शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते; विजय वडेट्टीवारांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 09:47 IST

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. - विजय वडेट्टीवार

मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते. आज मंत्रिमंडळामध्ये काही ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी बैठकीत काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष लागलेले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. हे आंदोलन संपून न्याय देण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने राज्यपालांना भेटून केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच सरकारला आवाहन करतोय. तुम्ही लावलेली ही आग आहे. सरकारच्या चुकीच्या घोषणेमुळे निर्णयामुळे, खोट्या आश्वासनांमुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर झालेली आहे. आमचा सरकारवर विश्वास नाही, जरांगे पाटलांनी सांगितले. राज्यात सरकारने विश्वास गमावला. सरकारने पायउतार झाले पाहिजे, हे सरकार असंविधानीक आहे. तिन्ही नेते एकमेकांवर ढकलले जात आहे. जबाबदारी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेत नाही. तीन तोंडाचे तीन सरकार आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन आणि मागण्या तातडीने सोडविल्या पाहिजेत. उग्रपणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन थांबले पाहिजे. मालमत्तेचे नुकसान करून जीव जाऊन काही उपयोग होणार नाही. शांततेने आंदोलन करा, तुमच्या मागणीला यश देण्याचे काम सरकार करेल, असा विश्वास आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaratha Reservationमराठा आरक्षण