शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

सैनिक शाळेने काढलेल्या 'त्या' ५२ विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग मोकळा, पाच वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती मंजूर 

By निशांत वानखेडे | Updated: December 17, 2023 16:12 IST

पाच वर्षापासून रखडलेल्या शिष्यवृत्तीचा जीआर अखेर सरकारने काढला आणि काढलेल्या ५२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

नागपूर : सरकारकडून शिष्यवृत्तीची थकबाकी न मिळाल्याने चंद्रपूरच्या सैनिक शाळेने अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले होते. लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित करताच राज्यभरात खळबळ उडाली होती. पाच वर्षापासून रखडलेल्या शिष्यवृत्तीचा जीआर अखेर सरकारने काढला आणि काढलेल्या ५२ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

चंद्रपूरच्या सैनिक शाळेने शिक्षक दिनाच्या आदल्याच दिवशी अनुसूचित जाती-जमातीच्या ५२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या कारणाने शाळेतून काढले हाेते. या विद्यार्थ्यांना २०१९ च्या शासन निर्णयानुसार शाळेत प्रवेश देण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे सैनिकी शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एससी, एसटी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९ साली घेतला होता. निर्णय तर घेतला पण अंमलबजावणीबाबतचे कुठलेही परिपत्रक शासनाने काढले नव्हते. इकडे चंद्रपूरच्या सामाजिक न्याय विभागाने परिपत्रकाची वाट न पाहता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आणि विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क न आकारण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला दिले होते.  

शिष्यवृत्तीचे परिपत्रक पोहचल्यानंतर शुल्क अदा करण्यात येईल, असे पत्रात नमूद करण्यात आले. याच आधारावर शाळेने इयत्ता ६ वीपासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले. पहिल्या वर्षी २५ आणि दुसऱ्या वर्षी २७ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. मात्र चार वर्ष लोटूनही सरकारने जीआर आढला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शाळेला मिळाली नाही. त्यामुळे शाळेने विद्यार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात विद्यार्थ्यांना काढण्यात आले. दरम्यान हे विद्यार्थी आता ८ व ९ वी मध्ये असल्याने पालकांनी शाळेला विद्यार्थ्यांचे नुकसान न करण्याची विनंती केली हाेती. शिवाय शिक्षण शुल्काचे काही पैसेही देण्याची व्यवस्थाही केली हाेती. त्यामुळे शाळेने विद्यार्थ्यांना अटीसह प्रवेश दिला.

संघटनांनीही ही बाब सरकारदरबारी लावून धरली. मुख्यमंत्र्यांच्या एका स्वाक्षरीसाठी शिष्यवृत्तीचा जीआर अडला होता. अखेर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर १५ डिसेंबरला शिष्यवृत्तीचा जीआर काढण्यात आला. पूर्वलक्षी प्रभावाने शिष्यवृत्ती लागू झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा खूप मोठा धोरणात्मक विषय असून यापुढे सैनिक शाळेत शिक्षण घेऊ इच्छित असणारे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. वर्षभरापासून या प्रकरणावर सरकारकडे पाठपुरावा केला असून हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री यांना निवेदन दिले हाेते. सरकारने जीआर काढल्याने प्रयत्नांचे फलित मिळाले. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, हीच अपेक्षा आहे.- डॉ सिद्धांत अर्जुन भरणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेडरेशन

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी