-तर भिंगारे, वसू यांना पुन्हा संधी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:25+5:302021-03-26T04:09:25+5:30
कळमेश्वर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कळमेश्वर पंचायत समितीअंतर्गत ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले कोहळी गणाचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती ...

-तर भिंगारे, वसू यांना पुन्हा संधी ()
कळमेश्वर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कळमेश्वर पंचायत समितीअंतर्गत ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले कोहळी गणाचे सदस्य व पंचायत समितीचे सभापती श्रावण भिंगारे व तेलकामठी गणाच्या सदस्या मालती वसू यांचे सदस्यत्व रद्द झाले. मात्र, नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत कोहळी पंचायत समिती गण सर्वसाधारण व तेलकामठी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुका झाल्यास कोहळी गणात काँग्रेसकडून श्रावण भिंगारे व तेलकामठी गणात मालती वसू यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या उमेदवारांनी सदस्यत्व रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यास जि.प.च्या १६ आणि पं.स.च्या ३१ गणात निवडणुका निश्चित होतील. त्यामुळे सर्वच ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढण्याची तयारी चालविली आहे.
सभापती भिंगारे यांनी पुन्हा निवडणूक घेण्याच्या एकूणच प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ग्रामीण भागात राजकीय व्यक्तींना खूप संघर्ष करावा लागतो. निवडणूक लढणे साधे काम नाही. प्रशासन तसेच निवडणूक आयोगाने पूर्वीच यावर विचार करून निर्णय घ्यायला हवा होता. आता त्यांच्या चुकीचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. यामुळे ग्रामीण भागाचा विकास रखडण्याचा धोका निर्माण झाला आहे.