शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जिल्ह्यात अजूनही २,३५९ कुटुंबे शौचालयाविना; केवळ आकडेवारी पूर्ण करण्यासाठी शौचालये उभारली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:32 IST

स्वच्छ भारत अभियानाचे वास्तवत : मागील काही वर्षांपासून शौचालय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्राचा अर्थसंकल्प झाला, राज्याचाही जाहीर झाला. लाखो कोटींची कामे मंजूर झाली. अनेक नवे प्रकल्प जाहीर झाले. पण आजही नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ३५९ कुटुंबे शौचालयांपासून वंचित आहेत. हे वास्तव अत्यंत दुर्दैवी आहे. स्वच्छ भारत अभियानाचा डंका पिटत २०१४ मध्ये घरोघरी शौचालय ही योजना सुरू झाली. त्याअंतर्गत घरोघरी शौचालये उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात अनेक कुटुंबे शौचालयाविना आहेत.

'हागणदारीमुक्त जिल्हा' अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाने सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०१४ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्यात जवळपास १.२५ लाख शौचालयांची निर्मिती केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायतराज संस्थांमध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालयाची सुविधा उपलब्ध नसलेल्या सर्व ग्रामस्थांकडे सुविधा निर्माण करणे, हा याचा हेतू आहे. शौचालय लाभार्थ्यांना १२ हजार रुपये अनुदान दिले जाते.

शौचालये असूनही अनेक गावांत वापर नाही

  • अनेक गावांमध्ये शौचालये आहेत, पण पाणीपुरवठ्याच्या अभावामुळे ती वापरली जात नाहीत.
  • काही ठिकाणी केवळ आकडेवारी पूर्ण करण्यासाठी शौचालये उभारण्यात आली.
  • सार्वजनिक शौचालयांसाठी मिळालेल्या अनुदानाचा वापर योग्य पद्धतीने झाला का? या संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

हागणदारीमुक्त जिल्हा ?

  • 'हागणदारीमुक्त जिल्हा' अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. जिल्ह्यात हजारो कुटुंबे शौचालयविना आहेत.
  • रस्त्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या कमी झाली, हे खरे असले तरी हे अभियान पूर्णतः यशस्वी झाले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य आणि स्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
टॅग्स :nagpurनागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान