अकरावी प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’

By Admin | Updated: June 19, 2014 01:03 IST2014-06-19T01:03:26+5:302014-06-19T01:03:26+5:30

शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे ते अकरावी प्रवेशाकडे. मंगळवारपासूनच अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व

'Thorn edge' for eleventh entry | अकरावी प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’

अकरावी प्रवेशासाठी ‘कांटे की टक्कर’

जोरदार चुरस : विज्ञान, द्विलक्षीला प्राधान्य
नागपूर : शालांत परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे ते अकरावी प्रवेशाकडे. मंगळवारपासूनच अकरावीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली. यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या निकालांत ८.९४ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय प्राविण्यश्रेणीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण उत्तीर्ण झालेल्यांच्या १७ टक्के असल्याने नामांकित महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस पहायला मिळणार आहे.
केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या यंदाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत विज्ञान व द्विलक्षीसोबतच कला व वाणिज्य शाखांचा समावेश करण्यात आला आहे.
परंतु प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांचे प्राधान्य हे विज्ञान किंवा द्विलक्षी शाखेलाच असले. त्यातही द्विलक्षीला विशेष पसंती असते. यंदा चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढलेले प्रमाण व सोबतच ‘सीबीएसई’तील विद्यार्थ्यांकडून करण्यात येणारे अर्ज यामुळे प्रवेशाची टक्कर वाढली आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढीस
‘सीबीएसई’तील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मागील वर्षी विभागातून ४,५६२ विद्यार्थी सहभागी झाले होते तर यंदा हाच आकडा ६, ३०० इतका होता. राज्य मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. मागील वर्षीपेक्षा निकाल वाढल्याने खऱ्या अर्थाने चुरस वाढीस लागली आहे.
शिवाजी विज्ञान महाविद्यालय, डॉ.आंबेडकर विज्ञान महाविद्यालय यांच्यात प्रवेशासाठी एक एक गुणदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. शहरात द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या जवळपास ३,७६० तर विज्ञानच्या १७,१२० जागा आहेत.(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांची अर्ज घेण्यासाठी गर्दी
दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज विकत घेण्यासाठी शहरांतील निरनिराळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे ‘सीबीएसई’ व शहराबाहेरील शाळांसाठी विद्यार्थ्यांनी धनवटे नॅशनल कॉलेज, डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय व श्री.एम.एम.मोहता विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे धाव घेतली. सकाळच्या वेळेस तर विद्यार्थ्यांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. विद्यार्थ्यांना २१ जूनपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

Web Title: 'Thorn edge' for eleventh entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.