शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

हजारोंची मानवी शृंखला : पर्यावरणासाठी संघटनांनी केला आवाज बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:30 IST

फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या मार्गासाठी शेकडो वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोड टाळा, फुटाळा तलाव स्वच्छ करावा, पाण्याचे स्रोत जिवंत करा, या मागण्यांसाठी विविध संघटना,पर्यावरणप्रेमी हजारोंच्या संख्येने फुटाळा तलावावर एकत्र आले. त्यांनी ‘भरत वन बचाना है’च्या घोषणा देऊन भव्य मानवी शृंखला करीत शेकडो वृक्ष तोडण्यास विरोध दर्शविला.

ठळक मुद्देवृक्षतोड टाळा, पर्यावरणाचे करा रक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटाळा तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी भरतनगर ते तेलंगखेडी हनुमान मंदिरापर्यंतच्या मार्गासाठी शेकडो वृक्ष तोडण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोड टाळा, फुटाळा तलाव स्वच्छ करावा, पाण्याचे स्रोत जिवंत करा, या मागण्यांसाठी विविध संघटना,पर्यावरणप्रेमी हजारोंच्या संख्येने फुटाळा तलावावर एकत्र आले. त्यांनी ‘भरत वन बचाना है’च्या घोषणा देऊन भव्य मानवी शृंखला करीत शेकडो वृक्ष तोडण्यास विरोध दर्शविला.फुटाळा तलावाचे सौंदर्यीकरण आणि म्युझिकल फाऊंटेन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पासाठी अ‍ॅप्रोच म्हणून भरतनगर, अमरावती रोड ते तेलंगखेडी हनुमान मंदिर हा नवीन रोड तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हा प्रस्तावित मार्ग भरतवन या वन परिसरातून होत जाणार आहे. त्यासाठी वन परिसरातील शेकडो झाडांची कटाई केली जाणार असून, अशी झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. चिन्हांकित करण्यात आलेली १५० च्यावर वृक्ष शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. या पुरातन झाडांसह लहान-मोठी दीड हजाराच्या जवळपास वृक्षांना मार्गासाठी तोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणाची मोठी हानी करणारा आहे. भरतवनच्या अधिवासात जवळपास १२० प्रजातींचे पक्षी आणि २२ मोरांचे वास्तव्य आहे. यामुळे निर्णयाने जैवविविधतेला हानी पोहचणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनानिमित्त फुटाळा तलावावर शहरातील हजारो पर्यावरणप्रेमी आणि संघटना सरसावल्या. यावेळी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, वनराईचे सचिव नीलेश खांडेकर, अजय पाटील, महिला व बाल कल्याण सभापती प्रगती पाटील, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, नरु जिचकार, पर्यावरणप्रेमी गोपाळराव ठोसर, अरविंद पाटील, भरतनगर नागरिक समितीचे जयदीप दास यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ७.३० वाजता विविध संघटनांसह हजारो नागरिक फुटाळा तलावावर गोळा झाले. त्यांनी तलावावर भव्य अशी मानवी शृंखला तयार केली. विकासाच्या नावावर पर्यावरणाची हानी पोहचविणारा प्रकल्प भविष्यात संकट निर्माण करणारा आहे. त्यामुळे सौंदर्यीकरणाला प्राधान्य देण्यापेक्षा पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून असा दुराग्रही प्रयत्न नागरिकांनी हाणून पाडावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.आंदोलनात ‘भारत वन बचाना है’, वृक्षतोड टाळा, पर्यावरणाचे रक्षण करा, ‘अपना वन, भारत वन, सेव्ह भारत वन’ आदी घोषणा दिल्या. ‘सेव्ह ट्री, सेव्ह भारतवन असे पोस्टर हातात घेऊन विविध संघटनांनी मानवी शृंखलेत सहभाग नोंदविला. जवळपास अर्धा तास नागरिकांनी भव्य मानवी शृंखला करून घोषणा देत आपल्या मागण्या रेटून धरल्या. यावेळी वनराई, भरतनगरचे नागरिक, सेव्ह अर्थ, ग्रीन व्हिजिल, गोरेवाडा जंगल ट्रॅकर्स, रोटरी क्लब, विदर्भ असोसिएशन, जेसीआय क्लब आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नव्या रस्त्याची गरज काय?फुटाळा तलावाला लागून एक मोठा रस्ता आहे. रविनगर चौक, सिव्हिल लाईन्स व सेमिनरी हिल्सकडूनही रस्ता आहे. वनराईच्या सदस्यांनी सतत २१ दिवस या मार्गांवरील वाहतुकीचे निरीक्षण केले. कुठल्याही रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होताना आढळले नाही. शहरात आधीच सिमेंटचे जंगल पसरले आहे. जे काही वृक्ष व वन परिसर राहिला आहे, तो टिकविणे आवश्यक आहे. असे असताना शेकडो वृक्षांची कत्तल करून नवीन मार्ग निर्माण करण्याची गरज काय, असा सवाल यावेळी पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला.विद्यार्थी अन् ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागफुटाळा तलावावर विविध पर्यावरणप्रेमी संघटना एकत्र आल्या असताना विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनीही आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. आंदोलनात सीडीएस स्कूल, मॉडर्न स्कूल, एलएडी कॉलेज, स्कूल ऑफ स्कॉलर्स, सरस्वती स्कूल, रायसोनी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय शहरातील विविध भागातील ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने मानवी शृंखलेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेले पालकही मानवी शृंखलेत सहभागी झाले होते. यावेळी हजारो नागरिक, विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले.

टॅग्स :agitationआंदोलनenvironmentवातावरण