शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व द्यावे : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:10 IST

काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

ठळक मुद्दे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.काँग्रेस अजूनही संपलेली नाही. एकत्रितपणे कार्य करून काँग्रेसला परत शक्तिशाली बनवू. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी दिली पाहिजे. महाराष्ट्रात नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याबाबत लवकरच निर्णय होईल. सोबतच पुढील निवडणुकांसह संघटनेच्या कार्याचीदेखील समीक्षा करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.भाजप लोकशाहीला खिळखिळी करीत आहेकर्नाटकमध्ये सद्यस्थितीत जे काही होत आहे, ते अतिशय अयोग्य आहे. भाजपा देशातील लोकशाही व्यवस्थेला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे ते त्याचा दुरुपयोग करीत आहे. मात्र जे लोक काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेले आहेत, ते लोक पक्षाला सोडून जाणार नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार राहिले पाहिजे. प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या सरकारला हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कर्नाटकमध्ये तेथील स्थानिक तसेच मुंबईचे नेते सरकार वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसMediaमाध्यमे