शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

नागपूर जिल्ह्याच्या सात तालुक्यात एकही पीक विम्याचा लाभार्थी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:13 IST

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात येतो. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून १४४७ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र यात सात तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही. एक विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात केवळ एक शेतकरी पीक विम्याचा लाभार्थी ठरला. ...

ठळक मुद्देउमरेडमध्ये मिळाला केवळ एका शेतकऱ्याला लाभ : ३६ हजार शेतकऱ्यांनी काढला होता विमा

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात येतो. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून १४४७ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र यात सात तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही. एक विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात केवळ एक शेतकरी पीक विम्याचा लाभार्थी ठरला. जिल्ह्यात सर्वत्र सारखेच नुकसान झाले असताना, सात तालुक्यातील शेतकरी वंचित का? असा सवाल जि.प.च्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.शेती निसगार्शी संबंधित आहे. अतिवृष्टी, चक्रिवादळ, कमी पाऊस, कीड यामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान होते. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांवर बसतो. नैसर्गिक आपदेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना रिलिफ मिळावा म्हणून शासनाने पीक विमा योजना सुरू केली. बँकेतून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही पीक विमा सक्तीची आहे. गेल्या आठ-दहा वर्षात या योजनेमुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच फायदा जास्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीक विमा योजना फसवी असल्याचा आरोप होत होता. २०१७ च्या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यात ३६ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. विम्यापोटी त्यांनी ४ कोटी ९३ लाख ४७ हजार ४७२ रुपये भरले. खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुड्यामुळे कापूस आणि धान पिकाचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीमार्फत फक्त १४४७ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात फक्त एकाच शेतकऱ्यास लाभ देण्यात आला. लाभ देताना महसूल मंडळाचा विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संपूर्ण महसूल मंडळाच एकच शेतकऱ्याचे नुकसान कसे झाले, असाच सवाल उपस्थित होत आहे. तालुकापात्र शेतकरी संख्यारामटेक ६९४कळमेश्वर ५६७नरखेड १७२उमरेड १काटोल १३ कंपन्यांचे पोट भरण्यासाठी योजनामुळात पीक विम्याचा प्रकारच विचित्र आहे. ज्या विमा कंपन्या आहे त्या जबाबदारीच घेत नाही. कंपन्या आपल्या मनाने योजना राबविते. विशेष म्हणजे नुकसानीचा स्थानिक अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे. परंतु विमा कंपन्या स्थानिक अधिकाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरत नाही. ही योजना केवळ कंपन्यांचे पोट भरण्यासाठी आहे. शासनाचा यावर कुठलाही अंकुश नाही.श्रीधर ठाकरे, कृषितज्ज्ञ

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर