शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘टायगर हिल’ने दिली लढण्याची जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:38 IST

उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर्व जवानांना लढण्याची जिद्द दिली व याच बळावर देशाने भगिरथ यश खेचून आणले. ही भावना आहे कारगीलच्या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या व सध्या नागपुरात एका खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या एका जवानाची.

ठळक मुद्देकारगील युद्धात जवानांनी अनुभवले देशाचे पाठबळ : युद्धभूमी आठवताच आजही अंगावर रोमांच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर्व जवानांना लढण्याची जिद्द दिली व याच बळावर देशाने भगिरथ यश खेचून आणले. ही भावना आहे कारगीलच्या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या व सध्या नागपुरात एका खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या एका जवानाची. कारगील विजय दिवसानिमित्त रोमांचक आठवणींना उजाळा देत असताना त्यांच्या चेहºयावरील उत्साह व डोळ्यातील भावनाच सर्वकाही सांगून जात होत्या. सैन्याच्या नियमांप्रमाणे नाव समोर येऊ नये या अटीवर त्यांनी प्रत्यक्ष युद्धामधील अनुभवांचे कथन केले.युद्धाच्या अखेरच्या क्षणात आमचे लक्ष्य ‘टायगर हिल’ हेच होते. तोफगोळ्यांचा ‘टायगर हिल’वर मारा करण्यात येत होता व वायुसेनेच्या विमानांनीदेखील आकाशातून मारा सुरू केला. त्यावेळी ‘टायगर हिल’ तोफगोळ्यांच्या माºयांमुळे अक्षरश: लाल झाल्यासारखी भासत होती. ज्या वेळी विजय मिळाला त्यावेळी सर्वांनाच आयुष्यभर पुरेल इतके समाधान लाभले होते. तो थरार, रोमांच मी अनुभवला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी आठवण संबंधित जवानाने सांगितली.तोफखाना पथकाने दिला आधारकारगील युद्धाला सुरुवात झाल्यानंतर नेमका शत्रू कुठे आहे, याचा अंदाज येत नव्हता. वातावरणदेखील प्रतिकूल झाले होते. ‘स्नो-फॉल’मुळे कडाक्याची थंडी होती अन् मोजकेच कपडे असल्यामुळे वर चढण्यास अडचणी येत होत्या. आधार होता ते तोफखान्याच्या पथकाचा. त्यांच्याकडून शत्रूवर मारा सुरू होता व त्याच्या ‘कव्हर’मध्ये आम्ही वर चढण्याचा प्रयत्न करत होतो. कारगील युद्धाच्या सुरुवातीला आम्हाला संदेश आला की लाडू आणि बर्फीचे ट्रक येत आहेत. सुरुवातीला नेमके काय होत आहे कळालेच नाही. परंतु ज्यावेळी ट्रक प्रत्यक्षात आले तेव्हा त्यात तोफखान्याला लागणारा दारूगोळा होता.देशाचे भरभरून प्रेम मिळालेसीमेवर लढणाºया जवानांबाबत सामान्यांना काहीही घेणे-देणे नसते, अशी ओरड असते. मात्र आम्हाला आजपर्यंत असा कधीही अनुभव आला नाही. कारगील युद्धात आम्हाला सुरुवातीला जेवणाची अडचण गेली होती, मात्र नंतर देशभरातून मदत आली. डोळ्यासमोर सहकारी शहीद होत असतानादेखील नागरिकांच्या प्रेमातूनच आत्मविश्वास कायम राहिला, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनnagpurनागपूर