शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

यंदाही सूर्य आग ओकणार, उन्हाळा अधिक ‘ताप’दायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 11:07 IST

यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे.

ठळक मुद्देसरासरीत किंचित वाढ : विदर्भ सर्वाधिक तापेल, दाेनदा ‘हीट वेव्हज’

निशांत वानखेडे

नागपूर : यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्याची चिन्हे आहेत. यंदा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याचे तापमान सरासरीपेक्षा ०.९ ते १ अंशाने वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

हा तापमानवाढीचा ट्रेंड २००१ पासून सुरू झाला. भौगोलिक परिस्थितीनुसार यंदाही विदर्भात सूर्याचा प्रकाेप अधिक जाणवेल. काही जिल्ह्यांत साधारणत: मे महिन्यात दाेनदा उष्ण लहरी (हीट वेव्हज) येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागातर्फे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत तापमानाचा अंदाज मांडण्यात आला आहे. या अंदाजानुसार मार्च महिन्यात राज्यातील दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार. तीन महिन्यांत ते सरासरीएवढे राहील. मे महिना अधिक तापलेला असेल. रात्रीच्या किमान तापमानातही अधिक वाढ हाेण्याची शक्यता आहे. दाेन-तीन वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी कमी तापमानाची नाेंद झाली. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला हाेता. यंदा अवकाळी पाऊस कमी हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विदर्भाला ‘भाैगाेलिक’ ताप

विदर्भात सरासरी ४४ अंश तापमानाची नाेंद हाेते. गेल्या वर्षी चार ते पाच दिवस ४५ अंशावर पाेहोचले हाेते. यंदा मात्र तापमानात वाढ जाणवेल. यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे.

- नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात एक दिवस दिवसाचे तापमान ४८ अंशावर जाण्याचा अंदाज आहे.

- साधारणत: २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत चार ते पाच दिवस चालतील, अशा दाेन उष्ण लहरींची शक्यता आहे.

- वर्धा, अमरावती व अकाेल्यात कमाल तापमान किंचित वाढलेले असेल. भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, यवतमाळमध्ये तापमान सरासरी एवढे राहील.

- भाैगाेलिक परिस्थितीमुळे मे महिन्यात विदर्भात सूर्य डाेक्यावर आलेला असताे. २० ते ३० मे दरम्यानचा हा काळ असताे. ताे नवतपा म्हणूनही ओळखला जाताे. शिवाय संपूर्ण विदर्भात राजस्थान, गुजरातकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचाही परिणाम हाेताे.

१९९० पासून आतापर्यंत तापमानात सरासरीपेक्षा १ अंशाची वाढ झाली आहे. २०३० ते २०५० पर्यंत त्यात २ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. वाढ राेखली नाही तर गंभीर परिणाम जीवसृष्टीला भाेगावे लागतील. साधारणत: २००१ पासून हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. त्यामुळे दरवर्षी तापमान वाढीचे रेकार्ड माेडत जातील. पावसाचे दिवस वाढले व ताे आकलन व नियंत्रणाबाहेर जात आहे.

- सुरेश चाेपणे, हवामान तज्ज्ञ.

टॅग्स :environmentपर्यावरणVidarbhaविदर्भnagpurनागपूर