शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

खरिपाच्या तोंडावर तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 31, 2014 00:57 IST

वरोरा तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी गळफास लावून तर अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील हरदोली येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

दोन दिवसांत तीन घटना : मागील महिन्यात झाला होता मुलींचा विवाहवरोरा (जि. चंद्रपूर)/धारणी (जि. अमरावती) : वरोरा तालुक्यातील  दोन शेतकर्‍यांनी गळफास  लावून तर अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील हरदोली येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन  करून आत्महत्या केली. रबी हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने शेतकर्‍यांची  स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. जामणी येथील अंनत बळीराम जेऊरकर (४५) तसेच ताडगव्हाण येथील विजय अण्णाजी  बदखल (४५) असे मृत शेतकर्‍यांचे नाव आहे. अनंत जेऊरकर या शेतकर्‍याच्या आईच्या  नावावर शेती आहे. या शेतीमध्ये कुटुंबीयाचे भागत नसल्याने अनंत दुसर्‍या शेतकर्‍याकडे चाखरी  करीत होता. त्याला शासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले.  घरकुलाचे अर्धे बांधकाम झाले  आहे. मात्र अनुदान मिळाले नसल्याने पुढील बांधकाम कसे करावे, या विवंचनेत तो होता.  त्याच्यावर खासगी कर्जही होते. यातच त्याने बुधवारी शेतातील झाडाला गळफास लावून  आत्महत्या केली.  दुसर्‍या घटनेत ताडगव्हाण येथे घडली. विजय अण्णाजी बदखल (४५) या  शेतकर्‍याकडे पाच एकर शेती आहे. मागील महिन्यातच दोन मुलींचा विवाह केला. यावेळी  राष्ट्रीयकृत बँकेकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. मागील काही वर्षांंपासून अतवृष्टी व  सततची नापिकी यामुळे विवंचनेत होता. यात गुरुवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन  आत्महत्या केली. या शेतकर्‍याने मागील महिन्यातच आपल्या दोन मुलींचा विवाह केला, हे विशेष.धारणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकेच्या अडीच लाखाच्या पीक कर्जाची परतफेड करणे  अशक्य झाल्याने हरदोली येथील शेतकरी रामनिवास गेंदालाल जैस्वाल (४0) यांनी विषारी  औषध प्राशन करुन आत्महत्या केली.  गतवर्षी संततधार पावसामुळे पिके नष्ट झाली. त्यामुळे  कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न जैस्वाल यांना पडला होता. वैफल्यग्रस्त स्थितीत विषारी  औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी अमरावती येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले  होते. परंतु उपचारादरम्यान गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. (तालुका प्रतिनिधी)