शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

या सुसंस्कृत राजकारणाचे स्वागत करायला हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:30 IST

Nagpur : रोज सकाळपासून समाजमाध्यमांवर ज्या भाषेत राजकीय आरोप- प्रत्यारोप होतात ते पाहिले म्हणजे चांगल्या परंपरांचा वस्तुपाठ नव्याने घालून देणाऱ्या अशा सोहळ्यांचे महत्व वाढते.

नागपूर : आताच्या काळात सत्ताधारी विरोधक एकमेकांविषयी चांगले बोलले की त्याची बातमी होते, एवढी मतभिन्नता पक्षांमध्ये रुजली आहे. समाजमाध्यामांवर उठलेली ट्रोल धाड असो की, एकमेकांच्या समर्थकांनी काढलेल्या उखाळ्या पाखाळ्या असोत. वैचारिक विरोधाची पातळी थेट वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत कधी येऊन ठेपली हे महाराष्ट्राला कळलेही नाही. अशा स्थितीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विदर्भातील काँग्रेसचे मोठे नेतृत्व असलेल्या दादासाहेब कन्नमवारांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळ्याला विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात हजेरी लावणे व या सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार यांनी भूषविणे ही सुखद घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याचे आयोजन भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले, त्यामुळे या निमित्ताने महाराष्ट्रातील सुसंस्कृत परंपरेचे दर्शन घडलेच; पण ही परंपरा अबाधित राहावी, पुढेही संक्रमित राहावी, अशी अपेक्षा अनेकांच्या मनात उमटणे साहजिकच आहे. 

सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा आपल्या राज्याला आहे. एकमेकांच्या विरोधात घणाघाती आरोप केल्यानंतर समोरासमोर आल्यावर त्या आरोपांमुळे कटुता न येऊ देता एकमेकांचा सन्मान करणारी अनेक उदाहरणे आहेत. फ्रेंच तत्त्वज्ञ व्होल्टेअरच्या विधानातच सांगायचे झाले तर 'तुमच्याशी माझे मतभेद असले तरी तुमचे मत मांडण्याचा तुमचा अधिकार जपण्यासाठी मी प्राणपणाने लढेन' अशा लोकशाही तत्त्वाचा पुरस्कार राज्यातील अनेक नेत्यांनी अनेक वेळा केल्याचे दिसले. अलीकडच्या काळात मात्र ही परंपरा हरवली आहे. 

ज्यांच्या अभिवादनासाठी हा सोहळा झाला त्या दादासाहेबांनीही विरोधी विचाराचा नेहमीच सन्मान केल्याचे अनेक दाखले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो हे समीकरण अलीकडच्या काळातच रूढ झाले असे नाही. १९५६ मध्ये देशात जेव्हा भाषावर प्रांत रचना झाली व १९५७ मध्ये त्यावेळच्या द्विभाषिक मुंबई राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेस पक्षाचे पाणिपत केले. त्यावेळी मुंबईत काँग्रेसचे यशवंतराव चव्हाणांचे सरकार टिकवायचे तर ज्या विदर्भातून पक्षाचे ५४ आमदार निवडून आले त्या विदर्भाला महाराष्ट्रात कायम ठेवणे काँग्रेसची गरज होती. या आमदारांचे नेते होते चंद्रपूरचे दादासाहेब कन्नमवार. दादासाहेब हे वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते होते, त्यामुळे त्यांचे मन वळविण्यासाठी पंतप्रधान पंडित नेहरूंनी शब्द टाकला व कन्नमवारांनी आपली भूमिका बाजूला ठेवत विदर्भाची ताकद संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली. पुढे हेच दादासाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री होणारे पहिले विदर्भपुत्र ठरले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी हीच आठवण सांगून दादासाहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख नव्या पिढीसमोर ठेवला. 'मी बदल्याचे नव्हे, तर बदलाचे' राजकारण करण्यासाठी आलो आहे, अशी ग्वाहीच फडणवीस यांनी दिली होती. त्या दिशेने पडलेले हे पाउलही म्हणता येईल. ज्या मूल तालुक्याचे दादासाहेब भूमिपुत्र होते त्याच तालुक्याचा वारसा व पदांची तीच परंपरा फडणवीस यांना मिळाली आहे, त्यामुळे दादासाहेबांसारख्या मोठ्या उंचीच्या नेत्याच्या स्मरणाने ही पंरपरा पुन्हा वृद्धिंगत होणे अधिक औचित्यपूर्ण ठरत आहे. फक्त ही परंपरा एका सोहळ्यापुरतीच राहू नये, इतकेच !

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर