शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारणा नाही, वन कायदा कमजाेर करण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 12:32 IST

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवाद्यांचा तीव्र विराेध : देशभरातून हजाराे आक्षेप

निशांत वानखेडे

नागपूर : रेल्वे, संरक्षण विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जंगलामध्ये काेणताही प्रकल्प राबविण्यासाठी यानंतर पर्यावरणाशी संबंधित परवानगी घ्यावी लागणार नाही. या सुधारणेसह १९८०च्या वनसंवर्धन कायद्यात करण्यात आलेल्या दहा-बारा सुधारणांमुळे देशभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंताेष पसरला आहे. हा प्रकार म्हणजे कायदा आणि त्याचे उद्देश कमजाेर करण्याचे षडयंत्र असल्याची टीका पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यातील अनेक गाेष्टींना पर्यावरण कार्यकर्त्यांनी विराेध दर्शविला आहे. सरकारने सूचना व आक्षेप नाेंदविण्यासाठी महिनाभराचा अवधी देण्यात आला हाेता, ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. नव्या सुधारणा लागू केल्यास या विराेधात कायदेशीर भूमिका घेण्याचा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे. या सुधारणा केवळ काही उद्याेगपतींना फायदा पाेहोचविण्यासाठी करण्यात आल्याचा आराेप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

अमेंडमेंटमधील आक्षेप असलेले बिंदू

- घनदाट जंगलात कुठलेही सर्वेक्षण करण्यासाठी आता परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.

- ऑइल किंवा नॅचरल गॅसबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संरक्षित वनक्षेत्राच्या बाहेर ड्रिलिंग करण्याची परवानगी राहिल. ही ड्रिलिंग वनक्षेत्राच्या जमिनीखाली करता येईल. यामुळे भूजल स्तराला धक्का पाेहोचण्याचा आक्षेप आहे.

- वनक्षेत्रात संपत्ती असल्यास ०.५ हेक्टरमध्ये एक किमीपर्यंतचा रस्ता बनविण्यास परवानगी घ्यावी लागणार नाही. ही अट खासगी संस्थांनाही लागू राहिल.

- एखादी जमीन लीजवर देताना त्यावरील झाडांच्या कम्पेंसेटरी प्लॅन्टेशनसाठी प्रत्येक वेळी शुल्क भरणे बंधनकारक हाेते. यानंतर, दुसऱ्यांदा लीज वाढविताना हे शुल्क भरावे लागणार नाही.

- यासह इतरही सुधारणांना पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.

आक्षेप मागविताना केली चालाकी

पर्यावरण कार्यकर्ते शरद पालिवाल यांनी सांगितले, मंत्रालयाकडून सुधारणांवर सूचना व आक्षेप मागविताना चालाकी करण्यात आली. सुरुवातीला केवळ १५ दिवसांची मुदत देण्यात आली. विराेध हाेताच, पुन्हा १५ दिवस वाढविण्यात आले. सुरुवातीला केवळ इंग्रजी भाषेतच सुधारणांची माहिती देण्यात आली. आक्षेप नाेंदविण्यासाठी देण्यात आलेल्या ई-मेलमध्येही चूक करून दिशाभूल करण्यात आली. वनक्षेत्रात राहणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि सर्वात महत्त्वाचे येथे राहणाऱ्या आदिवासी बांधवांना काेणतीही माहिती न देता, त्यांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली करण्यात आली. या विराेधात न्यायालयात लढा देऊ, असा इशारा पालिवाल यांनी दिला.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणGovernmentसरकार