शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘टायगर हिल’ने दिली लढण्याची जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:38 IST

उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर्व जवानांना लढण्याची जिद्द दिली व याच बळावर देशाने भगिरथ यश खेचून आणले. ही भावना आहे कारगीलच्या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या व सध्या नागपुरात एका खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या एका जवानाची.

ठळक मुद्देकारगील युद्धात जवानांनी अनुभवले देशाचे पाठबळ : युद्धभूमी आठवताच आजही अंगावर रोमांच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उंचावर बसलेला शत्रू, प्रतिकूल हवामान, साधनसामुग्री पोहोचण्यात येणारी अडचण अन् डोळ्यासमोर शहीद होणारे सहकारी जवान व अधिकारी. सर्व बाबी विरोधात असतानादेखील भारतीय जवानांचे संकल्प अढळ होता. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे अक्षरश: लाल झालेली ‘टायगर हिल’नेच सर्व जवानांना लढण्याची जिद्द दिली व याच बळावर देशाने भगिरथ यश खेचून आणले. ही भावना आहे कारगीलच्या युद्धात प्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या व सध्या नागपुरात एका खासगी संस्थेत कार्यरत असलेल्या एका जवानाची. कारगील विजय दिवसानिमित्त रोमांचक आठवणींना उजाळा देत असताना त्यांच्या चेहºयावरील उत्साह व डोळ्यातील भावनाच सर्वकाही सांगून जात होत्या. सैन्याच्या नियमांप्रमाणे नाव समोर येऊ नये या अटीवर त्यांनी प्रत्यक्ष युद्धामधील अनुभवांचे कथन केले.युद्धाच्या अखेरच्या क्षणात आमचे लक्ष्य ‘टायगर हिल’ हेच होते. तोफगोळ्यांचा ‘टायगर हिल’वर मारा करण्यात येत होता व वायुसेनेच्या विमानांनीदेखील आकाशातून मारा सुरू केला. त्यावेळी ‘टायगर हिल’ तोफगोळ्यांच्या माºयांमुळे अक्षरश: लाल झाल्यासारखी भासत होती. ज्या वेळी विजय मिळाला त्यावेळी सर्वांनाच आयुष्यभर पुरेल इतके समाधान लाभले होते. तो थरार, रोमांच मी अनुभवला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी आठवण संबंधित जवानाने सांगितली.तोफखाना पथकाने दिला आधारकारगील युद्धाला सुरुवात झाल्यानंतर नेमका शत्रू कुठे आहे, याचा अंदाज येत नव्हता. वातावरणदेखील प्रतिकूल झाले होते. ‘स्नो-फॉल’मुळे कडाक्याची थंडी होती अन् मोजकेच कपडे असल्यामुळे वर चढण्यास अडचणी येत होत्या. आधार होता ते तोफखान्याच्या पथकाचा. त्यांच्याकडून शत्रूवर मारा सुरू होता व त्याच्या ‘कव्हर’मध्ये आम्ही वर चढण्याचा प्रयत्न करत होतो. कारगील युद्धाच्या सुरुवातीला आम्हाला संदेश आला की लाडू आणि बर्फीचे ट्रक येत आहेत. सुरुवातीला नेमके काय होत आहे कळालेच नाही. परंतु ज्यावेळी ट्रक प्रत्यक्षात आले तेव्हा त्यात तोफखान्याला लागणारा दारूगोळा होता.देशाचे भरभरून प्रेम मिळालेसीमेवर लढणाºया जवानांबाबत सामान्यांना काहीही घेणे-देणे नसते, अशी ओरड असते. मात्र आम्हाला आजपर्यंत असा कधीही अनुभव आला नाही. कारगील युद्धात आम्हाला सुरुवातीला जेवणाची अडचण गेली होती, मात्र नंतर देशभरातून मदत आली. डोळ्यासमोर सहकारी शहीद होत असतानादेखील नागरिकांच्या प्रेमातूनच आत्मविश्वास कायम राहिला, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनnagpurनागपूर