शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही सूर्य आग ओकणार, उन्हाळा अधिक ‘ताप’दायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 11:07 IST

यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे.

ठळक मुद्देसरासरीत किंचित वाढ : विदर्भ सर्वाधिक तापेल, दाेनदा ‘हीट वेव्हज’

निशांत वानखेडे

नागपूर : यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक असण्याची चिन्हे आहेत. यंदा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याचे तापमान सरासरीपेक्षा ०.९ ते १ अंशाने वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

हा तापमानवाढीचा ट्रेंड २००१ पासून सुरू झाला. भौगोलिक परिस्थितीनुसार यंदाही विदर्भात सूर्याचा प्रकाेप अधिक जाणवेल. काही जिल्ह्यांत साधारणत: मे महिन्यात दाेनदा उष्ण लहरी (हीट वेव्हज) येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागातर्फे मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत तापमानाचा अंदाज मांडण्यात आला आहे. या अंदाजानुसार मार्च महिन्यात राज्यातील दिवसाचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असणार. तीन महिन्यांत ते सरासरीएवढे राहील. मे महिना अधिक तापलेला असेल. रात्रीच्या किमान तापमानातही अधिक वाढ हाेण्याची शक्यता आहे. दाेन-तीन वर्षांच्या तुलनेत मागील वर्षी कमी तापमानाची नाेंद झाली. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला हाेता. यंदा अवकाळी पाऊस कमी हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विदर्भाला ‘भाैगाेलिक’ ताप

विदर्भात सरासरी ४४ अंश तापमानाची नाेंद हाेते. गेल्या वर्षी चार ते पाच दिवस ४५ अंशावर पाेहोचले हाेते. यंदा मात्र तापमानात वाढ जाणवेल. यावर्षी एप्रिल व मे महिन्यात जवळपास १५ दिवस ४३ ते ४४ अंशावर राहील. चार ते पाच दिवस ४६ अंशावर पाेहोचेल तर मेच्या दाेन-तीन दिवस ४७ अंशावर पाेहोचण्याची शक्यता आहे. रात्रीचे किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचीही शक्यता आहे.

- नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात एक दिवस दिवसाचे तापमान ४८ अंशावर जाण्याचा अंदाज आहे.

- साधारणत: २५ एप्रिल ते २५ मेपर्यंत चार ते पाच दिवस चालतील, अशा दाेन उष्ण लहरींची शक्यता आहे.

- वर्धा, अमरावती व अकाेल्यात कमाल तापमान किंचित वाढलेले असेल. भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, यवतमाळमध्ये तापमान सरासरी एवढे राहील.

- भाैगाेलिक परिस्थितीमुळे मे महिन्यात विदर्भात सूर्य डाेक्यावर आलेला असताे. २० ते ३० मे दरम्यानचा हा काळ असताे. ताे नवतपा म्हणूनही ओळखला जाताे. शिवाय संपूर्ण विदर्भात राजस्थान, गुजरातकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचाही परिणाम हाेताे.

१९९० पासून आतापर्यंत तापमानात सरासरीपेक्षा १ अंशाची वाढ झाली आहे. २०३० ते २०५० पर्यंत त्यात २ अंशाने वाढण्याची शक्यता आहे. वाढ राेखली नाही तर गंभीर परिणाम जीवसृष्टीला भाेगावे लागतील. साधारणत: २००१ पासून हवामान बदलाचे परिणाम प्रकर्षाने जाणवायला लागले आहेत. त्यामुळे दरवर्षी तापमान वाढीचे रेकार्ड माेडत जातील. पावसाचे दिवस वाढले व ताे आकलन व नियंत्रणाबाहेर जात आहे.

- सुरेश चाेपणे, हवामान तज्ज्ञ.

टॅग्स :environmentपर्यावरणVidarbhaविदर्भnagpurनागपूर