शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

वाढत्या अपघाताला परिवहन विभागच जबाबदार! अपर परिवहन आयुक्त, आरटीओ, एआरटीओची २६ पदांचा भार

By सुमेध वाघमार | Updated: August 28, 2023 11:59 IST

दोन ते चार वर्षांपासून या विभागातील तब्बल २६ पदांचा कार्यभार अतिरिक्त म्हणून पाहिला जात आहे

सुमेध वाघमारे

नागपूर : वाहन परवाना देणे, वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणे, वाहनांची तपासणी करणे, अपघात रोखणे, वायूप्रदूषणावर नियंत्रण आणणे, वाहतूक नियमांची जनजागृती करणे आदी, महत्त्वाचे कामकाज परिवहन विभागातून चालते. असे असताना, मागील दोन ते चार वर्षांपासून या विभागातील तब्बल २६ पदांचा कार्यभार अतिरिक्त म्हणून पाहिला जात आहे. परिणामी, रोजचे कामकाज प्रभावित होत असून, वाढत्या अपघाताला परिवहन विभागच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात परिवहन विभागांतर्गत १५ प्रादेशिक परिवहन कार्यालय व ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत ‘आरटीओ’ व ‘एआरटीओ’ कार्यालय असताना अपघातांच्या संख्येवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यात १९ हजार ७१९ अपघात झाले. यात ८ हजार ९०७ व्यक्तींचा मृत्यू, तर १६ हजार ६५३ जण जखमी झाले. एकूण रोज ४२ जणांचा अपघातात हकनाक बळी जात आहे. यामागे आरटीओ कार्यालयातून मिळणाऱ्या परवान्यापासून ते वाहनांची तपासणी, वाहन चालकांचे प्रशिक्षण, वाहतूक नियमांची अंमलबजावणी या सर्वांवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

परिवहन विभागातील अपर परिवहन आयुक्ताचे पद हे २०२० पासून अतिरिक्त कार्यभार म्हणून सांभाळला जात आहे. याशिवाय, सहपरिवहन आयुक्त, परिवहन उपआयुक्त (संगणक) व परिवहन उपआयुक्ताचे (निरीक्षण) पदही प्रभारी अधिकारी पाहत आहेत.

- १० प्रादेशिक परिवहन कार्यालयही प्रभारींवर

राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई-पश्चिम, मुंबई पूर्व, पनवेल, कोल्हापूर, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर व लातूरमध्ये कायमस्वरुपी प्रादेशिक परिवहन अधिकारी नाहीत. २०२० ते २०२१ पासून या सर्व कार्यालयांचा कारभार अतिरिक्त म्हणून पाहिला जात आहे. विशेष म्हणजे, अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे या कार्यालयासह तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार देण्यात आला आहे. यामुळे कार्यालयात दलालांचे साम्राज्य वाढले असून कार्यालयाच्या परिसरातच एजंटनी आपली दुकाने थाटली आहेत.

- १२ उपप्रादेशिक परिवहन अधिकारीही प्रभारी

कल्याण, सिंधुदुर्ग, सोलापूर, बारामती, श्रीरामपूर, सांगली, यवतमाळ, नागपूर शहर, वर्धा, बीड, हिंगोली व मुंबई या १२ कार्यालयांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद प्रभारी म्हणून पाहिले जात आहे. मागील तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे.

- चार वर्षांपासून पदोन्नतीच नाही

दर तीन वर्षांनी कालबद्द पदोन्नतीचा नियम असताना परिवहन विभागाने मागील चार वर्षांपासून पदोन्नती दिली नाही. अधिकारी अतिरिक्त कार्यभारात अडकले आहेत. याच प्रभाव कार्यालयातील रोजच्या कामकाजावर पडत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑनलाईन बदल्यांचाही प्रश्न रेंगाळत चालला आहे.

- अधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना

कालबद्ध पदोन्नती मिळत नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. २५ ऑगस्ट रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलनाचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज व त्यांनतर पेन डाऊन, अतिरिक्त कारभार सोडून नियमानुसार काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिल्याचे समजते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAccidentअपघातnagpurनागपूर