शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

...तर नागपुरात कर्फ्यूसह लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 21:14 IST

शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात बाधितांचा आकडा हा १० हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. याचा विचार करता वेळ पडल्यास संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात लॉकडाऊन होईल की नाही, याबाबत सर्वत्र संभ्रम असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नाहीत, शहरात वाढता कोरोना संसर्ग आणि मृत्यूची संख्या यावरून ते स्पष्ट होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शहरात बाधितांचा आकडा हा १० हजारावर पोहचायला वेळ लागणार नाही. याचा विचार करता वेळ पडल्यास संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.लॉकडाऊन करण्यापूर्वी २ ते ३ दिवस आधी याची माहिती दिली जाईल. लॉकडाऊन हा जवळपास १५ दिवसांचा असेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. शहरातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे असे म्हणता येणार नाही. कारण, अनलॉकिंगनंतर कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, ‘मिशन बिगीन अगेन’ ३ जूनला सुरू झाले. यानंतरची कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या आणि यापूर्वीची बाधितांची आणि मृत्यूची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ३ जूनपूर्वी फक्त ११ जणांचा मृत्यू झाला. ४०० च्या जवळपास पॉझिटिव्ह रुग्ण होते. आज शहरातील मरणाऱ्यांची संख्या ३७ झाली असून बाधितांचा आकडा २ हजार ३०० वर पोचला आहे. बाधितांचे प्रमाण पाच पटीने तर मरणाऱ्यांचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. नागरिक नियम पाळत नाहीत. आजाराची माहिती लपवतात, त्यामुळे मृत्यू वाढले. कुठेही नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. परिणामी, वेळप्रसंगी आता केवळ लॉकडाऊनच नाही तर संचारबंदीदेखील लावण्यात येईल. अर्थात, नागरिकांना या दरम्यान बाहेर पडता येणार नाही, असेही ते म्हणाले.जे नागरिक आजारी आहेत, ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतोय त्यांनी स्वत:हून तपासून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दोन तासात चार लाखांचा दंड वसूलनागरिक नियम पाळत नाहीत, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढललेली आहे. नागरिकांनी नियम पाळावेत, शिस्त ठेवावी याकरिता रस्त्यावर उतरून कारवाई केली तेव्हा, केवळ दोन तासात चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला. अशी विद्यमान परिस्थिती आहे. नियमांचे उल्लंघन होत आहे.- तर दहा हजाराहून अधिक रुग्ण होतीलनागपूर शहरात गेल्या काही दिवसात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात न आल्यास रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला.लॉकडाऊनची पूर्वसूचना दिली जाईललॉकडाऊनचे नियम दुकानदार,ऑटोरिक्षाचालक, दुचाकी, चारचाकी वाहनचालक आणि नागरिक पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत आहे. शहरासाठी असे वर्तन हानिकारक आहे. त्यामुळे प्रसंगी कडक संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात येईल. याबाबत दोन दिवसांपूर्वी माहिती दिली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या