शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

ध्रुवीकरणासाठी दंगली घडविण्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 23:52 IST

आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष्य केले जात आहे. जातीय दंगली या सरकारपुरस्कृत आहेत व येत्या निवडणुका लक्षात घेता ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला.

ठळक मुद्देकाँग्रेसचे राजू वाघमारे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरएसएसच्या प्रभावाखाली राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जातीय देशातील सलोखा बिघडवत आहे. देशात त्यामुळेच जातीय दंगली होत आहेत. महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू आहे. कोरेगाव-भीमा व जळगावचे उदाहरण ताजे आहे. खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून निरपराध्यांना लक्ष्य केले जात आहे. जातीय दंगली या सरकारपुरस्कृत आहेत व येत्या निवडणुका लक्षात घेता ध्रुवीकरण करण्यासाठी पुन्हा दंगली घडविण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केला.डॉ. वाघमारे शनिवारी नागपुरात आले होते़ पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरकार घोषणेत आॅनलाईन असले तरी कामात आॅफलाईन असून, त्यांचा कारभार पूर्णपणे हँग झाला आहे. कर्जमाफी योजनेचा गवगवा केला गेला़ मात्र या योजनेचा पुरता बोजवारा उडाला़ अद्याप खरीपाचे कर्जही शेतकऱ्यांना मिळालेले नाही़ केवळ १० टक्के कर्जवाटप झाले आहे़ राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे़ सरकारपुरस्कृत दंगलीमुळे राज्य होरपळून निघाले आहे़ कोरगाव-भीमा प्रकरणातील आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना पाठीशी घालून सरकार जे पीडित आहेत त्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भिडेंना क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याच्या कोणत्या विभागाद्वारे चौकशी केली, हे जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील घटनाही अशीच हाताळली जात असून, गुन्हेगारांऐवजी तेथील पीडित कुटुंबच दहशतीखाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढली आहे़ कायदा सुव्यवस्थेची पुरती दैना झाली आहे़ असे असतानाही मु्ख्यमंत्री गृहमंत्रिपद सोडायला तयार नसल्याची टीका त्यांनी केली. शेतकरी पत्रपरिषदेला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस नेते दिनेश बानाबाकोडे, संदीप सहारे, संजय मेश्राम, रमण पैगवार, अनिल नगरारे, जयंत लुटे आदी उपस्थित होते़.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर