शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व द्यावे : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:10 IST

काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

ठळक मुद्दे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.काँग्रेस अजूनही संपलेली नाही. एकत्रितपणे कार्य करून काँग्रेसला परत शक्तिशाली बनवू. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी दिली पाहिजे. महाराष्ट्रात नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याबाबत लवकरच निर्णय होईल. सोबतच पुढील निवडणुकांसह संघटनेच्या कार्याचीदेखील समीक्षा करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.भाजप लोकशाहीला खिळखिळी करीत आहेकर्नाटकमध्ये सद्यस्थितीत जे काही होत आहे, ते अतिशय अयोग्य आहे. भाजपा देशातील लोकशाही व्यवस्थेला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे ते त्याचा दुरुपयोग करीत आहे. मात्र जे लोक काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेले आहेत, ते लोक पक्षाला सोडून जाणार नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार राहिले पाहिजे. प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या सरकारला हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कर्नाटकमध्ये तेथील स्थानिक तसेच मुंबईचे नेते सरकार वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसMediaमाध्यमे