शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

विषप्रयोगाने वाघिण व दोन बछड्यांचा गेला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 21:25 IST

poisoning ,Tigress and two calves were killed, nagpur news पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काॅलरवाली वाघिणीसह तिचे दाेन बछडे मृतावस्थेत आढळून आले.

ठळक मुद्देउमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील प्रकार : एक संशयित आराेपीला अटक

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर/उमरेड : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काॅलरवाली वाघिणीसह तिचे दाेन बछडे मृतावस्थेत आढळून आले. शेजारीच एक गाईचे वासरू मृतावस्थेत आढळले आहे. विषबाधेने या वाघांचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत असून या प्रकरणात विषप्रयाेग करण्याच्या आराेपात शेजारील शेतमालकाला अटक करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाचवेळी वाघिण व बछडे मृतावस्थेत आढळल्याने वनविभागाचे धाबे दणाणले आहे.

कऱ्हांडला बिट परिसरात ठाणा तलावाजवळ कम्पार्टमेंट क्रमांक १४१५ येथील नवेगाव साधू शिवारात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान ही धक्कादायक बाब उजेडात आल्याने माेठीच खळबळ उडाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे. घटनास्थळी एका गाईच्या वासराची शिकार वाघिणीने केली असून त्यानंतरचा हा प्रकार घडल्याची विश्वसनीय माहिती आहे. याप्रकरणाच्या संपूर्ण बाबींचा शोध घेतला जात असून तीन ते चार दिवसापूवीर्ची ही घटना असावी असा कयास सुद्धा लावला जात आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत वन्यजीव आणि वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. मृतावस्थेत आढळलेल्या वाघिणीला तीन बछडे होते. यापैकी दोन छावे मृतावस्थेत आढळून आले. वाघिणीचा तिसराही छावा मृत पावल्याची भीती व्यक्त केली जात असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) आर. बी. गवई यांनी स्पष्ट केले. दरम्यान मृत जनावरावर विषप्रयाेग करूनच वाघांना मारण्यात आल्याचा संशय बळावला आहे. या प्रकरणात अभयारण्याच्या शेजारीच शेत असलेल्या शेतमालक दिवाकर नागाेकर नामक शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चाैकशी केली जात असल्याचे वनविभागाने सांगितले.

वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात दीड महिन्यापूर्वीच दाेन वाघांचा बळी गेला हाेता. वाघांच्या झुंजीत त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले हाेते. मात्र यावेळी विषप्रयाेगाने वाघिणीसह तिच्या दाेन बछड्यांच्या मृत प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. दाेन वाघाच्या मृत्यूनंतरही वनविभागाने गांभीर्याने या बाबीकडे लक्ष दिले नाही. वाघिणीची क्षेत्राची लढाई म्हणून अंग काढल्याची टीका केली जात आहे. वाघ शेतापर्यंत आले कसे किंवा जनावर जंगलात गेले कसे, ही बाब तपासण्याची तसदी घेतली नाही. वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळेच काॅलरवाली वाघिण व तिच्या बछड्यांचा हकनाक बळी गेल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त हाेत आहेत.

दाेन वर्षात १० वाघांचा बळी

उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात गेल्या दाेन वर्षात १० वाघांचा बळी गेला आहे. वाघ येथे टिकत का नाही, असे म्हटले जात असले तरी ही बाब गंभीर आहे. वाघांसाठी ही डेथ ट्रॅप आहे का, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींकडून उपस्थित हाेत आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीमागे घालून थातूरमातूर कारवाई केली जात असल्याची टीकाही व्याघ्र प्रेमींनी केली.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू