शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सुधारणा नाही, वन कायदा कमजाेर करण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 12:32 IST

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवाद्यांचा तीव्र विराेध : देशभरातून हजाराे आक्षेप

निशांत वानखेडे

नागपूर : रेल्वे, संरक्षण विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जंगलामध्ये काेणताही प्रकल्प राबविण्यासाठी यानंतर पर्यावरणाशी संबंधित परवानगी घ्यावी लागणार नाही. या सुधारणेसह १९८०च्या वनसंवर्धन कायद्यात करण्यात आलेल्या दहा-बारा सुधारणांमुळे देशभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंताेष पसरला आहे. हा प्रकार म्हणजे कायदा आणि त्याचे उद्देश कमजाेर करण्याचे षडयंत्र असल्याची टीका पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यातील अनेक गाेष्टींना पर्यावरण कार्यकर्त्यांनी विराेध दर्शविला आहे. सरकारने सूचना व आक्षेप नाेंदविण्यासाठी महिनाभराचा अवधी देण्यात आला हाेता, ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. नव्या सुधारणा लागू केल्यास या विराेधात कायदेशीर भूमिका घेण्याचा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे. या सुधारणा केवळ काही उद्याेगपतींना फायदा पाेहोचविण्यासाठी करण्यात आल्याचा आराेप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

अमेंडमेंटमधील आक्षेप असलेले बिंदू

- घनदाट जंगलात कुठलेही सर्वेक्षण करण्यासाठी आता परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.

- ऑइल किंवा नॅचरल गॅसबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संरक्षित वनक्षेत्राच्या बाहेर ड्रिलिंग करण्याची परवानगी राहिल. ही ड्रिलिंग वनक्षेत्राच्या जमिनीखाली करता येईल. यामुळे भूजल स्तराला धक्का पाेहोचण्याचा आक्षेप आहे.

- वनक्षेत्रात संपत्ती असल्यास ०.५ हेक्टरमध्ये एक किमीपर्यंतचा रस्ता बनविण्यास परवानगी घ्यावी लागणार नाही. ही अट खासगी संस्थांनाही लागू राहिल.

- एखादी जमीन लीजवर देताना त्यावरील झाडांच्या कम्पेंसेटरी प्लॅन्टेशनसाठी प्रत्येक वेळी शुल्क भरणे बंधनकारक हाेते. यानंतर, दुसऱ्यांदा लीज वाढविताना हे शुल्क भरावे लागणार नाही.

- यासह इतरही सुधारणांना पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.

आक्षेप मागविताना केली चालाकी

पर्यावरण कार्यकर्ते शरद पालिवाल यांनी सांगितले, मंत्रालयाकडून सुधारणांवर सूचना व आक्षेप मागविताना चालाकी करण्यात आली. सुरुवातीला केवळ १५ दिवसांची मुदत देण्यात आली. विराेध हाेताच, पुन्हा १५ दिवस वाढविण्यात आले. सुरुवातीला केवळ इंग्रजी भाषेतच सुधारणांची माहिती देण्यात आली. आक्षेप नाेंदविण्यासाठी देण्यात आलेल्या ई-मेलमध्येही चूक करून दिशाभूल करण्यात आली. वनक्षेत्रात राहणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि सर्वात महत्त्वाचे येथे राहणाऱ्या आदिवासी बांधवांना काेणतीही माहिती न देता, त्यांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली करण्यात आली. या विराेधात न्यायालयात लढा देऊ, असा इशारा पालिवाल यांनी दिला.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणGovernmentसरकार