शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाच वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत ६४ टक्यांनी वाढ : वनविभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:25 AM

राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९० वरून व्याघ्रसंख्या पोहचली ३१२ वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वाघांच्या संख्येमध्ये मागील पाच वर्षात ६४ टक्यांनी वाढ झाल्याचा दावा वनविभागाने केला आहे. २०१४ साली राज्यात १९० वाघ होते. त्यात वाढ होवून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. या सोबतच देशातील वाघांच्या संख्येतही वाढ झाल्याची नोंद आहे. २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.महाराष्ट्रात २००६ साली १०३ वाघ होते. ते २०१० मध्ये वाढून १६८ झाले. २०१४ साली झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून १९० झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२ इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे.देशातील वाघांची संख्या २ हजार ९६७भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ साली झाली, तेव्हा देशात १ हजार ४११ वाघ होते. सन २०१० साली दुसऱ्या गणनेमध्ये १ हजार ७०६, सन २०१४ साली तिसºया गणनेमध्ये २ हजार २२६ वाघ होते. आता २०१८ च्या व्याघ्रगणनेनंतर देशात २ हजार ९६७ वाघांची नोंद झाली आहे.व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा याउद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवतांना मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. त्याचे हे फलित आहे.सुधीर मुनगंटीवार, वनमंत्रीव्याघ्रसंवर्धन आणि राज्येराज्य             पूर्वीची संख्या           आताची संख्यामध्यप्रदेश       ३०८                      ५२६कर्नाटक         ४०६                     ५२४उत्तराखंड       ३४०                     ४४२महाराष्ट           १९०                     ३१२तामिळनाडू     २२९                     २६४

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग