शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सुधारणा नाही, वन कायदा कमजाेर करण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 12:32 IST

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवाद्यांचा तीव्र विराेध : देशभरातून हजाराे आक्षेप

निशांत वानखेडे

नागपूर : रेल्वे, संरक्षण विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जंगलामध्ये काेणताही प्रकल्प राबविण्यासाठी यानंतर पर्यावरणाशी संबंधित परवानगी घ्यावी लागणार नाही. या सुधारणेसह १९८०च्या वनसंवर्धन कायद्यात करण्यात आलेल्या दहा-बारा सुधारणांमुळे देशभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंताेष पसरला आहे. हा प्रकार म्हणजे कायदा आणि त्याचे उद्देश कमजाेर करण्याचे षडयंत्र असल्याची टीका पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यातील अनेक गाेष्टींना पर्यावरण कार्यकर्त्यांनी विराेध दर्शविला आहे. सरकारने सूचना व आक्षेप नाेंदविण्यासाठी महिनाभराचा अवधी देण्यात आला हाेता, ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. नव्या सुधारणा लागू केल्यास या विराेधात कायदेशीर भूमिका घेण्याचा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे. या सुधारणा केवळ काही उद्याेगपतींना फायदा पाेहोचविण्यासाठी करण्यात आल्याचा आराेप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

अमेंडमेंटमधील आक्षेप असलेले बिंदू

- घनदाट जंगलात कुठलेही सर्वेक्षण करण्यासाठी आता परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.

- ऑइल किंवा नॅचरल गॅसबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संरक्षित वनक्षेत्राच्या बाहेर ड्रिलिंग करण्याची परवानगी राहिल. ही ड्रिलिंग वनक्षेत्राच्या जमिनीखाली करता येईल. यामुळे भूजल स्तराला धक्का पाेहोचण्याचा आक्षेप आहे.

- वनक्षेत्रात संपत्ती असल्यास ०.५ हेक्टरमध्ये एक किमीपर्यंतचा रस्ता बनविण्यास परवानगी घ्यावी लागणार नाही. ही अट खासगी संस्थांनाही लागू राहिल.

- एखादी जमीन लीजवर देताना त्यावरील झाडांच्या कम्पेंसेटरी प्लॅन्टेशनसाठी प्रत्येक वेळी शुल्क भरणे बंधनकारक हाेते. यानंतर, दुसऱ्यांदा लीज वाढविताना हे शुल्क भरावे लागणार नाही.

- यासह इतरही सुधारणांना पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.

आक्षेप मागविताना केली चालाकी

पर्यावरण कार्यकर्ते शरद पालिवाल यांनी सांगितले, मंत्रालयाकडून सुधारणांवर सूचना व आक्षेप मागविताना चालाकी करण्यात आली. सुरुवातीला केवळ १५ दिवसांची मुदत देण्यात आली. विराेध हाेताच, पुन्हा १५ दिवस वाढविण्यात आले. सुरुवातीला केवळ इंग्रजी भाषेतच सुधारणांची माहिती देण्यात आली. आक्षेप नाेंदविण्यासाठी देण्यात आलेल्या ई-मेलमध्येही चूक करून दिशाभूल करण्यात आली. वनक्षेत्रात राहणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि सर्वात महत्त्वाचे येथे राहणाऱ्या आदिवासी बांधवांना काेणतीही माहिती न देता, त्यांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली करण्यात आली. या विराेधात न्यायालयात लढा देऊ, असा इशारा पालिवाल यांनी दिला.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणGovernmentसरकार