शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

वाढत्या अपघाताला परिवहन विभागच जबाबदार! अपर परिवहन आयुक्त, आरटीओ, एआरटीओची २६ पदांचा भार

By सुमेध वाघमार | Updated: August 28, 2023 11:59 IST

दोन ते चार वर्षांपासून या विभागातील तब्बल २६ पदांचा कार्यभार अतिरिक्त म्हणून पाहिला जात आहे

सुमेध वाघमारे

नागपूर : वाहन परवाना देणे, वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणे, वाहनांची तपासणी करणे, अपघात रोखणे, वायूप्रदूषणावर नियंत्रण आणणे, वाहतूक नियमांची जनजागृती करणे आदी, महत्त्वाचे कामकाज परिवहन विभागातून चालते. असे असताना, मागील दोन ते चार वर्षांपासून या विभागातील तब्बल २६ पदांचा कार्यभार अतिरिक्त म्हणून पाहिला जात आहे. परिणामी, रोजचे कामकाज प्रभावित होत असून, वाढत्या अपघाताला परिवहन विभागच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात परिवहन विभागांतर्गत १५ प्रादेशिक परिवहन कार्यालय व ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत ‘आरटीओ’ व ‘एआरटीओ’ कार्यालय असताना अपघातांच्या संख्येवर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यात १९ हजार ७१९ अपघात झाले. यात ८ हजार ९०७ व्यक्तींचा मृत्यू, तर १६ हजार ६५३ जण जखमी झाले. एकूण रोज ४२ जणांचा अपघातात हकनाक बळी जात आहे. यामागे आरटीओ कार्यालयातून मिळणाऱ्या परवान्यापासून ते वाहनांची तपासणी, वाहन चालकांचे प्रशिक्षण, वाहतूक नियमांची अंमलबजावणी या सर्वांवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

परिवहन विभागातील अपर परिवहन आयुक्ताचे पद हे २०२० पासून अतिरिक्त कार्यभार म्हणून सांभाळला जात आहे. याशिवाय, सहपरिवहन आयुक्त, परिवहन उपआयुक्त (संगणक) व परिवहन उपआयुक्ताचे (निरीक्षण) पदही प्रभारी अधिकारी पाहत आहेत.

- १० प्रादेशिक परिवहन कार्यालयही प्रभारींवर

राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई-पश्चिम, मुंबई पूर्व, पनवेल, कोल्हापूर, नाशिक, धुळे, औरंगाबाद, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर व लातूरमध्ये कायमस्वरुपी प्रादेशिक परिवहन अधिकारी नाहीत. २०२० ते २०२१ पासून या सर्व कार्यालयांचा कारभार अतिरिक्त म्हणून पाहिला जात आहे. विशेष म्हणजे, अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे या कार्यालयासह तीन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार देण्यात आला आहे. यामुळे कार्यालयात दलालांचे साम्राज्य वाढले असून कार्यालयाच्या परिसरातच एजंटनी आपली दुकाने थाटली आहेत.

- १२ उपप्रादेशिक परिवहन अधिकारीही प्रभारी

कल्याण, सिंधुदुर्ग, सोलापूर, बारामती, श्रीरामपूर, सांगली, यवतमाळ, नागपूर शहर, वर्धा, बीड, हिंगोली व मुंबई या १२ कार्यालयांमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद प्रभारी म्हणून पाहिले जात आहे. मागील तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे.

- चार वर्षांपासून पदोन्नतीच नाही

दर तीन वर्षांनी कालबद्द पदोन्नतीचा नियम असताना परिवहन विभागाने मागील चार वर्षांपासून पदोन्नती दिली नाही. अधिकारी अतिरिक्त कार्यभारात अडकले आहेत. याच प्रभाव कार्यालयातील रोजच्या कामकाजावर पडत असल्याचे चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑनलाईन बदल्यांचाही प्रश्न रेंगाळत चालला आहे.

- अधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना

कालबद्ध पदोन्नती मिळत नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. २५ ऑगस्ट रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलनाचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून कामकाज व त्यांनतर पेन डाऊन, अतिरिक्त कारभार सोडून नियमानुसार काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिल्याचे समजते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAccidentअपघातnagpurनागपूर