शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोज कोट्यवधी रुपये कमवणाऱ्या रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित ! 

By नरेश डोंगरे | Updated: July 28, 2024 22:33 IST

कोरोना काळापासून बंद : सर्व काही सुरळीत; भाड्यात कधी मिळणार सूट ?

नरेश डोंगरे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क

 नागपूर : कोरोना काळातील धोके लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने गाड्यांमधील प्रवासांवर अनेक निर्बंध घातले. अनेक सोयीसुविधा बंद केल्या. तो धोकादायक कालावधी संपल्यानंतर रेल्वेचे सर्व आधीप्रमाणेच सुरळीत झाले. गाड्यांमधील गर्दी वाढली अन् उत्पन्नाचे स्त्रोतही पुर्वीपेक्षा जास्त झाले. मात्र, रेल्वेने कोरोना काळात बंद केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा अद्याप सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वत्र तीव्र रोष आहे.

कधी नव्हे एवढ्या झपाट्याने रेल्वेचा 'विविध कलमी विकास कार्यक्रम' सुरू आहे. रेल्वे मार्गाचे प्रशस्तीकरण, नुतनीकरण, ऑटोमेटिक सिग्नलिंग सिस्टम, मोठमोठे पूल बांधणे, रेल्वे स्थानकांवर विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून लाखो कोटी रुपये खर्ची घातले जात आहे. मात्र, हे सर्व करताना रेल्वे मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना दुर्लक्षित केले आहे. कोरोना काळात बंद केलेल्या प्रवास सवलती आताही बंदच आहे. त्या पूर्ववत सुरू व्हाव्या, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे ठिकठिकाणाहून विनंती, अर्ज गेले. काही ठिकाणी निदर्शने, आंदोलनही झाली. विविध सामाजिक संघटना, सेवाभावी व्यक्तींनी याबाबत आवाजही उठविला. मात्र, रेल्वे मंत्रालयाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही.

विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत रेल्वेने उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधले आहेत. प्रवासी भाडे आणि माल वाहतूकीतून मिळणाऱ्या पारंपारिक उत्पन्नातही मोठी वाढ केली आहे. मात्र, जाहिराती, पार्किंग, कॅटरिंग, अताबाहेर रेस्टॉरंट, स्टॉल्स, डिजिटल बोर्ड यासह उत्पन्नाचे नवनवे दालनही खुले केले आहेत. या वेगवेगळ्या स्त्रोतांमुळे रेल्वेच्या तिजोरीत महिन्याला हजारो कोटी रुपये जमा होत आहे.

ज्येष्ठांची सवलत तातडीने सुरू कराज्येष्ठांना देशाच्या नव्या पिढीचे मार्गदर्शक मानले जाते. असेच अनेक अनेक ज्येष्ठ नागरिक ईच्छा असूनही केवळ पैशाअभावी धार्मिक स्थळी, दूरवर असणाऱ्या नातेवाईकांकडे प्रवास करू शकत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी तिकिटात सवलत देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने तातडीने घ्यावा, अशी मागणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या प्रादेशिक सल्लागार समितीचे माजी सदस्य डॉ. प्रवीण डबली यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर