शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

राणे दाम्पत्याच्या नात्यात होता तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 23:51 IST

पती आणि दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या डॉ. सुषमा राणे यांच्या प्रकरणात नवनवे तथ्य पुढे ते आहेत. राणे दाम्पत्याचे नातेसंबंध मागील अनेक दिवसांपासून ताणले गेले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे.

ठळक मुद्देकारमध्ये करायचे वादविवाद : धीरजने पत्नीचे कॉल केले होते डायव्हर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पती आणि दोन्ही मुलांना ठार मारल्यानंतर स्वत: आत्महत्या करणाऱ्या डॉ. सुषमा राणे यांच्या प्रकरणात नवनवे तथ्य पुढे ते आहेत. राणे दाम्पत्याचे नातेसंबंध मागील अनेक दिवसांपासून ताणले गेले होते, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. सुषमाच्या मोबाईलवर येणारे प्रत्येक कॉल धीरजने आपल्या मोबाईलवर डायव्हर्ट करून ठेवले होते, यावरूनच त्यांच्या संबंधांमध्ये किती तणाव आला होता, हे लक्षात येते.कोराडी मार्गावरील ओम नगर येथे राहणारे धीरज राणे (४०), त्यांची पत्नी सुषमा राणे (३९), अकरा वर्षीय मुलगा आणि मुलगी वन्या (५) हे सर्वजण आपल्या घरी मृतावस्थेत आढळले होते. सुषमा फासावर लटकलेली होती तर अन्य तिघेही बिछान्यावर मृत पडले होते. प्राथमिक तपासामध्ये ही सामूहिक आत्महत्या असल्याची बाब पुढे आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा तपास आरंभला आहे. एकाच वेळी चार जणांचा मृत्यू होण्याच्या या घटनेने पोलीस अत्यंत गंभीरपणे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आतापर्यंतच्या तपासात चक्रावून टाकणारी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च मध्यमवर्गीय असलेल्या राणे दाम्पत्याचे आयुष्य मागील काही दिवसापासून वाईट चालले होते. त्यांच्यासोबत त्यांची आत्याही राहात होती. शेजारीच नातेवाईकही राहतात. आपल्या नात्यातील ताणतणाव मुलांच्या आणि आत्याच्या लक्षात येऊ नये यासाठी बरेचदा ते कारमध्ये बसून दीर्घ चर्चा आणि वादविवाद करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या संदर्भात त्यांच्या आत्याला आणि नातेवाईकांनाही कल्पना होती. मात्र कुणीही हे फारसे मनावर घेतले नाही.मागील काही दिवसांपासून धीरजचा स्वभाव शंकेखोर झाला होता. त्याने सुषमाच्या मोबाईलवर येणारे कॉल आपल्या मोबाईलवर डायव्हर्ट करून ठेवले होते. यामुळे सुषमाला आलेले कॉल आधी धीरजला जायचे. डॉक्टर असल्याने सुषमाला अनेक लोकांचे कॉल यायचे. धीरजने कॉल रिसिव्ह केल्यावर पलिकडील व्यक्तींना आश्चर्य वाटायचे. या संदर्भात कुण्या व्यक्तीने सुषमाला विचारणा केली तर, आपण डॉक्टर असल्याने व अधिक व्यस्त राहात असल्याचे कारण सांगून ती वेळ मारून नेत असे. धीरजला बºयाच दिवसापासून दारूचे व्यसन लागले होते. अलिकडे त्याचे मद्यपान अधिकच वाढले होते. दारूच्या नशेत तो झिंगून जायचा. सोमवारच्या रात्रीही तो असाच झिंगलेल्या अवस्थेत घरी आला होता. त्याने जेवणही केले नव्हते. यानंंतरच सुषमाला या हत्याकांडाची युक्ती सुचली असावी, असा अंदाज आहे. या योजनेनुसार, मंगळवारी सकाळी दवाखान्यातून येताना ती अ­ॅनेस्थेशियाचे औषध सोबत घेऊन आली. त्या वेळी तिने मुलीलाही सोबत नेले होते. दवाखान्यातून परतल्यावर पतीला आणि मुलाला तिने आधी इन्जेक्शन दिले असावे. त्यानंतर मुलीला देऊन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर