शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

राणे दाम्पत्याच्या नात्यात होता तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 23:51 IST

पती आणि दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या डॉ. सुषमा राणे यांच्या प्रकरणात नवनवे तथ्य पुढे ते आहेत. राणे दाम्पत्याचे नातेसंबंध मागील अनेक दिवसांपासून ताणले गेले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे.

ठळक मुद्देकारमध्ये करायचे वादविवाद : धीरजने पत्नीचे कॉल केले होते डायव्हर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पती आणि दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या डॉ. सुषमा राणे यांच्या प्रकरणात नवनवे तथ्य पुढे ते आहेत. राणे दाम्पत्याचे नातेसंबंध मागील अनेक दिवसांपासून ताणले गेले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. सुषमाच्या मोबाईलवर येणारे प्रत्येक कॉल धीरजने आपल्या मोबाईलवर डायव्हर्ट करून ठेवले होते, यावरूनच त्यांच्या संबंधांमध्ये किती तणाव आला होता, हे लक्षात येते.कोराडी मार्गावरील ओम नगर येथे राहणारे धीरज राणे (४०), त्यांची पत्नी सुषमा राणे (३९), अकरा वर्षीय मुलगा आणि मुलगी वन्या (५) हे सर्वजण आपल्या घरी मृतावस्थेत आढळले होते. सुषमा फासावर लटकलेली होती तर अन्य तिघेही बिछान्यावर मृत पडले होते. प्राथमिक तपासामध्ये ही सामूहिक आत्महत्या असल्याची बाब पुढे आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा तपास आरंभला आहे. एकाच वेळी चार जणांचा मृत्यू होण्याच्या या घटनेने पोलीस अत्यंत गंभीरपणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आतापर्यंतच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च मध्यमवर्गीय असलेल्या राणे दाम्पत्याचे आयुष्य मागील काही दिवसापासून वाईट चालले होते. त्यांच्यासोबत त्यांची आत्याही राहात होती. शेजारीच नातेवाईकही राहतात. आपल्या नात्यातील ताणतणाव मुलांच्या आणि आत्याच्या लक्षात येऊ नये यासाठी बरेचदा ते कारमध्ये बसून दीर्घ चर्चा आणि वादविवाद करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या संदर्भात त्यांच्या आत्याला आणि नातेवाईकांनाही कल्पना होती. मात्र कुणीही हे फारसे मनावर घेतले नाही.मागील काही दिवसांपासून धीरजचा स्वभाव शंकेखोर झाला होता. त्याने सुषमाच्या मोबाईलवर येणारे कॉल आपल्या मोबाईलवर डायव्हर्ट करून ठेवले होते. यामुळे सुषमाला आलेले कॉल आधी धीरजला जायचे. डॉक्टर असल्याने सुषमाला अनेक लोकांचे कॉल यायचे. धीरजने कॉल रिसिव्ह केल्यावर पलिकडील व्यक्तींना आश्चर्य वाटायचे. या संदर्भात कुण्या व्यक्तीने सुषमाला विचारणा केली तर, आपण डॉक्टर असल्याने व अधिक व्यस्त राहात असल्याचे कारण सांगून ती वेळ मारून नेत असे. धीरजला बºयाच दिवसापासून दारूचे व्यसन लागले होते. अलिकडे त्याचे मद्यपान अधिकच वाढले होते. दारूच्या नशेत तो झिंगून जायचा. सोमवारच्या रात्रीही तो असाच झिंगलेल्या अवस्थेत घरी आला होता. त्याने जेवणही केले नव्हते. यानंंतरच सुषमाला या हत्याकांडाची युक्ती सुचली असावी, असा अंदाज आहे. या योजनेनुसार, मंगळवारी सकाळी दवाखान्यातून येताना ती अ­ॅनेस्थेशियाचे औषध सोबत घेऊन आली. त्या वेळी तिने मुलीलाही सोबत नेले होते. दवाखान्यातून परतल्यावर पतीला आणि मुलाला तिने आधी इन्जेक्शन दिले असावे. त्यानंतर मुलीला देऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर