शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अजूनही २,३५९ कुटुंबे शौचालयाविना; केवळ आकडेवारी पूर्ण करण्यासाठी शौचालये उभारली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:32 IST

स्वच्छ भारत अभियानाचे वास्तवत : मागील काही वर्षांपासून शौचालय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्राचा अर्थसंकल्प झाला, राज्याचाही जाहीर झाला. लाखो कोटींची कामे मंजूर झाली. अनेक नवे प्रकल्प जाहीर झाले. पण आजही नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ३५९ कुटुंबे शौचालयांपासून वंचित आहेत. हे वास्तव अत्यंत दुर्दैवी आहे. स्वच्छ भारत अभियानाचा डंका पिटत २०१४ मध्ये घरोघरी शौचालय ही योजना सुरू झाली. त्याअंतर्गत घरोघरी शौचालये उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात अनेक कुटुंबे शौचालयाविना आहेत.

'हागणदारीमुक्त जिल्हा' अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाने सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २०१४ ते २०१९ या कालावधीत जिल्ह्यात जवळपास १.२५ लाख शौचालयांची निर्मिती केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायतराज संस्थांमध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालयाची सुविधा उपलब्ध नसलेल्या सर्व ग्रामस्थांकडे सुविधा निर्माण करणे, हा याचा हेतू आहे. शौचालय लाभार्थ्यांना १२ हजार रुपये अनुदान दिले जाते.

शौचालये असूनही अनेक गावांत वापर नाही

  • अनेक गावांमध्ये शौचालये आहेत, पण पाणीपुरवठ्याच्या अभावामुळे ती वापरली जात नाहीत.
  • काही ठिकाणी केवळ आकडेवारी पूर्ण करण्यासाठी शौचालये उभारण्यात आली.
  • सार्वजनिक शौचालयांसाठी मिळालेल्या अनुदानाचा वापर योग्य पद्धतीने झाला का? या संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

हागणदारीमुक्त जिल्हा ?

  • 'हागणदारीमुक्त जिल्हा' अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. जिल्ह्यात हजारो कुटुंबे शौचालयविना आहेत.
  • रस्त्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या कमी झाली, हे खरे असले तरी हे अभियान पूर्णतः यशस्वी झाले नसल्याचे चित्र आहे. आरोग्य आणि स्वच्छतेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
टॅग्स :nagpurनागपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान