शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:52 IST

आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष्य केले जात आहे. जातीय दंगली या सरकारपुरस्कृत आहेत व येत्या निवडणुका लक्षात घेता ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे राजू वाघमारे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष्य केले जात आहे. जातीय दंगली या सरकारपुरस्कृत आहेत व येत्या निवडणुका लक्षात घेता ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला.डॉ. वाघमारे शनिवारी नागपुरात आले होते़ पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरकार घोषणेत आॅनलाईन असले तरी कामात आॅफलाईन असून, त्यांचा कारभार पूर्णपणे हँग झाला आहे. कर्जमाफी योजनेचा गवगवा केला गेला़ मात्र या योजनेचा पुरता बोजवारा उडाला़ अद्याप खरीपाचे कर्जही शेतकऱ्यांना मिळालेले नाही़ केवळ १० टक्के कर्जवाटप झाले आहे़ राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे़ सरकारपुरस्कृत दंगलीमुळे राज्य होरपळून निघाले आहे़ कोरगाव-भीमा प्रकरणातील आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना पाठीशी घालून सरकार जे पीडित आहेत त्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भिडेंना क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याच्या कोणत्या विभागाद्वारे चौकशी केली, हे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील घटनाही अशीच हाताळली जात असून, गुन्हेगारांऐवजी तेथील पीडित कुटुंबच दहशतीखाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे़ कायदा सुव्यवस्थेची पुरती दैना झाली आहे़ असे असतानाही मु्ख्यमंत्री गृहमंत्रिपद सोडायला तयार नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी पत्रपरिषदेला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस नेते दिनेश बानाबाकोडे, संदीप सहारे, संजय मेश्राम, रमण पैगवार, अनिल नगरारे, जयंत लुटे आदी उपस्थित होते़.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर