शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

खरिपाच्या तोंडावर तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 31, 2014 00:57 IST

वरोरा तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी गळफास लावून तर अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील हरदोली येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली.

दोन दिवसांत तीन घटना : मागील महिन्यात झाला होता मुलींचा विवाहवरोरा (जि. चंद्रपूर)/धारणी (जि. अमरावती) : वरोरा तालुक्यातील  दोन शेतकर्‍यांनी गळफास  लावून तर अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यातील हरदोली येथील एका शेतकर्‍याने विष प्राशन  करून आत्महत्या केली. रबी हंगामाच्या तोंडावर शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने शेतकर्‍यांची  स्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. जामणी येथील अंनत बळीराम जेऊरकर (४५) तसेच ताडगव्हाण येथील विजय अण्णाजी  बदखल (४५) असे मृत शेतकर्‍यांचे नाव आहे. अनंत जेऊरकर या शेतकर्‍याच्या आईच्या  नावावर शेती आहे. या शेतीमध्ये कुटुंबीयाचे भागत नसल्याने अनंत दुसर्‍या शेतकर्‍याकडे चाखरी  करीत होता. त्याला शासनाकडून घरकूल मंजूर करण्यात आले.  घरकुलाचे अर्धे बांधकाम झाले  आहे. मात्र अनुदान मिळाले नसल्याने पुढील बांधकाम कसे करावे, या विवंचनेत तो होता.  त्याच्यावर खासगी कर्जही होते. यातच त्याने बुधवारी शेतातील झाडाला गळफास लावून  आत्महत्या केली.  दुसर्‍या घटनेत ताडगव्हाण येथे घडली. विजय अण्णाजी बदखल (४५) या  शेतकर्‍याकडे पाच एकर शेती आहे. मागील महिन्यातच दोन मुलींचा विवाह केला. यावेळी  राष्ट्रीयकृत बँकेकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. मागील काही वर्षांंपासून अतवृष्टी व  सततची नापिकी यामुळे विवंचनेत होता. यात गुरुवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन  आत्महत्या केली. या शेतकर्‍याने मागील महिन्यातच आपल्या दोन मुलींचा विवाह केला, हे विशेष.धारणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँंकेच्या अडीच लाखाच्या पीक कर्जाची परतफेड करणे  अशक्य झाल्याने हरदोली येथील शेतकरी रामनिवास गेंदालाल जैस्वाल (४0) यांनी विषारी  औषध प्राशन करुन आत्महत्या केली.  गतवर्षी संततधार पावसामुळे पिके नष्ट झाली. त्यामुळे  कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न जैस्वाल यांना पडला होता. वैफल्यग्रस्त स्थितीत विषारी  औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी अमरावती येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले  होते. परंतु उपचारादरम्यान गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. (तालुका प्रतिनिधी)