शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

सायंकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार नाही; महावितरणचे आश्वासन

By कमलेश वानखेडे | Updated: May 29, 2024 17:07 IST

वाढती थकबाकी आणि वीजगळती सोबतच वीजचोरीला चाप लावण्यासाठी डिश टीव्ही रिचार्ज आणि मोबाईल रिचार्जच्या धर्तीवर ही 'प्री-पेड' स्मार्ट वीज मीटर काम करणार आहेत.

कमलेश वानखेडे, नागपूर : वाढत्या थकबाकीवर उपाय म्हणून 'जेवढे पैसे तेवढा टॉक टाइम' या मोबाइल हिशेबाच्या धर्तीवर 'जेवढे पैसे तेवढे युनीट वीज' वापरण्याची सोय असलेल्या 'प्री-पेड' स्मार्ट वीज मीटर राज्यात सर्वत्र लवकरच मोफत लावण्यात येणार आहेत. मीटर नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड नाही. ग्राहकांना स्मार्ट मीटरचे विविध फायदे असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

वाढती थकबाकी आणि वीजगळती सोबतच वीजचोरीला चाप लावण्यासाठी डिश टीव्ही रिचार्ज आणि मोबाईल रिचार्जच्या धर्तीवर ही 'प्री-पेड' स्मार्ट वीज मीटर काम करणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व वीजग्राहकांकडे 'प्री-पेड' स्मार्ट वीज मीटर बसविले जाणार आहेत. प्री-पेड स्मार्ट मीटर घेणा-यांच्या बाबतीत मीटर रिडींग, बिल देणे, त्यांची वसुली करणे आणि बिल भरण्यास विलंब या गोष्टी टळणार असल्याने घरोघरी वसुलीची मोहीम राबवून आर्थिक स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या तारेवरची कसरत करीत असलेल्या महावितरणने सदैव थकबाकीच्या चक्रव्युहात अडकलेल्या वीज ग्राहकांना प्री-पेड स्मार्ट मीटरचा उतारा देत वाढत्या थकबाकीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात सर्वच राज्यांतील वीजग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी पंपांच्या वीज जोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2 कोटी 41लाख वीजग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. ग्राहकांना वीज वितरणची सेवा देणारी महावितरण ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी आहे. ना नफा, ना तोटा (रेव्हेन्यू न्यूट्रल) या तत्त्वाने वाटचाल असणाऱ्या महावितरणच्या सेवेचा केंद्रबिंदू हा फक्त आणि फक्त वीजग्राहकच आहे.

वीज बिलाच्या नियमित वसुलीसाठी राज्यभरात थकबाकी वसुली मोहीम तीव्रतेने राबविण्यात येत असून प्रत्येक कार्यालयातील एखाद दोन कर्मचारी वगळता कनिष्ठ कर्मचा-यांपासून वरिष्ठ अधिका-यापर्यंत सर्वजण वसुली मोहीमेवर असतात. याचा प्रत्यक्ष परिणाम महावितरणच्या दैंनंदिन कामावरही पडत असल्याने ग्राहक सेवा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामांवर त्याचा प्रतिकूल परिणामही जाणवत आहे. या सर्व बाबींचा विचार करीत प्री-पेड स्मार्ट मीटरचा वापर करण्याचे महावितरणने ठरविले आहे.

अशी मिळेल सुविधा-

१) स्मार्ट प्रीपेड मीटर मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे.

२) रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज वीज किती वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील. त्यानुसार वीजवापर व त्याचे आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे

३) स्मार्ट मीटरमधील रिचार्ज संपल्यानंतरही सायंकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होणार नाही. - रिचार्ज संपल्यानंतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होणार नाही.- हॅप्पी अवर्स असल्यामुळे सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा रात्री-बेरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका नाही.

टॅग्स :nagpurनागपूरmahavitaranमहावितरण