तीन वाहन चाेरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:54+5:302021-06-24T04:07:54+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वेगवेगळ्या भागातून वाहन चाेरी करणाऱ्या तीन अट्टल चाेरट्यांना नवीन कामठी पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ...

Three vehicle thieves arrested | तीन वाहन चाेरट्यांना अटक

तीन वाहन चाेरट्यांना अटक

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : वेगवेगळ्या भागातून वाहन चाेरी करणाऱ्या तीन अट्टल चाेरट्यांना नवीन कामठी पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चाेरीच्या तीन दुचाकी वाहनांसह ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि.२१) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये शाहरूख शेख माेहम्मद आसिफ (२०, रा. सत्रापूर, कन्हान, ता. पारशिवनी), सूरज ऊर्फ सज्जा अशाेक सहारे (२०, रा. येरखेडा, कामठी) व हर्षल माैसम बडगेला (१८, रा. जे. पी. नगर, कामठी) यांचा समावेश आहे. आराेपींनी रनाळा येथील रमाकांत नानाजी लुटे (४५) यांची एमएच-४०/एजे-७७७४ क्रमांकाची ॲक्टिव्हा दुचाकी चाेरून नेली. याबाबत रमाकांत लुटे यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पाेलिसांनी भादंवि कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. दरम्यान, डीबी पाेलीस पथकाने तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज व गाेपनीय माहितीच्या आधारे सदर तिन्ही आराेपींना ताब्यात घेतले. आराेपींची कसून चाैकशी केली असता, लुटे यांची ॲक्टिव्हा दुचाकी तसेच धंताेली, नागपूर भागातून एमएच-४०/बीटी-४७३२ व एमएच-४९/एएक्स-८३९६ क्रमांकाच्या दुचाकी चाेरी केल्याची आराेपींनी कबुली दिली. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीची तीन दुचाकी वाहने जप्त केली.

आराेपींकडून आणखी वाहन चाेरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे ठाणेदार विजय मालचे यांनी सांगितले. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पाेलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, प्रमाेद वाघ, मनाेहर राऊत, नीलेश यादव, ललित शेंडे, उपेंद्र आकाेटकर यांच्या पथकाने केली.

===Photopath===

220621\3531img-20210622-wa0154.jpg

===Caption===

अट्टल वाहन चोरट्यांना अटकेची कामगिरी बजावणारे पोलिस पथक

Web Title: Three vehicle thieves arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.