शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

सुधारणा नाही, वन कायदा कमजाेर करण्याचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 12:32 IST

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवाद्यांचा तीव्र विराेध : देशभरातून हजाराे आक्षेप

निशांत वानखेडे

नागपूर : रेल्वे, संरक्षण विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जंगलामध्ये काेणताही प्रकल्प राबविण्यासाठी यानंतर पर्यावरणाशी संबंधित परवानगी घ्यावी लागणार नाही. या सुधारणेसह १९८०च्या वनसंवर्धन कायद्यात करण्यात आलेल्या दहा-बारा सुधारणांमुळे देशभरातील पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंताेष पसरला आहे. हा प्रकार म्हणजे कायदा आणि त्याचे उद्देश कमजाेर करण्याचे षडयंत्र असल्याची टीका पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने वनसंवर्धन कायदा १९८० मध्ये सुधारणांचा प्रस्ताव सादर केला आहे. ज्यातील अनेक गाेष्टींना पर्यावरण कार्यकर्त्यांनी विराेध दर्शविला आहे. सरकारने सूचना व आक्षेप नाेंदविण्यासाठी महिनाभराचा अवधी देण्यात आला हाेता, ज्यावर नागपूर शहरातील ८-१० हजार पर्यावरण कार्यकर्त्यांसह देशभरातून हजाराे कार्यकर्त्यांनी आक्षेप नाेंदविला आहे. नव्या सुधारणा लागू केल्यास या विराेधात कायदेशीर भूमिका घेण्याचा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे. या सुधारणा केवळ काही उद्याेगपतींना फायदा पाेहोचविण्यासाठी करण्यात आल्याचा आराेप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

अमेंडमेंटमधील आक्षेप असलेले बिंदू

- घनदाट जंगलात कुठलेही सर्वेक्षण करण्यासाठी आता परवानगी घेण्याची गरज राहणार नाही.

- ऑइल किंवा नॅचरल गॅसबाबत सर्वेक्षण करण्यासाठी संरक्षित वनक्षेत्राच्या बाहेर ड्रिलिंग करण्याची परवानगी राहिल. ही ड्रिलिंग वनक्षेत्राच्या जमिनीखाली करता येईल. यामुळे भूजल स्तराला धक्का पाेहोचण्याचा आक्षेप आहे.

- वनक्षेत्रात संपत्ती असल्यास ०.५ हेक्टरमध्ये एक किमीपर्यंतचा रस्ता बनविण्यास परवानगी घ्यावी लागणार नाही. ही अट खासगी संस्थांनाही लागू राहिल.

- एखादी जमीन लीजवर देताना त्यावरील झाडांच्या कम्पेंसेटरी प्लॅन्टेशनसाठी प्रत्येक वेळी शुल्क भरणे बंधनकारक हाेते. यानंतर, दुसऱ्यांदा लीज वाढविताना हे शुल्क भरावे लागणार नाही.

- यासह इतरही सुधारणांना पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतला आहे.

आक्षेप मागविताना केली चालाकी

पर्यावरण कार्यकर्ते शरद पालिवाल यांनी सांगितले, मंत्रालयाकडून सुधारणांवर सूचना व आक्षेप मागविताना चालाकी करण्यात आली. सुरुवातीला केवळ १५ दिवसांची मुदत देण्यात आली. विराेध हाेताच, पुन्हा १५ दिवस वाढविण्यात आले. सुरुवातीला केवळ इंग्रजी भाषेतच सुधारणांची माहिती देण्यात आली. आक्षेप नाेंदविण्यासाठी देण्यात आलेल्या ई-मेलमध्येही चूक करून दिशाभूल करण्यात आली. वनक्षेत्रात राहणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि सर्वात महत्त्वाचे येथे राहणाऱ्या आदिवासी बांधवांना काेणतीही माहिती न देता, त्यांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली करण्यात आली. या विराेधात न्यायालयात लढा देऊ, असा इशारा पालिवाल यांनी दिला.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागenvironmentपर्यावरणGovernmentसरकार