शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची कुवत आहे का? सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 23:13 IST

शत्रू दुबळा असला तर त्याच्यावर दबाव बनविणे शक्य असते. पण शत्रू बलशाली असला तर त्याच्याशी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. राजकारणात त्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. असे नसते तर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा गवगवा करणाऱ्या सरकारने चीनबाबत असाच कणखरपणा दाखविला असता. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आहे का? कोणत्याच सरकारला हे धारिष्ट्य करता आले नाही. उलट देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंना आपल्यातील शक्ती व दुबळेपणाची जाणीव होती व त्यांनी काश्मीर व चीनबाबत योग्यच भूमिका घेतली, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक व साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी केले.

ठळक मुद्देकाश्मीर व चीन प्रश्न नेहरूंनी प्रगल्भपणे हाताळला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शत्रू दुबळा असला तर त्याच्यावर दबाव बनविणे शक्य असते. पण शत्रू बलशाली असला तर त्याच्याशी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागते. राजकारणात त्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. असे नसते तर पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा गवगवा करणाऱ्या सरकारने चीनबाबत असाच कणखरपणा दाखविला असता. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आहे का? कोणत्याच सरकारला हे धारिष्ट्य करता आले नाही. उलट देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंना आपल्यातील शक्ती व दुबळेपणाची जाणीव होती व त्यांनी काश्मीर व चीनबाबत योग्यच भूमिका घेतली, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक व साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने ‘काश्मीर प्रश्न, चीन व नेहरू : एक माणूस’ या विषयावरील चिंतन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे गिरीश गांधी उपस्थित होते. द्वादशीवार यांनी सुरुवातीला काश्मीर व नंतर चीनच्या प्रश्नासह पं. नेहरू यांचे राजकीय पैलू उलगडले. नेहरूंवर सातत्याने टीका करणाऱ्यांनी कधी देशाच्या लष्कराच्या सामर्थ्याविषयी विचार केला नाही. शीखांचे एकमेव साम्राज्य राहिलेल्या काश्मीरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती त्यांनी दिली. सुफी संतांच्या धर्मप्रसाराने हा प्रदेश मुस्लिमबहुल झाला होता. देशाच्या फाळणीनंतर खºया अर्थाने काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला. नेहरूंना या प्रदेशाबाबत ओढा होता. कुणाकडे जायचे हा निर्णय येथील जनता व संस्थानिकांच्या मताने घ्यावा, अशी प्रत्येकाची भूमिका होती. पण धर्मश्रद्धा या राजकीय भूमिकेवर वरचढ असतात याची जाणीव असलेल्या नेहरूंनी हा प्रश्न सामंजस्याने हाताळला. ऑक्टोबर १९४७ ला पाकिस्तानने फौजा पाठविल्या तेव्हा काश्मीरचे राजे हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली. त्यावेळी पं. नेहरू यांनी मुत्सद्देगिरी दाखवित विलिनीकरणाची अट त्यांच्यासमोर घातली. वास्तविक फाळणीनंतर केवळ लोक इकडून तिकडे गेले नाही तर पैसा, लष्कर व शस्त्रास्त्रांचेही समान वाटप झाले. हे युद्ध १४ महिने चालले. नेहरूंनी सन्माननीय तडजोड काढण्यासाठी हा प्रश्न नंतर युनोमध्ये मांडला. यामुळे काश्मीरबाबत भारत आजही वरचढ असल्याचे द्वादशीवार यांनी स्पष्ट केले.स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच तटस्थ राष्ट्रामध्ये भारताचा दबदबा वाढला होता. नेहरूंची लोकप्रियता व आदर वाढला होता. रशिया आणि अमेरिका भारताचे मित्र झाले. प्रचंड शक्तिशाली असूनही हा सन्मान आपल्याला मिळत नाही, ही गोष्ट चीनला खटकत होती. त्यामुळे भारताला नामोहरम करून अमेरिकेला आपली ताकद दाखविण्याची खुमखुमी चीनला होती. त्यावेळी भारताचे सैन्य ३ लाख तर चीनचे ३५ लाख एवढे होते. त्यामुळे चीनशी युद्ध करणे म्हणजे आपल्या सैन्याचा बळी देण्यासारखे आहे, ही जाणीव नेहरूंना होती. ते सातत्याने युद्धापेक्षा चर्चेवर अधिक भर देत होते. मात्र चीनने कुरघोडी करीत भारताविरोधात युद्ध पुकारले. अर्थातच भारताचा पराभव झाला. पराभवाची जबाबदारी पं. नेहरू यांनी स्वत: स्वीकारली. मात्र देशाचा पराभव झाला असला तरी देश पुन्हा एकसूत्राने बांधला गेला. यानंतर मात्र चीनने कधीही भारतावर आक्रमण केले नाही, ही गोष्ट द्वादशीवार यांनी अधोरेखित केली. वास्तविक गांधीजींची हत्या व १९५० ला सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर नेहरू एकटे पडले होते. पण त्यांनी प्रगल्भपणे देशाला पुढे नेणारे निर्णय घेतले. ते खºया अर्थाने भारताचे भाग्यविधाते आहेत, असे मनोगत द्वादशीवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रमोद मुनघाटे यांनी केले.

 

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइकchinaचीनJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू