शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते; विजय वडेट्टीवारांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 09:47 IST

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. - विजय वडेट्टीवार

मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते. आज मंत्रिमंडळामध्ये काही ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी बैठकीत काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष लागलेले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. हे आंदोलन संपून न्याय देण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने राज्यपालांना भेटून केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच सरकारला आवाहन करतोय. तुम्ही लावलेली ही आग आहे. सरकारच्या चुकीच्या घोषणेमुळे निर्णयामुळे, खोट्या आश्वासनांमुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर झालेली आहे. आमचा सरकारवर विश्वास नाही, जरांगे पाटलांनी सांगितले. राज्यात सरकारने विश्वास गमावला. सरकारने पायउतार झाले पाहिजे, हे सरकार असंविधानीक आहे. तिन्ही नेते एकमेकांवर ढकलले जात आहे. जबाबदारी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेत नाही. तीन तोंडाचे तीन सरकार आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन आणि मागण्या तातडीने सोडविल्या पाहिजेत. उग्रपणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन थांबले पाहिजे. मालमत्तेचे नुकसान करून जीव जाऊन काही उपयोग होणार नाही. शांततेने आंदोलन करा, तुमच्या मागणीला यश देण्याचे काम सरकार करेल, असा विश्वास आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaratha Reservationमराठा आरक्षण