बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र गणना
By Admin | Updated: May 9, 2014 01:12 IST2014-05-08T22:06:32+5:302014-05-09T01:12:34+5:30
वन विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ व १५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र प्रगणना करण्यात येत आहे. यासाठी वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह मानसिंगदेव, बोर, उमरेड कर्हांडला व टिपेश्वर अभयारण्यात तयारी सुरू केली आहे.

बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र गणना
वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह : वन विभागाची तयारी
नागपूर : वन विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही १४ व १५ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला व्याघ्र प्रगणना करण्यात येत आहे. यासाठी वन्यजीव विभागाने पेंच व्याघ्र प्रकल्पासह मानसिंगदेव, बोर, उमरेड कर्हांडला व टिपेश्वर अभयारण्यात तयारी सुरू केली आहे. जंगलातील पाणवठ्याशेजारी मचाण तयार केल्या जात आहेत.
वन विभागाच्या वेळापत्रकानुसार येत्या १४ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. यानंतर रात्रभर जंगलातील मचाणीवर बसून वाघासह विविध वन्यजीवांची प्रगणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यात वन्यजीवप्रेमींना प्रत्येक सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये या प्रगणनेविषयी प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छूकांकडून अर्ज मागविले जात आहे. त्यानुसार वन्यजीव विभागाकडे आतापर्यंत सुमारे १५० पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या विशेष प्रगणनेसाठी वन विभागाने एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार या प्रगणनेत सहभागी होणार्यांना त्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे लागेल. वन विभागाच्या नियमावलीनुसार प्रत्येक मचाणीवरील वन्यजीवप्रेमींसोबत एक वन विभागाचा प्रतिनिधी राहणार आहे. शिवाय मचाणवर बसल्यानंतर कुणालाही एकदुसर्यांशी बोलता येणार नाही. तसेच रात्रीला सर्च लाईट, पॉलिथीन वा बॅग सोबत बाळगता येणार नाही. सोबतच मोबाईलमधील कॅमेर्याचा फ्लॅशचा उपयोग करू नये. अशाही सूचना देण्यात आल्या आहे. यापूर्वी केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या विशिष्ट पद्घतीनुसार गत २०१० व २०१४ मध्ये देशभरात व्याघ्र प्रगणना करण्यात आली आहे. तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातूनही वाघांची अचूक आकडेवारी गोळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र असे असताना, बुद्ध पौर्णिमेच्या प्रगणनेचे एक वेगळे महत्त्व आहे.