शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

फाेरलेनचे काम सुरू झाल्यावर वनविभागाला आठवले टायगर काॅरिडाेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 16:25 IST

सूत्रांच्या माहितीनुसार पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरअंतर्गत १२ गावे येत आहेत. त्यामुळे वन्यजिवांच्या भ्रमणाबाबत असलेल्या मानकांनुसार याेग्य पर्याय दिल्याशिवाय काम सुरू न करण्यास सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागपूर-काटाेल मार्गाला अर्ध्या कामानंतर ब्रेकस्टेज-१ व स्टेज-२ क्लिअरन्सनंतर आला आक्षेप

वसीम कुरैशी

नागपूर : बऱ्याच वर्षांपासून अरुंद असलेल्या नागपूर-काटाेल मार्गाचे चाैपदरीकरण हाेत असून त्याचे कामही सुरू झाले आहे. मात्र मार्गाचा काही भाग पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरमधून जात असल्याची आठवण वनविभागाला आता झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे या मार्गाच्या फाेर लेनचे काम सुरू करताना स्टेज-१ व स्टेज-२ साठी गेल्या वर्षीच वन व पर्यावरणाची मंजुरी मिळाली हाेती. त्यामुळे आता आलेल्या आक्षेपावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जवळपास ५० किलाेमीटरच्या कामादरम्यान आता २५ कि.मी.चे चाैपदरीकरणाचे काम थांबले आहे. त्यामुळे आता हे काम कधी पूर्ण हाेईल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पूर्व विदर्भाच्या टायगर काॅरिडाेरअंतर्गत १२ गावे येत आहेत. त्यामुळे वन्यजिवांच्या भ्रमणाबाबत असलेल्या मानकांनुसार याेग्य पर्याय दिल्याशिवाय काम सुरू न करण्यास सांगण्यात आले आहे. या कारणाने प्रकल्पाचे काम सध्या १३ ते ३५ कि.मी.दरम्यान सुरू आहे.

विशेष म्हणजे नागपूरमधून अमरावती, हैदराबाद, भाेपाळ, रायपूर अशा चारीही दिशांना महामार्ग आहेत आणि हे सर्व मार्ग वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात येतात. तरीही अडथळा निर्माण झाला नाही. त्यात केवळ नागपूर-जबलपूर मार्गावर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात ९ अंडरपास तयार करण्यात आले आहेत. याबाबत पीसीसीएफ (वन्यजीव) यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही.

आक्षेप घेणारेही संभ्रमात

अधिकारिक सूत्रानुसार २९ ऑक्टाेबर २०२१ राेजी चाैपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२२ म्हणजे वर्षभरानंतर वनविभागाचे सीसीएफ यांनी एपीसीसीएफ यांच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर प्रकरण पीसीसीएफ (वन्यजीव) यांच्याकडे पाठविण्यात आले. आता या अडथळ्यांवर पर्याय शाेधण्याचा प्रयत्न हाेत आहे.

डब्ल्यूडब्ल्यूआयकडून मागितला सल्ला

वनविभागाने रस्त्याचे काम सुरू असलेला परिसर वन्यजिवांचा भ्रमणमार्ग असल्याचे म्हटल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वन्यजीव संस्थेला (डब्ल्यूडब्ल्यूआय) सल्ला मागितला आहे. जानकारांच्या मते या प्रकरणात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे आणि नवीन पर्याय ठरविण्याच्या कामात नऊ महिने लागण्याची शक्यता आहे.

हा ठरू शकतो पर्याय

चाैपदरीकरणाचे काम भ्रमणमार्गातून जात असल्याने या भागात अंडरपास बनविण्याचा पर्याय सुचविला जाऊ शकताे. मात्र यामुळे डिझाईनमध्ये बदल करावा लागेल आणि आणखी काही मंजुरी घ्याव्या लागतील. शिवाय प्रकल्पाचा खर्चही वाढेल.

प्रकल्पाचे महत्त्वाचे बिंदू

- नागपूर-काटोल फोर लेन प्रकल्पाची लांबी ४८.२ किमी.

- प्रकल्पाचा एकूण खर्च ५९० काेटी रुपये.

- आधीच्या करारानुसार २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करायचा आहे.

- काम सुरू हाेऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे.

- प्रकल्पाअंतर्गत काटाेल व कळमेश्वरमध्ये दाेन आरओबीचा समावेश आहे.

- काटाेलमध्ये ११ कि.मी.चा नवीन बायपास अलाईनमेंट.

- बायपास असल्याने वाहनांना काटाेलमध्ये दाखल हाेण्याची गरज नाही.

- प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहणाची आवश्यकता पडली नाही.

टॅग्स :environmentपर्यावरणforest departmentवनविभागTigerवाघ