शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

वाहतुकीच्या 'सुरक्षिततेचे रिपोर्ट कार्ड' तुमचे डोळे उघडेल ! नागपूर वाहतुकीसाठी किती धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:25 IST

'आयटीडीपी'चा सर्वेक्षण अहवाल : महापालिका कसे देणार आव्हानांना तोंड?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. आयटीडीपी (इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अॅण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी) संस्थेने केलेल्या या अभ्यासानुसार, नागपुरातील केवळ वर्धा रोड वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. तर सेंट्रल बाजार रोड, शंकरनगर रोड, अमरावती रोड, ऑरेंज सिटी रोड आणि रिंग रोड हे रस्ते प्रवाशांसाठी अपुऱ्या सुरक्षिततेमुळे धोकादायक ठरत असल्याचे अहवालात नमूद आहे.

मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयटीडीपी संस्थेने शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण केले. या अभ्यासाचा अहवाल नुकताच सोमवारी प्रसिद्ध झाला, रस्त्यांचे संचालन, सुरक्षा, सुलभता आणि सर्वसमावेशकता या निकषांवर आधारित या सर्वेक्षणात वर्धा रोड वगळता बाकी रस्त्यांनी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. रहाटे कॉलनी चौक ते अजनी चौक या १.३ किलोमीटर लांबीच्या पट्टयाला ३० पैकी तब्बल २४.७५ गुण मिळाले आहेत. डिझाइनपासून निरीक्षणापर्यंत बहुतेक निकषांवर हा रस्ता उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, ८० टक्के नागरिकांनी या पट्टयाला 'चालण्यासाठी, सायकलसाठी व वाहतुकीसाठी सुरक्षित' असल्याचं मान्यता दिली आहे. या रस्त्यावर पायी चालणारे नागरिक प्रामुख्याने फुटपाथवरूनच चालताना दिसून आले. नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट (एनएमटी) साठी स्वतंत्र पट्टा असून बसण्यासाठी व चालण्यासाठी योग्य व्यवस्था आहे. तसेच, जंक्शनही सुरक्षित असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मात्र, काही ठिकाणी फुटपाथवर पार्किंग आढळली असून सायकलिंगसाठी अजूनही विशेष व्यवस्था नाही, हा कमीपणाही अधोरेखित करण्यात आला आहे.

पायी चालणाऱ्यांना, सायकलस्वारांना सुरक्षित नाहीवर्धा रोड वगळता उर्वरित रस्त्यांवर पायी चालणाऱ्यांची व सायकलस्वारांची अवस्था अत्यंत असुरक्षित आहे. रस्ता ओलांडताना सुरक्षित वाटत नाही, जंक्शनजवळ अपघाताची भीती सतत वाटते. सायकलिंगसाठी कुठलीही व्यवस्था नाही आणि इंटरकनेक्टिव्हिटीचाही अभाव आहे. फुटपाथ अर्धवट, खंडित किंवा अतिक्रमित आहेत. सेंट्रल बाजार रोड (लोकमत चौक ते बजाजनगर चौक) व रिंग रोड या मार्गावर तर पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरूनच जावे लागते. फुटपाथ कुठे आहेत, तर तिथे दुकानदार व वाहनचालकांनी अतिक्रमण केलेले आहे. रिंग रोडवर सायकलस्वारांची संख्या अधिक असूनही त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. सर्वेक्षणात या सगळ्या अडचणी ठळकपणे नोंदवण्यात आल्या आहेत.

या रस्त्यांवर अपघाताचे धोकेस्पीड गन वापरून केलेल्या स्पीड सर्वेक्षणात बहुतेक रस्त्यांवर ताशी ६० किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांचा वेग आढळून आला. ऑरेंज सिटी रोड आणि अमरावती रोडवर दुचाकींचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत नोंदविण्यात आला. हा वेग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षित रस्त्यांच्या डिझाइन मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे. ज्यामुळे मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शहरांमध्ये आदर्श वेग मर्यादा सुमारे ३०-४० किलोमीटर प्रति तास असावी, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. 

सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते करू"या अभ्यासामुळे आपल्याला कुठे सुधारणा करावी लागेल हे स्पष्टपणे कळते. आम्ही या शिफारशी शहरपातळीवर लागू करून, सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते तयार करू."- वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर