शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नगरविकास विभागाने केलाय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:35 IST

उच्च न्यायालयाचे निरीक्षण : वणी नगर परिषदेचे गाळे लिलाव प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगर परिषदेच्या गाळे लिलाव प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा नगर विकास विभागाने अवमान केला आहे, असे परखड प्राथमिक निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदविले आणि नगर विकास विभागाला यावर येत्या शुक्रवारी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.

गाळे लिलावाच्या निर्णयावर पुनर्विचार व्हावा याकरिता व्यावसायिकांच्या गांधी चौक गोलधारक संघटनेने नगर विकास विभागाकडे दाखल केलेला अर्ज चार आठवड्यांत निकाली काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने २० डिसेंबर २०२४ रोजी दिला होता. त्यानंतर नगर विकास विभागाने या अर्जावर २१ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी घेऊन निर्णय राखून ठेवला; परंतु तो निर्णय अद्याप जाहीर केला नाही. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता नगर विकास विभागाची कानउघाडणी केली. सर्वोच्च न्यायालयाने अर्ज निकाली काढण्यासाठी दिलेली मुदत कधीचीच संपली आहे.

काय दिला इशारा?नगर विकास विभागाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला आहे, असे उच्च न्यायालय म्हणाले, तसेच येत्या शुक्रवारी यावर समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास नगर विकास विभागाविरुद्ध अवमान कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले जाईल, असा इशारा दिला.

जनहित याचिका प्रलंबितवणी नगर परिषदेच्या १६० गाळ्यांना व्यावसायिकांच्या अवैध ताब्यातून मुक्त करून त्या गाळ्यांचा लिलाव व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग टोंगे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ६ नोव्हेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने टोंगे यांची ही मागणी मंजूर करून गाळ्यांचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता; परंतु विविध कारणांमुळे अद्याप गाळ्यांचा लिलाव झाला नाही. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. मोहित खजांची, तर नगर परिषदेतर्फे अॅड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :nagpurनागपूरSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय