शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यात बदल झाल्याने सत्र न्यायालयाने सोडले होते निर्दोष; हायकोर्टात दंगलीतील आरोपींना जन्मठेप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:37 IST

Nagpur : तेव्हापर्यंत घटनेला १२ वर्षे झाली होती. त्यामुळे आरोपींचे वय वाढून चेहऱ्यात बदल झाले होते. परिणामी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना आरोपींची ओळख पटवता आली नाही. त्याचा लाभ आरोपींना मिळाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे ३७वर्षांपूर्वी दोन गटांत दंगल घडल्यानंतर पाच शिवसैनिकांची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी (ता. २४) जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय उर्मिला जोशी-फलके व नंदेश देशपांडे यांनी हा बहुप्रतिक्षित निर्णय दिला.

अब्दुल अजीज शेख मेहबूब, रफी खान मेहबूब खान व शेख तय्यब शेख मुनाफ, अशी ही शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. ३० सप्टेंबर २००० रोजी अकोला सत्र न्यायालयाने या तिघांसह इतर सर्व आरोपींना ठोस पुरावे नसल्याचे कारण देत निर्दोष मुक्त केले होते.

परिणामी, राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यावरील अंतिम सुनावणीदरम्यान सरकारी वकील अॅड. एम. जे. खान यांनी हे तीन आरोपी हत्या व इतर विविध गुन्ह्यांमध्ये दोषी असल्याचे रेकॉर्डवरील पुराव्यांच्या आधारावर सिद्ध केले. करिता, उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून या तीन आरोपींना ही शिक्षा सुनावली तर, इतर आरोपींचे निर्दोषत्व कायम ठेवले.

ही बहुचर्चित दंगल ५ जून १९८८ रोजी घडली होती. त्या दिवशी तत्कालीन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव गावंडे यांच्या हस्ते पंचगव्हाण येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन होणार होते. त्या कार्यक्रमासाठी ट्रॅक्टरने पंचगव्हाण येथे आलेल्या शिवसैनिकांवर दुसऱ्या गटातील आरोपींनी धारदार शस्त्रांसह हल्ला केला. आरोपी नरसीपूर आणि खेलदेशपांडे या दोन गावांदरम्यानच्या विद्रुपा नदीकाठी बंगाली बाभुळबनामध्ये लपून बसले होते. त्यांनी पाथर्डी येथील अवचित कुकडे, श्रीराम गावंडे व दिगंबर गावंडे यांची हत्या केली. 

याशिवाय, नेरधामणा येथून छकड्याने आलेल्या काही शिवसैनिकांवर पोहरा नदीजवळ अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला याम नेरधामना येथील श्रीराम भांबेरे ठार झाले होते तसेच, या हल्ल्यात अनेक शिवसैनिक गंभीर जखमी झाले होते. 

१४० आरोपींवर गुन्हा दाखल

या समाजविघातक घटनेनंतर पोलिसांनी दुसऱ्या गटातील १३५ ते १४० आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तसेच, तपास पूर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयात सरकारतर्फे अॅड. वाय. डब्ल्यू, देशमुख यांनी बाजू मांडली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Acquitted in riot case, convicts get life term by High Court!

Web Summary : Three convicts in a 37-year-old riot case, initially acquitted by a lower court due to lack of evidence, were sentenced to life imprisonment by the Nagpur bench of the Bombay High Court. The case involved the murder of five Shiv Sainiks in Akola district.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयAkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र