शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

महावितरणची तीन वर्षांनंतर भरती प्रक्रियाच झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:03 IST

वीज वितरण कंपनीने महावितरणमध्ये मागील तीन वर्षात एकही पदभरती केली नसताना उलट नव्या पदभरती प्रक्रियेमध्ये ५४२ पदे कमी केली आहेत.

ठळक मुद्देनव्या भरतीत ५४२ पदे गोठविली उपकेंद्र सहायकांच्या पदांवर गंडांतर

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात बेकारीचा प्रश्न गंभीर झाला असल्याने केंद्र व राज्य सरकार नव्याने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नरत आहे. असे असले तरी सरकारी कंपन्या मात्र विरोधातील मार्ग अवलंबत आहेत. वीज वितरण कंपनीने महावितरणमध्ये मागील तीन वर्षात एकही पदभरती केली नसताना उलट नव्या पदभरती प्रक्रियेमध्ये ५४२ पदे कमी केली आहेत.उपकेंद्र सहायकांच्या पदांसंदर्भात हे घडले आहे. महावितरणने या पदांच्या भरतीसाठी २०१६ मध्ये अर्ज मागविले होते. एकूण दोन हजार ५४२ रिक्त पदे दर्शाविली होती. यात खुल्या प्रवर्गातील एक हजार ३७८ पदे होती. उर्वारित पदे आरक्षणाच्या नियमानुसार राखीव होती. दरम्यानच्या काळात मराठा आरक्षण आणि प्रशासकीय तांत्रिक अडचणीत ही प्रक्रिया अडली. आता तीन वर्षांनंतर महावितरणला त्या भरती प्रक्रियेची आठवण आली. कंपनीने सोमवारी २०१६ मधील ही भरती प्रक्रियाच रद्द केली. या संदर्भात अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही, मात्र त्यांचे शुल्क परत केले जाईल. ही प्रक्रिया महावितरणच्या वेबसाईटवर लवकरच दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. अर्जदारांना यासाठी आपल्या बँक खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागणार आहे. या घोषणेसोबतच महावितरणने उपकेंद्र सहायकांच्या भरतीसाठी नवीन प्रक्रिया जाहीर केली आहे. यानुसार नव्याने दोन हजार पदे भरली जाणार असून त्यातील ५४७ सामान्य वर्गासाठी असतील.मात्र २०१६ मध्ये या पदांसाठी २ हजार ५४२ पदांची जाहिरात असताना यावेळी फक्त दोन हजार पदभरती होणार आहे. त्यामुळे उपकेंद्र सहायकांची उर्वारित ५४७ पदे का कमी झाली, याबद्दल अनभिज्ञता आहे.

मराठा आरक्षण कायममराठा समाजाला विशेष मागास घटक म्हणून आरक्षण दिले आहे. नव्या प्रक्रियेमध्ये या घटकांसाठी २९ पदे आरक्षित आहेत. मागील पदभरती २ हजार ५४२ पदांची असतानाही या घटकांसाठी एवढीच पदे आरक्षित होती. सामान्य प्रवर्गावर या प्रक्रियेमध्ये अन्याय स्पष्ट दिसत आहे. मागील भरतीमध्ये १ हजार ३८७ पदे सामान्य वर्गासाठी होती. यावेळी मात्र ही संख्या ५४७ आहे.

अधिकाऱ्यांकडून मौनमहावितरणचे अधिकारी या विषयावर उघडपणे काहीच बोलायला तयार नाहीत. नव्या प्रक्रियेमध्ये पदांची संख्या घटल्याचे कंपनीने मान्य केले असले तरी, ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया असल्याने उर्वारित पदांसाठीही भविष्यात अर्ज मागविले जातील, अशी समजूत घालण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण