शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जागा वाटपावर अद्याप चर्चा नाही :जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:41 IST

आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली असून सहमती देखील झाली आहे. मात्र, जागा वाटपावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देसरकार बदलणे निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मानस काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला असला तरी अद्याप याबाबत दोन्ही पक्षात कुठलीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच तशी कबुली दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली असून सहमती देखील झाली आहे. मात्र, जागा वाटपावर अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. तसा कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीच्या गणेशपेठेतील कार्यालयात बुधवारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आज देशातील व्यापारी त्रस्त आहेत. रिटेल मार्केट उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने कुठलीही तयारी न करता नोटाबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेत व्यापार क्षेत्र उद्ध्वस्त केले. युवकांना रोजगार मिळेनासा झाला आहे. पेट्रोल-डीझेलची दरवाढ लादली जात आहे. सरकारने निवडणुकीच्या पूर्वी बरीच आश्वासने दिली, त्यावर आता कुणीच बोलायला तयार नाही. आता जनतेने हे सरकार बदलण्याचे ठाणले आहे, असा दावा त्यांनी केला.भाजपा व्यापारी आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धनराज फुसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, आ. प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, दिलीप पनकुले आदी उपस्थित होते.शिवसेनेवर विश्वास नाहीजयंत पाटील म्हणाले, जनतेचा मूड माहीत करून घेण्यासाठी पक्षातर्फे कुठलेही सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. मात्र, जनतेत खूप रोष दिसत आहे. त्यामुळे भाजपाचे सरकार कोसळेल यात शंका नाही. शिवसेनेवर कुणालाही विश्वास राहिलेला नाही. शिवसेना फक्त सत्ता भोगण्यासाठी भाजपासोबत आहे. महामंडळाच्या नियुक्तीत शिवसेनेलाही वाटा मिळाला हे याचे प्रमाण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस