शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

...तर नागपुरात कर्फ्यूसह लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:14 IST

शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात बाधितांचा आकडा हा १० हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. याचा विचार करता वेळ पडल्यास संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात बाधितांचा आकडा हा १० हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. याचा विचार करता वेळ पडल्यास संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.लॉकडाऊन करण्यापूर्वी २ ते ३ दिवस आधी याची माहिती दिली जाईल. लॉकडाऊन हा जवळपास १५ दिवसांचा असेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे असे म्हणता येणार नाही. कारण, अनलॉकिंगनंतर कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, ‘मिशन बिगीन अगेन’ ३ जूनला सुरू झाले. यानंतरची कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या आणि यापूर्वीची बाधितांची आणि मृत्यूची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ३ जूनपूर्वी फक्त ११ जणांचा मृत्यू झाला. ४०० च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण होते. आज शहरातील मरणाऱ्यांची संख्या ३७ झाली असून बाधितांचा आकडा २ हजार ३०० वर पोचला आहे. बाधितांचे प्रमाण पाच पटीने तर मरणाऱ्यांचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. नागरिक नियम पाळत नाहीत. आजाराची माहिती लपवतात, त्यामुळे मृत्यू वाढले. कुठेही नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, वेळप्रसंगी आता केवळ लॉकडाऊनच नाही तर संचारबंदीदेखील लावण्यात येईल. अर्थात, नागरिकांना या दरम्यान बाहेर पडता येणार नाही, असेही ते म्हणाले.जे नागरिक आजारी आहेत, ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतोय त्यांनी स्वत:हून तपासून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दोन तासात चार लाखांचा दंड वसूलनागरिक नियम पाळत नाहीत, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढललेली आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, शिस्त ठेवावी याकरिता रस्त्यावर उतरून कारवाई केली तेव्हा, केवळ दोन तासात चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला. अशी विद्यमान परिस्थिती आहे. नियमांचे उल्लंघन होत आहे.- तर दहा हजाराहून अधिक रुग्ण होतीलनागपूर शहरात गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात न आल्यास रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला.लॉकडाऊनची पूर्वसूचना दिली जाईललॉकडाऊनचे नियम दुकानदार,ऑटोरिक्षाचालक, दुचाकी, चारचाकी वाहनचालक आणि नागरिक पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. शहरासाठी असे वर्तन हानिकारक आहे. त्यामुळे प्रसंगी कडक संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल. याबाबत दोन दिवसांपूर्वी माहिती दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या