शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या 'सुरक्षिततेचे रिपोर्ट कार्ड' तुमचे डोळे उघडेल ! नागपूर वाहतुकीसाठी किती धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:25 IST

'आयटीडीपी'चा सर्वेक्षण अहवाल : महापालिका कसे देणार आव्हानांना तोंड?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. आयटीडीपी (इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्पोर्टेशन अॅण्ड डेव्हलपमेंट पॉलिसी) संस्थेने केलेल्या या अभ्यासानुसार, नागपुरातील केवळ वर्धा रोड वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. तर सेंट्रल बाजार रोड, शंकरनगर रोड, अमरावती रोड, ऑरेंज सिटी रोड आणि रिंग रोड हे रस्ते प्रवाशांसाठी अपुऱ्या सुरक्षिततेमुळे धोकादायक ठरत असल्याचे अहवालात नमूद आहे.

मार्च २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयटीडीपी संस्थेने शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण केले. या अभ्यासाचा अहवाल नुकताच सोमवारी प्रसिद्ध झाला, रस्त्यांचे संचालन, सुरक्षा, सुलभता आणि सर्वसमावेशकता या निकषांवर आधारित या सर्वेक्षणात वर्धा रोड वगळता बाकी रस्त्यांनी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. रहाटे कॉलनी चौक ते अजनी चौक या १.३ किलोमीटर लांबीच्या पट्टयाला ३० पैकी तब्बल २४.७५ गुण मिळाले आहेत. डिझाइनपासून निरीक्षणापर्यंत बहुतेक निकषांवर हा रस्ता उभा राहिला आहे. विशेष म्हणजे, ८० टक्के नागरिकांनी या पट्टयाला 'चालण्यासाठी, सायकलसाठी व वाहतुकीसाठी सुरक्षित' असल्याचं मान्यता दिली आहे. या रस्त्यावर पायी चालणारे नागरिक प्रामुख्याने फुटपाथवरूनच चालताना दिसून आले. नॉन मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट (एनएमटी) साठी स्वतंत्र पट्टा असून बसण्यासाठी व चालण्यासाठी योग्य व्यवस्था आहे. तसेच, जंक्शनही सुरक्षित असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. मात्र, काही ठिकाणी फुटपाथवर पार्किंग आढळली असून सायकलिंगसाठी अजूनही विशेष व्यवस्था नाही, हा कमीपणाही अधोरेखित करण्यात आला आहे.

पायी चालणाऱ्यांना, सायकलस्वारांना सुरक्षित नाहीवर्धा रोड वगळता उर्वरित रस्त्यांवर पायी चालणाऱ्यांची व सायकलस्वारांची अवस्था अत्यंत असुरक्षित आहे. रस्ता ओलांडताना सुरक्षित वाटत नाही, जंक्शनजवळ अपघाताची भीती सतत वाटते. सायकलिंगसाठी कुठलीही व्यवस्था नाही आणि इंटरकनेक्टिव्हिटीचाही अभाव आहे. फुटपाथ अर्धवट, खंडित किंवा अतिक्रमित आहेत. सेंट्रल बाजार रोड (लोकमत चौक ते बजाजनगर चौक) व रिंग रोड या मार्गावर तर पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरूनच जावे लागते. फुटपाथ कुठे आहेत, तर तिथे दुकानदार व वाहनचालकांनी अतिक्रमण केलेले आहे. रिंग रोडवर सायकलस्वारांची संख्या अधिक असूनही त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. सर्वेक्षणात या सगळ्या अडचणी ठळकपणे नोंदवण्यात आल्या आहेत.

या रस्त्यांवर अपघाताचे धोकेस्पीड गन वापरून केलेल्या स्पीड सर्वेक्षणात बहुतेक रस्त्यांवर ताशी ६० किलोमीटरपेक्षा जास्त वाहनांचा वेग आढळून आला. ऑरेंज सिटी रोड आणि अमरावती रोडवर दुचाकींचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत नोंदविण्यात आला. हा वेग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षित रस्त्यांच्या डिझाइन मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा जास्त आहे. ज्यामुळे मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. शहरांमध्ये आदर्श वेग मर्यादा सुमारे ३०-४० किलोमीटर प्रति तास असावी, असे सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. 

सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते करू"या अभ्यासामुळे आपल्याला कुठे सुधारणा करावी लागेल हे स्पष्टपणे कळते. आम्ही या शिफारशी शहरपातळीवर लागू करून, सुरक्षित व सर्वसमावेशक रस्ते तयार करू."- वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महापालिका 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर