शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

जागा वाटपावर अद्याप चर्चा नाही :जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:41 IST

आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली असून सहमती देखील झाली आहे. मात्र, जागा वाटपावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसरकार बदलणे निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली असून सहमती देखील झाली आहे. मात्र, जागा वाटपावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीच्या गणेशपेठेतील कार्यालयात बुधवारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आज देशातील व्यापारी त्रस्त आहेत. रिटेल मार्केट उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने कुठलीही तयारी न करता नोटाबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेत व्यापार क्षेत्र उद्ध्वस्त केले. युवकांना रोजगार मिळेनासा झाला आहे. पेट्रोल-डीझेलची दरवाढ लादली जात आहे. सरकारने निवडणुकीच्या पूर्वी बरीच आश्वासने दिली, त्यावर आता कुणीच बोलायला तयार नाही. आता जनतेने हे सरकार बदलण्याचे ठाणले आहे, असा दावा त्यांनी केला.भाजपा व्यापारी आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज फुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, दिलीप पनकुले आदी उपस्थित होते.शिवसेनेवर विश्वास नाहीजयंत पाटील म्हणाले, जनतेचा मूड माहीत करून घेण्यासाठी पक्षातर्फे कुठलेही सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. मात्र, जनतेत खूप रोष दिसत आहे. त्यामुळे भाजपाचे सरकार कोसळेल यात शंका नाही. शिवसेनेवर कुणालाही विश्वास राहिलेला नाही. शिवसेना फक्त सत्ता भोगण्यासाठी भाजपासोबत आहे. महामंडळाच्या नियुक्तीत शिवसेनेलाही वाटा मिळाला हे याचे प्रमाण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस