शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

जगण्या-मरण्याचा थरारक संघर्ष अन् मुर्दाड प्रशासनाचा भयावह चेहरा; तो शरिराभोवती ज्वाळा घेऊनच बाहेर आला

By नरेश डोंगरे | Updated: June 13, 2024 23:22 IST

कानाचे पडदे फाडणारा भयानक स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे पाहून बाजुला काम करणारे कामगार तिकडे धावले. तेवढ्यात ज्वाळा अंगाभोवती लपेटून एक जण जिवाच्या आकांताने धडपडत बाहेर आला अन् समोर येऊन कोसळला.

नागपूर : कानाचे पडदे फाडणारा भयानक स्फोट झाला. त्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे पाहून बाजुला काम करणारे कामगार तिकडे धावले. तेवढ्यात ज्वाळा अंगाभोवती लपेटून एक जण जिवाच्या आकांताने धडपडत बाहेर आला अन् समोर येऊन कोसळला. जेथे स्फोट झाले तेथे अनेक जण कोळसा झाल्यागत पडून होते. काही जण जीवघेण्या वेदनांनी मदतीसाठी ओरडत होते. काळीज हेलावणारे दृष्य होते. त्यामुळे जीवाची बाजी लावून कामगारांनी त्यांना स्फोटाच्या ठिकाणाहून बाहेर काढले. नंतर त्यांना तात्काळ उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेसाठी ठिकठिकाणी फोन लावले. मात्र, घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचायला तब्बल पावणेदोन तास लागले. तेवढ्या वेळेत जगण्या-मरण्याचा भयानक संघर्ष आणि मुर्दाड प्रशासनाचा भयावह चेहरा-वजा-पैलू गुरुवारी धामना गावातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कामगारांनी बघितला. त्यांनी त्यासंबंधाने दिलेली माहिती अंगावर काटा उभा करणारी ठरावी.

या कंपनीच्या परिसरात वेगवेगळ्या ईमारतीत वेगवेगळे काम चालते. सेफ्टी फ्यूजचे काम सुरू असलेल्या न्यू मायक्रोकॉड प्लँटमध्ये दुपारी १२.४५ वाजता भीषण स्फोट झाला. त्याची तीव्रता एवढी जास्त होती की ईमारतीच्या स्लॅबचा मधला भाग तुटून खाली पडला. आजुबाजुच्या झाडांना आग लागली. जेथे स्लॅबच तुटून पडली, झाडांना आग लागली तेथे काम करणाऱ्या हाडामासाच्या जिवाचे काय झाले असेल, त्याची कल्पनाच केलेली बरी. दरम्यान, कंपनीच्या दुसऱ्या विभागात यावेळी ७० ते ८० जण काम करीत होते. कान फाडणारे आवाज ऐकून ते सर्व बाहेर आले. जेथे स्फोट झाला, आग जळत होती, अशा ठिकाणाहून एक जण आगीच्या ज्वाळा लपेटून बाहेर धावत आला. त्याला कसेबसे विझवून बाजुला झोपवले. एकाच्या हाताचा पंजा मनगटासह तुटून बाजुला पडला होता. आतमध्ये स्फोटामुळे स्लॅब थोडा थोड पडतच होता अन् आगही सुरू होती. त्यात जिवाच्या आकांताने ओरडणारे सहकारी कामगार बघून जिवाची पर्वा न करता सुदाम कदम, दीपक वासेकर, अविनाश पारधी, नितेश मोदरे, राजू पारधी, किशोर टोंगे या शेरदील कामगारांनी जिवाची पर्वा न करता जखमींना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेसाठी ठिकठिकाणी फोन लावले. मात्र, नागपूर शहरापासून केवळ २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला दीड ते पावणेदोन तास लागले. तोपर्यंत जखमी जीव वेदनांनी तडफडत होते. त्यातील सहा वर्षांच्या चिमुकलीची आई असलेली शितल क्षीरसागर चटप 'मला लवकर दवाखान्यात घेऊन चला. खूप वेदना होत आहेत', असे वारंवार ओरडून सांगत होती. तिच्यासारखीच अवस्था बाकी सर्वांची होती, मात्र वेदनांचा अतिरेक होत असल्याने तेे बोलू शकत नव्हते. अखेर सव्वादोन अडीचच्या सुमारास रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोवर शितलसह सहा जणांचे जीव गेले होते.

विशेष म्हणजे, स्फोटकांचे काम चालणाऱ्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका सज्ज असायला हवी. मात्र, ती येथे नव्हतीच. कळस म्हणजे, या घटनेनंतर कंपनी प्रशासनाकडून तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे कसलेही प्रयत्न झाले नव्हते.ईकडे आक्रोश अन् तिकडचा निरोप

सायंकाळी ६ च्या सुमारास कंपनी परिसरात प्रचंड रोषाचे वातावरण असताना श्रद्धा वनराज पाटील (वय २२, रा. धामना) या तरुणीवर खासगी ईस्पितळातून पैशाअभावी चांगले उपचार होत नसल्याचा निरोप आला अन् नागरिकांच्या रोषाचा भडका उडाला. त्यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष सुनीता गावंडे यांनी 'तुम्ही उपचार करा', असे म्हणत रुग्णलयात रक्कम जमा केली.मुलगी अन् वडिल

घरची सांज भागविण्यासाठी शंकरराव अलोने आणि त्यांची मुलगी मोनाली या धोक्याच्या ठिकाणी काम करीत होते. मोनालीची शिफ्ट संपली की शंकरराव कामावर जायचे. आज मात्र स्फोट ऐकून ते कारखान्यात गेले तेव्हा मोनालीचे निर्जिव काळेठिक्कर शरिरच त्यांना बघायला मिळाले.कसे झाले सुरक्षेचे ऑडिट

स्फोटकांच्या कंपनीत काय सुरक्षा असाव्या, कोणते धोके नसावे, यासाठी वेळोवेळी सुरक्षेचे ऑडिट संबंधित अधिकाऱ्यांकडून केले जाते. जेथे अग्निशमन यंत्रणा अन् आणीबाणीच्या वेळी मदतीची व्यवस्थाच नाही, अशा या कंपनीचे सुरक्षेचे ऑडिट कोणत्या अधिकाऱ्याने केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.