शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते; विजय वडेट्टीवारांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 09:47 IST

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. - विजय वडेट्टीवार

मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस अजगरासारखे सुस्त पडले होते. आज मंत्रिमंडळामध्ये काही ठोस निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असल्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आरक्षणासाठी बैठकीत काय निर्णय घेते याकडे आमचे लक्ष लागलेले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. हे आंदोलन संपून न्याय देण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने राज्यपालांना भेटून केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच सरकारला आवाहन करतोय. तुम्ही लावलेली ही आग आहे. सरकारच्या चुकीच्या घोषणेमुळे निर्णयामुळे, खोट्या आश्वासनांमुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर झालेली आहे. आमचा सरकारवर विश्वास नाही, जरांगे पाटलांनी सांगितले. राज्यात सरकारने विश्वास गमावला. सरकारने पायउतार झाले पाहिजे, हे सरकार असंविधानीक आहे. तिन्ही नेते एकमेकांवर ढकलले जात आहे. जबाबदारी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेत नाही. तीन तोंडाचे तीन सरकार आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. आजच्या मंत्रिमंडळात हा ठोस निर्णय घेतात का याकडे आमचे लक्ष लागले आहे. हे आंदोलन आणि मागण्या तातडीने सोडविल्या पाहिजेत. उग्रपणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन थांबले पाहिजे. मालमत्तेचे नुकसान करून जीव जाऊन काही उपयोग होणार नाही. शांततेने आंदोलन करा, तुमच्या मागणीला यश देण्याचे काम सरकार करेल, असा विश्वास आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaratha Reservationमराठा आरक्षण