शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

दरवर्षी देशात ३० लाख युनिट रक्ताचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:55 IST

डॉ. सुनील खापर्डे : आज जागतिक रक्तदाता दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात दरवर्षी सुमारे १.२ कोटी युनिट रक्ताची गरज असते. पण, केवळ ९० लाख युनिट रक्त संकलित होते. त्यामुळे ३० लाख युनिटचा तुटवडा कायम राहतो. परिणामी, पैसे घेऊन रक्तदान करणाऱ्या व्यावसायिक रक्तदात्यांवर रुग्णांना अवलंबून राहावे लागते, ही चिंतेची बाब आहे, असे मत रक्त सुरक्षेचे राष्ट्रीय तज्ज्ञ आणि नॅकोचे माजी संचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी मांडले.

जागतिक रक्तदाता दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'रक्तकोश'सारख्या उपक्रमांमुळे काही सुधारणा झाल्या असल्या, तरी राष्ट्रीय रक्तसंकलन यंत्रणा नसल्यामुळे भारतात एकसंध आणि समन्वयित प्रणाली तयार होत नाही. आजही ५० टक्क्यांपेक्षा कमी रक्तदान हे खऱ्या अर्थाने स्वयंस्फूर्त आहे. उरलेले रक्तदान हे व्यावसायिक किंवा नातेवाइकांमार्फतच होते. 

नो शॉर्टेज, नो वेस्टेज' धोरण जाहीरजागतिक रक्तदातादिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यात 'नो शॉर्टेज, नो वेस्टेज' धोरण तत्काळ तयार करून अमलात आणण्याचे आदेश दिले आहेत; जेणेकरून गरजू रुग्णांना योग्य वेळी सुरक्षित रक्त मिळेल आणि नियोजनाअभावी रक्त वाया जाण्याचे प्रमाणही कमी होईल. ते म्हणाले की, स्वातंत्र्यदिवस, प्रजासत्ताक दिन किंवा राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर रक्तदान होते. पण सण, उन्हाळा आणि परीक्षा कालावधीत रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी असते, त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवतो. 

स्वयंस्फूर्त रक्तदानामुळे सामाजिक भान वाढतेलाइफलाइन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले, स्वयंस्फूर्त रक्तदान केवळ इतरांचे प्राण वाचवत नाही, तर स्वतः रक्तदात्याच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. रक्तदानामुळे मेंदूतील बोन मॅरोला नवीन आणि ताजे रक्त पेशी तयार करण्यास चालना मिळते. शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते आणि सामाजिक भान वाढते.

 

टॅग्स :nagpurनागपूर