शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते; विजय वडेट्टीवारांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 09:47 IST

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. - विजय वडेट्टीवार

मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते. आज मंत्रिमंडळामध्ये काही ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी बैठकीत काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष लागलेले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. हे आंदोलन संपून न्याय देण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने राज्यपालांना भेटून केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच सरकारला आवाहन करतोय. तुम्ही लावलेली ही आग आहे. सरकारच्या चुकीच्या घोषणेमुळे निर्णयामुळे, खोट्या आश्वासनांमुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर झालेली आहे. आमचा सरकारवर विश्वास नाही, जरांगे पाटलांनी सांगितले. राज्यात सरकारने विश्वास गमावला. सरकारने पायउतार झाले पाहिजे, हे सरकार असंविधानीक आहे. तिन्ही नेते एकमेकांवर ढकलले जात आहे. जबाबदारी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेत नाही. तीन तोंडाचे तीन सरकार आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन आणि मागण्या तातडीने सोडविल्या पाहिजेत. उग्रपणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन थांबले पाहिजे. मालमत्तेचे नुकसान करून जीव जाऊन काही उपयोग होणार नाही. शांततेने आंदोलन करा, तुमच्या मागणीला यश देण्याचे काम सरकार करेल, असा विश्वास आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaratha Reservationमराठा आरक्षण