शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

नागपूर जिल्ह्याच्या सात तालुक्यात एकही पीक विम्याचा लाभार्थी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 20:13 IST

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात येतो. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून १४४७ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र यात सात तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही. एक विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात केवळ एक शेतकरी पीक विम्याचा लाभार्थी ठरला. ...

ठळक मुद्देउमरेडमध्ये मिळाला केवळ एका शेतकऱ्याला लाभ : ३६ हजार शेतकऱ्यांनी काढला होता विमा

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्यात येतो. २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात ३५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. यातून १४४७ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला. मात्र यात सात तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा समावेश नाही. एक विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात केवळ एक शेतकरी पीक विम्याचा लाभार्थी ठरला. जिल्ह्यात सर्वत्र सारखेच नुकसान झाले असताना, सात तालुक्यातील शेतकरी वंचित का? असा सवाल जि.प.च्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.शेती निसगार्शी संबंधित आहे. अतिवृष्टी, चक्रिवादळ, कमी पाऊस, कीड यामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान होते. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांवर बसतो. नैसर्गिक आपदेमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना रिलिफ मिळावा म्हणून शासनाने पीक विमा योजना सुरू केली. बँकेतून कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही पीक विमा सक्तीची आहे. गेल्या आठ-दहा वर्षात या योजनेमुळे शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांनाच फायदा जास्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीक विमा योजना फसवी असल्याचा आरोप होत होता. २०१७ च्या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यात ३६ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. विम्यापोटी त्यांनी ४ कोटी ९३ लाख ४७ हजार ४७२ रुपये भरले. खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुड्यामुळे कापूस आणि धान पिकाचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीमार्फत फक्त १४४७ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे उमरेड तालुक्यात फक्त एकाच शेतकऱ्यास लाभ देण्यात आला. लाभ देताना महसूल मंडळाचा विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संपूर्ण महसूल मंडळाच एकच शेतकऱ्याचे नुकसान कसे झाले, असाच सवाल उपस्थित होत आहे. तालुकापात्र शेतकरी संख्यारामटेक ६९४कळमेश्वर ५६७नरखेड १७२उमरेड १काटोल १३ कंपन्यांचे पोट भरण्यासाठी योजनामुळात पीक विम्याचा प्रकारच विचित्र आहे. ज्या विमा कंपन्या आहे त्या जबाबदारीच घेत नाही. कंपन्या आपल्या मनाने योजना राबविते. विशेष म्हणजे नुकसानीचा स्थानिक अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे. परंतु विमा कंपन्या स्थानिक अधिकाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरत नाही. ही योजना केवळ कंपन्यांचे पोट भरण्यासाठी आहे. शासनाचा यावर कुठलाही अंकुश नाही.श्रीधर ठाकरे, कृषितज्ज्ञ

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर