शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

महावितरणची तीन वर्षांनंतर भरती प्रक्रियाच झाली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 13:03 IST

वीज वितरण कंपनीने महावितरणमध्ये मागील तीन वर्षात एकही पदभरती केली नसताना उलट नव्या पदभरती प्रक्रियेमध्ये ५४२ पदे कमी केली आहेत.

ठळक मुद्देनव्या भरतीत ५४२ पदे गोठविली उपकेंद्र सहायकांच्या पदांवर गंडांतर

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात बेकारीचा प्रश्न गंभीर झाला असल्याने केंद्र व राज्य सरकार नव्याने रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नरत आहे. असे असले तरी सरकारी कंपन्या मात्र विरोधातील मार्ग अवलंबत आहेत. वीज वितरण कंपनीने महावितरणमध्ये मागील तीन वर्षात एकही पदभरती केली नसताना उलट नव्या पदभरती प्रक्रियेमध्ये ५४२ पदे कमी केली आहेत.उपकेंद्र सहायकांच्या पदांसंदर्भात हे घडले आहे. महावितरणने या पदांच्या भरतीसाठी २०१६ मध्ये अर्ज मागविले होते. एकूण दोन हजार ५४२ रिक्त पदे दर्शाविली होती. यात खुल्या प्रवर्गातील एक हजार ३७८ पदे होती. उर्वारित पदे आरक्षणाच्या नियमानुसार राखीव होती. दरम्यानच्या काळात मराठा आरक्षण आणि प्रशासकीय तांत्रिक अडचणीत ही प्रक्रिया अडली. आता तीन वर्षांनंतर महावितरणला त्या भरती प्रक्रियेची आठवण आली. कंपनीने सोमवारी २०१६ मधील ही भरती प्रक्रियाच रद्द केली. या संदर्भात अर्जदारांना स्वतंत्रपणे कळविले जाणार नाही, मात्र त्यांचे शुल्क परत केले जाईल. ही प्रक्रिया महावितरणच्या वेबसाईटवर लवकरच दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. अर्जदारांना यासाठी आपल्या बँक खात्यासंदर्भात माहिती द्यावी लागणार आहे. या घोषणेसोबतच महावितरणने उपकेंद्र सहायकांच्या भरतीसाठी नवीन प्रक्रिया जाहीर केली आहे. यानुसार नव्याने दोन हजार पदे भरली जाणार असून त्यातील ५४७ सामान्य वर्गासाठी असतील.मात्र २०१६ मध्ये या पदांसाठी २ हजार ५४२ पदांची जाहिरात असताना यावेळी फक्त दोन हजार पदभरती होणार आहे. त्यामुळे उपकेंद्र सहायकांची उर्वारित ५४७ पदे का कमी झाली, याबद्दल अनभिज्ञता आहे.

मराठा आरक्षण कायममराठा समाजाला विशेष मागास घटक म्हणून आरक्षण दिले आहे. नव्या प्रक्रियेमध्ये या घटकांसाठी २९ पदे आरक्षित आहेत. मागील पदभरती २ हजार ५४२ पदांची असतानाही या घटकांसाठी एवढीच पदे आरक्षित होती. सामान्य प्रवर्गावर या प्रक्रियेमध्ये अन्याय स्पष्ट दिसत आहे. मागील भरतीमध्ये १ हजार ३८७ पदे सामान्य वर्गासाठी होती. यावेळी मात्र ही संख्या ५४७ आहे.

अधिकाऱ्यांकडून मौनमहावितरणचे अधिकारी या विषयावर उघडपणे काहीच बोलायला तयार नाहीत. नव्या प्रक्रियेमध्ये पदांची संख्या घटल्याचे कंपनीने मान्य केले असले तरी, ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया असल्याने उर्वारित पदांसाठीही भविष्यात अर्ज मागविले जातील, अशी समजूत घालण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण