शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
3
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
6
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
7
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
8
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
9
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
10
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
11
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
12
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
13
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
15
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
16
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
17
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
18
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
19
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
20
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन

जागा वाटपावर अद्याप चर्चा नाही :जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:41 IST

आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली असून सहमती देखील झाली आहे. मात्र, जागा वाटपावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसरकार बदलणे निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली असून सहमती देखील झाली आहे. मात्र, जागा वाटपावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीच्या गणेशपेठेतील कार्यालयात बुधवारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आज देशातील व्यापारी त्रस्त आहेत. रिटेल मार्केट उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने कुठलीही तयारी न करता नोटाबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेत व्यापार क्षेत्र उद्ध्वस्त केले. युवकांना रोजगार मिळेनासा झाला आहे. पेट्रोल-डीझेलची दरवाढ लादली जात आहे. सरकारने निवडणुकीच्या पूर्वी बरीच आश्वासने दिली, त्यावर आता कुणीच बोलायला तयार नाही. आता जनतेने हे सरकार बदलण्याचे ठाणले आहे, असा दावा त्यांनी केला.भाजपा व्यापारी आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज फुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, दिलीप पनकुले आदी उपस्थित होते.शिवसेनेवर विश्वास नाहीजयंत पाटील म्हणाले, जनतेचा मूड माहीत करून घेण्यासाठी पक्षातर्फे कुठलेही सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. मात्र, जनतेत खूप रोष दिसत आहे. त्यामुळे भाजपाचे सरकार कोसळेल यात शंका नाही. शिवसेनेवर कुणालाही विश्वास राहिलेला नाही. शिवसेना फक्त सत्ता भोगण्यासाठी भाजपासोबत आहे. महामंडळाच्या नियुक्तीत शिवसेनेलाही वाटा मिळाला हे याचे प्रमाण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस