...तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 20:20 IST2022-04-11T20:01:18+5:302022-04-11T20:20:35+5:30

Nagpur News समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले.

... then it will take only two weeks for petrol pumps in the country to dry. | ...तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील.. 

...तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील.. 

ठळक मुद्देव्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांचा ‘आयआयएम-नागपूर’च्या विद्यार्थ्यांशी संवाद

 

नागपूर : समुद्रमार्गे आलेल्या लोकांनी देशाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे समुद्राकडे जास्त लक्ष ठेवण्याची गरज आहे. भारताचा ९५ टक्के व्यापार समुद्रातून होतो. त्यामुळे समुद्र सुरक्षित राहतील याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. ९६ टक्के कच्चे तेल आणि ८५ टक्के वायू समुद्रातून येतो. इथे काही चुकले तर देशातील पेट्रोलपंप कोरडे व्हायला फक्त दोन आठवडे लागतील. विमान वाहतूक ठप्प होईल, स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आपण भारतीयांनी समुद्राचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन नौदलाचे कार्मिक प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केले. ‘आयआयएम-नागपूर’च्या विद्यार्थ्यांशी त्यांनी ‘भारतीय नौदलाचे महत्त्व आणि नेतृत्वावरील अंतरदृष्टी’ या विषयावर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

जर एखाद्या राष्ट्राला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर ते सर्वोच्च सागरी सामर्थ्य असले पाहिजे. सध्याची राजकीय परिस्थिती, आपली भौगोलिक स्थिती आणि भारताचे ठाम शेजारी यांचा विचार करता प्रत्येक भारतीयाने सागरी क्षेत्राचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या मैत्रीपूर्ण शेजाऱ्यांकडून अस्तित्वात येणारे धोके वास्तविक आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या मार्गांवर सामोरे जाण्यासाठी तयार राहावे लागेल. चीनला २०४९ पर्यंत जागतिक महासत्ता बनायचे आहे आणि तो पूर्णपणे सागरी शक्ती बनण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे त्यांनी सांगितले. ‘आयआयएम-नागपूर’चे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

नौदलाची १३० जहाजे ‘मेड इन इंडिया’

आत्मनिर्भर भारतामध्ये भारतीय नौदल आघाडीवर आहे. भारतीय नौदलाने पहिले जहाज १९६१ साली बांधले आणि आज १३० जहाजे पूर्णपणे भारतात तयार झाली आहेत, असे दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले.

Web Title: ... then it will take only two weeks for petrol pumps in the country to dry.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.