मनपापुढे आर्थिक संकट नाही
By Admin | Updated: May 19, 2014 00:50 IST2014-05-19T00:50:33+5:302014-05-19T00:50:33+5:30
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे विकास कामासाठी निधी नसल्याची ओरड सुरू आहे.

मनपापुढे आर्थिक संकट नाही
एलबीटी : उत्पन्न कमी होऊनही नवीन स्रोतांचा शोध नाही
\राजीव सिंग - नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे विकास कामासाठी निधी नसल्याची ओरड सुरू आहे. एलबीटीमुळे १५०-२०० कोटींचे उत्पन्न बुडाल्याचा प्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षाच्या जकात उत्पन्नाच्या तुलनेत १०० कोटीने उत्पन्नात घट झाली आहे. मागील वर्षी जकातीपासून ४८५ कोटी १३ लाखाचे उत्पन्न मिळाले होते, तर २०१३-१४ या वर्षात एलबीटीपासून ३८५.३९ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले. यात १०० कोटींची तफावत आहे. अनाठायी खर्चाला आवर व नवीन आर्थिक स्रोत निर्माण करण्याकडे प्रशासन व पदाधिकार्यांचे लक्ष नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुद्रांक शुल्कापोटी १ टक्के रक्कम एलबीटी म्हणून मिळणार आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कापासून ६५ कोटी वसूल करण्यात आले. परंतु शासनाकडून यातील जेमतेम १५ कोटी मनपाला प्राप्त झाले आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंत मनपा तिजोरीत ८०१ कोटींचा महसूल जमा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०० कोटींनी कमी आहे. मुद्रांक शुल्कापोटी शासनाकडून येणे असलेली रक्कम प्राप्त झाली तर तफावत ५० कोटींनी कमी होऊ शकते. संपत्ती करापासून गेल्या वर्षी १६३ कोटींचे उत्पन्न झाले होते. यंदा मनपाला १८९ कोटी मिळाले. २६ कोटी अधिक मिळाले. नगररचना विभागाचे उत्पन्न ६५ कोटी आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधल्याचा दावा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केला होता. एलबीटीमुळे मनपा उत्पन्नावर फारसा परिणाम पडणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. त्यादृष्टीने काही निर्णयही घेण्यात आले. परंतु आयुक्त श्याम वर्धने यांनी आपल्या अर्थसंकल्पात ३५३.२ कोटींची कपात केली. वास्तव अर्थसंकल्प १०४७.८० कोटींवर आणला. तसेच २०१४-१५ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प १०६१.५१ कोटींचा दिला. नवीन आर्थिक स्रोताबाबत आयुक्त आश्वस्त नसल्याने, त्यांनी हा निर्णय घेतला असावा.