार किलोमीटर पर्यंत पडला होता.  प्राणहाणी, वित्तहाणी मोठ्या प्रमाणात झाली होती, आरडा-ओरड आणि किंचाळ्याने आसमंत दणाणले होते. क्षणात संपूर्ण गाव नेस्तनाबूत झाले.

टॅग्स :Socialसामाजिकfloodपूरnagpurनागपूर