शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

जिल्ह्यात अजूनही २,३५९ कुटुंबे शौचालयाविना; केवळ आकडेवारी पूर्ण करण्यासाठी शौचालये उभारली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:32 IST

स्वच्छ भारत अभियानाचे वास्तवत : मागील काही वर्षांपासून शौचालय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्राचा अर्थसंकल्प झाला, राज्याचाही जाहीर झाला. लाखो कोटींची कामे मंजूर झाली. अनेक नवे प्रकल्प जाहीर झाले. पण आजही नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ३५९ कुटुंबे शौचालयांपासून वंचित आहेत. हे वास्तव अत्यंत दुर्दैवी आहे. स्वच्छ भारत अभियानाचा डंका पिटत २०१४ मध्ये घरोघरी शौचालय ही योजना सुरू झाली. त्याअंतर्गत घरोघरी शौचालये उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात अनेक कुटुंबे शौचालयाविना आहेत.

'हागणदारीमुक्त जिल्हा' अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाने सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०१४ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्यात जवळपास १.२५ लाख शौचालयांची निर्मिती केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायतराज संस्थांमध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालयाची सुविधा उपलब्ध नसलेल्या सर्व ग्रामस्थांकडे सुविधा निर्माण करणे, हा याचा हेतू आहे. शौचालय लाभार्थ्यांना १२ हजार रुपये अनुदान दिले जाते.

शौचालये असूनही अनेक गावांत वापर नाही

  • अनेक गावांमध्ये शौचालये आहेत, पण पाणीपुरवठ्याच्या अभावामुळे ती वापरली जात नाहीत.
  • काही ठिकाणी केवळ आकडेवारी पूर्ण करण्यासाठी शौचालये उभारण्यात आली.
  • सार्वजनिक शौचालयांसाठी मिळालेल्या अनुदानाचा वापर योग्य पद्धतीने झाला का? या संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

हागणदारीमुक्त जिल्हा ?

  • 'हागणदारीमुक्त जिल्हा' अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. जिल्ह्यात हजारो कुटुंबे शौचालयविना आहेत.
  • रस्त्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या कमी झाली, हे खरे असले तरी हे अभियान पूर्णतः यशस्वी झाले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य आणि स्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
टॅग्स :nagpurनागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान