शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘सावजी’मध्ये मद्यविक्रीच्या परवानगीचा कुठलाही निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:54 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सावजी हॉटेल्समध्ये मद्यविक्रीची परवानगी देण्यासंदर्भात राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पसरविण्यात येणारी माहिती व वृत्त म्हणजे अफवाच असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क मंत्र्यांची स्पष्टोक्ती : नियमबाह्य परवाने रद्द करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सावजी हॉटेल्समध्ये मद्यविक्रीची परवानगी देण्यासंदर्भात राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचे राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पसरविण्यात येणारी माहिती व वृत्त म्हणजे अफवाच असून यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.नागपूर जिल्ह्यातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या सावजी हॉटेल्समध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मद्यविक्रीची परवानगी देण्यात येणार आहे, अशा आशयाचा दावा काही अधिकारी तसेच प्रसारमाध्यमांनी केला होता. यासंदर्भात शुक्रवारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शासनाची भूमिका मांडली. मद्यविक्रीसाठी साधारणत: रेस्टॉरेन्ट्सला ‘एफएल-३’ हा परवाना देण्यात येतो. मात्र त्यासाठीदेखील पोलीस, मनपा, अन्न व औषधी प्रशासन विभागासोबत विविध विभागांच्या परवानग्या लागतात. शिवाय अंतिम निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती निर्णय घेते. जर सर्व काही नियमाप्रमाणे असेल तरच रेस्टॉरेन्टला हा परवाना मिळतो. नागपूर जिल्ह्यातील ९० टक्क्यांहून अधिक सावजी हॉटेल्स या नियमांत बसतच नाहीत. अशा प्रकारचा परवाना देण्याचा पहिला अधिकार हा जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील समितीला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.सावजी असोसिएशनच्या कुठल्याही पदाधिकाºयाने माझी भेट घेतलेली नाही. राज्य शासनाने सरसकट सावजीला परवाना देण्याचा निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात कुणी खोडसाळपणा केला असेल तर याबाबत चौकशी करू, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.‘त्या’ परवान्यांबाबत चौकशी करूनागपूर शहरातील चार सावजी हॉटेल्सला मद्यविक्रीचा परवाना मिळाला असल्याचा दावा उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी केला होता. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारणा केली असता मद्यविक्रीचा परवाना रेस्टॉरेन्टला देण्याचा निर्णय जिल्हाधिकाºयांची समिती घेते. मात्र जर सावजी हॉटेलला असा परवाना मिळाला असेल व तो नियमबाह्य असेल तर तो रद्द करण्याचा शासनाला अधिकार आहे. यासंदर्भात चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :liquor banदारूबंदीnagpurनागपूरhotelहॉटेल