शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

याला म्हणतात नशीब...‘टीईटी’धारकांना उधई पावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 10:29 IST

टीईटीच्या आयोजनात झालेल्या गैरप्रकारामुळे परीक्षा परिषदेने २०१३ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात हजारावर शिक्षक, पण जमा झाले फक्त ४२ प्रमाणपत्रे

नागपूर : काहींना नशीबाने मिळते असे म्हटले जाते. अगदी तसेच नशीबवान नागपूर जिल्ह्यातील काही शिक्षक ठरले आहेत. शिक्षण विभागाचे रेकॉर्ड मागच्या अतिवृष्टीत आणि उधई लागल्याने खराब झाले. दरम्यान, तुपेंचा घोटाळा उघडकीस आला आणि टीईटी प्रमाणपत्र शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे निर्देश शिक्षकांना दिले गेले. जिल्ह्यात या कालावधीत हजारावर शिक्षक नियुक्त झाले असताना केवळ ४२ शिक्षकांचीच टीईटी प्रमाणपत्रे विभागाकडे सादर झाली. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या जन माहिती अधिकाऱ्यांनी टीईटी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर माहितीच्या अधिकारात ही माहिती दिल्याने संबंधित शिक्षक नशीबवान ठरले आहेत.

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीच्या आयोजनात झालेल्या गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. स्वॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचे संचालक डॉ. प्रीतेश देशमुख यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने आता गंभीर स्वरुप घेतले आहे. टीईटीच्या आयोजनात झालेल्या गैरप्रकारामुळे परीक्षा परिषदेने २०१३ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश महिन्याभरापूर्वी दिले होते. परंतु जिल्ह्यात केवळ ४२ शिक्षकांचेच प्रमाणपत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले. पण नागपूर जिल्ह्यात या कालावधीत नियुक्त झालेल्या शिक्षकांचा आकडा १ हजारावर आहे. त्यामुळे पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी टीईटी प्रमाणपत्र ४ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे पत्र काढले आहे.

गैरप्रकार करून नोकऱ्या

२०१२ नंतर राज्यात प्रशासन व संस्थाचालक यांनी संगनमत करून हजारो बोगस शिक्षकांची भरती केली. मुदतीत पास न झाल्यास नोकरी जाईल, या धास्तीमुळे या अपात्र शिक्षकांनी टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केला.

-संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन

-६०० ते ७०० फाईल गहाळ झाल्याचा संशय

२०१२ नंतर मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली. यातील बहुतांश नियुक्त्या अवैध आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यास अनेकांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे विभागाने रेकॉर्डच गहाळ केले आहे. अडचणीच्या किमान ६०० ते ७०० फाईल्स असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेकडे शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेच्या नस्ती असतात. त्यामुळे टीईटीची प्रमाणपत्रे व संबंधित शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध असायला पाहिजे. परंतु शाळेकडून अशी माहिती मागविणे म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनाचे टाईमपास धोरण आहे.

- महेश जोशी, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेना, नागपूर विभाग

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकjobनोकरी