शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हा 'अवकाळी' पाऊस मातीसाठी घातक ! सर्वाधिक फटका शेतीक्षेत्र आणि अन्नसुरक्षेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:07 IST

Nagpur : शेतातील मातीचे आरोग्य सुदृढ ठेवून ते जपण्यासाठी मातीला उन्हाळ्यात विश्रांती देणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, अवकाळी पावसामुळे या विश्रांतीत अडसर निर्माण होतो.

नागपूर : शेतातील मातीचे आरोग्य सुदृढ ठेवून ते जपण्यासाठी मातीला उन्हाळ्यात विश्रांती देणे अत्यंत गरजेचे असते. मात्र, अवकाळी पावसामुळे या विश्रांतीत अडसर निर्माण होतो. पिकांची मुळे सडण्यासह पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढणे, उत्पादन घटणे व इतर काही घातक परिणाम पुढील काही वर्षे त्या शेतात घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक पिकावर दिसून येतात. खरं तर, अवकाळी पाऊस, गारपीट हा बदलत्या हवामान व वाढत्या जागतिक तापमानाचा परिणाम आहे. या बदलांचा सर्वाधिक फटका शेतीक्षेत्र आणि अन्नसुरक्षेला बसत असला तरी कोणीच गांभीर्याने घेत नाही.

मातीला विश्रांती का द्यावी?

मातीचे आरोग्य व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी मातीला मार्च ते मे या काळात किमान ६० ते ७५ दिवसांची विश्रांती देणे अत्यावश्यक असते. माती नांगरणी अथवा वखरणी करून उघडी करणे व ती प्रखर उन्हात ४० ते ४५ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवणे आवश्यक असते. त्यामुळे सॉइल सोलरायझेशन, वायू विनिमय व अन्नद्रव्यांचे संवर्धन होते.

निचरा न होण्याचे परिणाम

या शत्रू बुरशी व जीवाणूंमुळे जमिनीचा पोत बदलून चिकणमातीचे प्रमाण वाढते व मातीची पाणी शोषण्याची क्षमता कमी होते. माती कडक होत असून, सेंद्रिय कर्ब कमी होते व क्षारांचे प्रमाण वाढते. पाणी साचल्याने ऑक्सिजन बाहेर फेकला जातो व जमीन अनारोबिक स्थितीत जाते. ऑक्सिजनच्या अभावामुळे मातीत विषारी वायू तयार होतात.

अवकाळी पावसाचा परिणाम

अवकाळी पावसामुळे माती ओली होत असल्याने तिला पुरेशी विश्रांती मिळत नाही. ओलाव्यामुळे मातीत फ्यूसेरियम, पिथियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा या पिकांसाठी घातक ठरणाऱ्या बुरशी तसेच राल्स्टोनिया सोलेनेसिएरम, अँथोमोनास, रूट नॉट निमॅटोड यासह इतर जीवाणू तयार त्यांचा झपाट्याने प्रसार होतो. मातीत पाण्याचा निचरा होण्याची प्रक्रिया मंदावते.

पिकांवरील परिणाम

फ्युसेरियममुळे पिकांवर मर अर्थात मुळकुजचा प्रादुर्भाव होऊन मुळे कुजतात. ही बुरशी मुळांवाटे झाडांमध्ये शिरत असल्याने झाडांची पाणी शोषून घेण्याची क्षमता नष्ट होत असल्याने ती अकाली वाळतात. पिथियममुळे रोपे सडतात तर रायझोक्टोनियामुळे अन्नद्रव्य शोषण थांबत असल्याने मुळे व खोड सडते. फायटोप्थोरामुळे झाडे डिक्याला बळी पडतात तर राल्स्टोनिया सोलेनेसिएरमुळे मर, झंथोमोनासमुळे कॅन्कर, रूट नॉट निमॅटोडमुळे पाने पिवळी पडणे व वाढ खुंटणे आदी समस्या उ‌द्भवतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rains Threaten Soil, Agriculture, and Food Security: Experts Warn

Web Summary : Unseasonal rains disrupt soil's rest period, crucial for health. This leads to increased pests, diseases, reduced yields, and long-term damage. Soil needs summer heat for vital processes. Poor drainage worsens the situation, impacting future crops and food security.
टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरीfarmingशेती