शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
3
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
4
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
5
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
6
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
7
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
8
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
9
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
10
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
11
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
12
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: ७ राशींना 'धनलक्ष्मी'चा विशेष लाभ, ५ राशींना संयमाचा सल्ला!
13
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
14
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
15
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
16
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
17
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
18
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
19
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
20
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यात बदल झाल्याने सत्र न्यायालयाने सोडले होते निर्दोष; हायकोर्टात दंगलीतील आरोपींना जन्मठेप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:37 IST

Nagpur : तेव्हापर्यंत घटनेला १२ वर्षे झाली होती. त्यामुळे आरोपींचे वय वाढून चेहऱ्यात बदल झाले होते. परिणामी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना आरोपींची ओळख पटवता आली नाही. त्याचा लाभ आरोपींना मिळाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे ३७वर्षांपूर्वी दोन गटांत दंगल घडल्यानंतर पाच शिवसैनिकांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी (ता. २४) जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांनी हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला.

अब्दुल अजीज शेख मेहबूब, रफी खान मेहबूब खान व शेख तय्यब शेख मुनाफ, अशी ही शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. ३० सप्टेंबर २००० रोजी अकोला सत्र न्यायालयाने या तिघांसह इतर सर्व आरोपींना ठोस पुरावे नसल्याचे कारण देत निर्दोष मुक्त केले होते.

परिणामी, राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावरील अंतिम सुनावणीदरम्यान सरकारी वकील अॅड. एम. जे. खान यांनी हे तीन आरोपी हत्या व इतर विविध गुन्ह्यांमध्ये दोषी असल्याचे रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर सिद्ध केले. करिता, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून या तीन आरोपींना ही शिक्षा सुनावली तर, इतर आरोपींचे निर्दोषत्व कायम ठेवले.

ही बहुचर्चित दंगल ५ जून १९८८ रोजी घडली होती. त्या दिवशी तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव गावंडे यांच्या हस्ते पंचगव्हाण येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन होणार होते. त्या कार्यक्रमासाठी ट्रॅक्टरने पंचगव्हाण येथे आलेल्या शिवसैनिकांवर दुसऱ्या गटातील आरोपींनी धारदार शस्त्रांसह हल्ला केला. आरोपी नरसीपूर आणि खेलदेशपांडे या दोन गावांदरम्यानच्या विद्रुपा नदीकाठी बंगाली बाभुळबनामध्ये लपून बसले होते. त्यांनी पाथर्डी येथील अवचित कुकडे, श्रीराम गावंडे व दिगंबर गावंडे यांची हत्या केली. 

याशिवाय, नेरधामणा येथून छकड्याने आलेल्या काही शिवसैनिकांवर पोहरा नदीजवळ अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला याम नेरधामना येथील श्रीराम भांबेरे ठार झाले होते तसेच, या हल्ल्यात अनेक शिवसैनिक गंभीर जखमी झाले होते. 

१४० आरोपींवर गुन्हा दाखल

या समाजविघातक घटनेनंतर पोलिसांनी दुसऱ्या गटातील १३५ ते १४० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तसेच, तपास पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयात सरकारतर्फे अॅड. वाय. डब्ल्यू, देशमुख यांनी बाजू मांडली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Acquitted in riot case, convicts get life term by High Court!

Web Summary : Three convicts in a 37-year-old riot case, initially acquitted by a lower court due to lack of evidence, were sentenced to life imprisonment by the Nagpur bench of the Bombay High Court. The case involved the murder of five Shiv Sainiks in Akola district.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयAkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र